जळगाव : जळगाव जिल्ह्यातील वरणगाव परिसरात झालेल्या भीषण रस्ते अपघातात (Road Accident) एका महिलेसह चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. लस्सी पिण्यासाठी दुचाकीवरून निघालेल्या आदिवासी कुटुंबावर भरधाव वाहनाने अक्षरशः काळाचा घाला घातला. या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून मृतांमध्ये एका वर्षाच्या चिमुकलीचाही समावेश आहे.
मलकापूर येथील आदिवासी कुटुंबातील विजय शंकर काळे (वय १९), ऐश्वर्या बहाद्दूर भोसले (वय ३०), विघ्नेश शंकर चव्हाण (वय १४) आणि मोनालिसा शिवबसप्पा भोसले (वय १ वर्ष) हे चौघे दुचाकीवरून वरणगाव येथे लस्सी पिण्यासाठी जात होते. दरम्यान, गावाच्या पुढे भरधाव वेगाने येणाऱ्या एका वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी होती की चौघेही गंभीर जखमी झाले.
शालेय साहित्य खरेदीला विलंब, मुलांना मिळणार उशिराने मुंबई : मुंबई महापालिकेच्या विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या २७ शालेय वस्तुंची खरेदी जेम ...
अपघातानंतर घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी दुचाकीची ओळख पटवून तातडीने नातेवाईकांना माहिती दिली. त्यानंतर सर्व जखमींना उपचारासाठी जळगाव जिल्हा शासकीय रुग्णालय (Hospital) आणि वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर चौघांनाही मृत घोषित केले.
या दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात नातेवाईकांनी मोठी गर्दी केली. आप्तस्वकीयांच्या मृत्यूची बातमी समजताच रुग्णालय परिसरात हंबरडा फोडत नातेवाईकांचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश पाहायला मिळाला. दरम्यान, जळगाव पोलिसांनी (Police) रुग्णालयात धाव घेत नातेवाईकांची विचारपूस केली तसेच त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. अपघातास जबाबदार असलेल्या वाहनचालकाविरोधात कठोर कारवाई करून न्याय मिळावा, अशी मागणी मृतांच्या नातेवाईकांनी केली आहे.