Jalgaon Road Accident : भरधाव वाहनाची दुचाकीला जोरदार धडक; जळगावात एका वर्षाच्या लेकरासह चौघांचा मृत्यू

जळगाव : जळगाव जिल्ह्यातील वरणगाव परिसरात झालेल्या भीषण रस्ते अपघातात (Road Accident) एका महिलेसह चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. लस्सी पिण्यासाठी दुचाकीवरून निघालेल्या आदिवासी कुटुंबावर भरधाव वाहनाने अक्षरशः काळाचा घाला घातला. या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून मृतांमध्ये एका वर्षाच्या चिमुकलीचाही समावेश आहे.


मलकापूर येथील आदिवासी कुटुंबातील विजय शंकर काळे (वय १९), ऐश्वर्या बहाद्दूर भोसले (वय ३०), विघ्नेश शंकर चव्हाण (वय १४) आणि मोनालिसा शिवबसप्पा भोसले (वय १ वर्ष) हे चौघे दुचाकीवरून वरणगाव येथे लस्सी पिण्यासाठी जात होते. दरम्यान, गावाच्या पुढे भरधाव वेगाने येणाऱ्या एका वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी होती की चौघेही गंभीर जखमी झाले.



अपघातानंतर घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी दुचाकीची ओळख पटवून तातडीने नातेवाईकांना माहिती दिली. त्यानंतर सर्व जखमींना उपचारासाठी जळगाव जिल्हा शासकीय रुग्णालय (Hospital) आणि वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर चौघांनाही मृत घोषित केले.


या दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात नातेवाईकांनी मोठी गर्दी केली. आप्तस्वकीयांच्या मृत्यूची बातमी समजताच रुग्णालय परिसरात हंबरडा फोडत नातेवाईकांचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश पाहायला मिळाला. दरम्यान, जळगाव पोलिसांनी (Police) रुग्णालयात धाव घेत नातेवाईकांची विचारपूस केली तसेच त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. अपघातास जबाबदार असलेल्या वाहनचालकाविरोधात कठोर कारवाई करून न्याय मिळावा, अशी मागणी मृतांच्या नातेवाईकांनी केली आहे.

Comments
Add Comment

TET exam : टीईटी परीक्षेत सीसीटीव्हीमध्ये चेहरा दिसणे बंधनकारक

टीईटी परीक्षेत सीसीटीव्हीमध्ये चेहरा दिसणे बंधनकारक बुरखा, दुपट्टा किंवा ओढणीला बंदी नाही- राज्य परीक्षा

Vilas Ghule : विलास घुले हत्या प्रकरणावरून धनंजय मुंडेंचा सवाल; निष्पक्ष तपासाची मागणी

बीड : बीड (Beed) जिल्ह्यातील केज तालुक्यातील विलास घुले (Vilas Ghule) हत्या प्रकरणावरून (Murder) माजी मंत्री आणि आमदार धनंजय मुंडे

Monsoon Update : जून महिन्यात पाऊस पडणार नाही ; या तारखेपासून कोसळणार मुसळधार पाऊस

महाराष्ट्र : महाराष्ट्रामध्ये काही भागात पावसाने जोरदार हजेरी लावली. २३ आणि २५ जूनला मुंबईसह इतर शहरात मुसळधार

Ketan Agarwal Murder Case: "म्हणून मी त्याला लोहगडावरून खाली ढकललं..." सियाने पोलिसांसमोर सर्वचं सांगितलं

केतनच्या हत्येमागचं सर्वात भयंकर कारण आलं समोर Ketan Agarwal Murder Case : पुणे : पुण्यातील उद्योगपती केतन अग्रवाल (Ketan Agarwal Murder)

आषाढी वारीसाठी रेल्वेची खास भेट; पंढरपूरसाठी धावणार विशेष गाड्या, जाणून घ्या वेळापत्रक

आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी मध्य रेल्वेने विशेष गाड्यांची घोषणा केली

Maharashtra Infrastructure : मुंबई आणि नागपूरसाठी मोठा निर्णय; दोन महत्त्वाच्या वाहतूक प्रकल्पांना राज्य सरकारची मंजुरी

राज्यातील वाहतूक व्यवस्था अधिक वेगवान आणि सुलभ करण्यासाठी राज्य सरकारने दोन महत्त्वाच्या पायाभूत सुविधा