स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील विधान परिषदेच्या निवडणुकांमध्ये विजय मिळवण्यासाठी महायुतीने बंडखोरी रोखण्याला सर्वोच्च प्राधान्य दिले. इच्छुकांची समजूत काढत साम, दाम, दंड, भेद, राजकीय डावपेचांचा वापर करत, विशेषतः मराठवाड्यातील चार जागांवर संभाव्य बंडखोरीचे सावट असताना, विविध राजकीय समन्वय आणि आश्वासनांच्या जोरावर महायुतीने बहुतांश ठिकाणी अंतर्गत संघर्ष आटोक्यात आणला.
स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील जागांवर विजय मिळवण्यासाठी महायुतीने बंडखोरी रोखण्यावर विशेष भर दिला. त्यासाठी साम, दाम, दंड, भेद या सर्व राजकीय डावपेचांचा अवलंब करण्यात आला. राज्यातील १७ जागांपैकी चार जागा मराठवाड्यातील असून, या ठिकाणी काही बंडखोर उमेदवारांनी महायुतीच्या अधिकृत उमेदवारांसमोर आव्हान उभे करण्याचा प्रयत्न केला. मात्र विविध राजकीय समन्वय आणि आश्वासनांच्या माध्यमातून या बंडखोरांना शांत करण्यात महायुतीला बऱ्याच प्रमाणात यश आले. विधान परिषद सदस्यांच्या रखडलेल्या निवडणुका कधी जाहीर होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. निवडणुकीची घोषणा होताच अनेक इच्छुकांनी उमेदवारीसाठी प्रयत्न सुरू केले. महायुतीच्या बहुतांश जागांवर त्यांच्या घटक पक्षांतील किंवा मित्रपक्षांतील इच्छुकांनीच बंडखोरी केल्याने नेतृत्वाची चिंता वाढली होती.
३४ वारसांना ३ कोटी ४० लाख मंजूर; विविध आंदोलनांत ३०९ कार्यकर्त्यांचा मृत्यू मुंबई : मराठा आरक्षणाच्या (Maratha reservation) मागणीसाठी झालेल्या विविध आंदोलनांतील ...
३४ वारसांना ३ कोटी ४० लाख मंजूर; विविध आंदोलनांत ३०९ कार्यकर्त्यांचा मृत्यू मुंबई : मराठा आरक्षणाच्या (Maratha reservation) मागणीसाठी झालेल्या विविध आंदोलनांतील ...
३४ वारसांना ३ कोटी ४० लाख मंजूर; विविध आंदोलनांत ३०९ कार्यकर्त्यांचा मृत्यू मुंबई : मराठा आरक्षणाच्या (Maratha reservation) मागणीसाठी झालेल्या विविध आंदोलनांतील ...