Malviya Nagar Fire: दिल्ली अग्नितांडव प्रकरणात धक्कादायक खुलासा; 'या' कारणांमुळे हॉटेल मालकाला अटक

दिल्लीतील एका गेस्ट हाऊसमध्ये लागलेल्या भीषण आगीच्या घटनेनंतर तपास यंत्रणांनी चौकशीची गती वाढवली आहे. या दुर्घटनेत निष्पाप २१ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. या दुर्घटनेनंतर पोलिसांनी हॉटेल मालक लवकेश बजाज याला अटक केली आहे. चौकशी दरम्यान हॉटेल मालकाने अनेक खुलासे केले त्यामुळे प्रशासनासमोर आणखी नवे प्रश्न उपस्थित झाले आहेत.

पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या हॉटेल मालकाने चौकशीदरम्यान सांगितले की, आग लागल्यानंतर इमारतीत अडकलेले लोक बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, परिस्थिती पाहून तो घाबरला आणि मदतीसाठी थांबण्याऐवजी तेथून निघून गेला. त्याच्या या कबुलीमुळे तपासाला नवे वळण मिळाले आहे.



मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित व्यक्तीने काही वर्षांपूर्वी ही इमारत खरेदी केली होती. त्यानंतर त्या ठिकाणी गेस्ट हाऊस सुरू करण्यात आले. मात्र, परवानगीपेक्षा अधिक खोल्या चालवल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे. अधिकृत परवानगी मर्यादित खोल्यांसाठी असताना प्रत्यक्षात मोठ्या प्रमाणावर खोल्यांचा वापर सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.

तपासादरम्यान हॉटेलचे दैनंदिन व्यवस्थापन दुसऱ्या व्यक्तीकडे सोपवण्यात आल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे या प्रकरणात इतर संबंधित व्यक्तींची भूमिकाही तपासली जात आहे. पोलिसांकडून हॉटेलच्या परवानग्या, सुरक्षा व्यवस्था आणि अग्निसुरक्षा नियमांचे पालन करण्यात आले होते का याची चौकशी सुरू आहे.

या दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांमध्ये परदेशी नागरिकांचाही समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या प्रकरणाकडे विविध यंत्रणांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, पोलिसांनी हॉटेल मालकाला न्यायालयात हजर करण्याची तयारी केली असून पुढील चौकशीसाठी कोठडीची मागणी केली जाण्याची शक्यता आहे. आग लागण्याचे नेमके कारण आणि जबाबदार व्यक्तींची भूमिका तपासातून स्पष्ट होणार आहे.
Comments
Add Comment

Piyush Goyal : मंत्री पीयूष गोयल सोमवारपासून चार दिवसांच्या जपान दौऱ्यावर

नवी दिल्ली : केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल, 24 ते 27 ऑगस्ट 2026 या कालावधीत जपानला भेट देणार आहेत. या

AK-203 Sher Rifle : संरक्षण उत्पादनात भारताची झेप; स्वदेशी AK-203 रायफलची यशस्वी निर्मिती

नवी दिल्ली : स्वदेशी संरक्षण उत्पादनाच्या क्षेत्रात भारताने आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. ‘मेक इन इंडिया’

Laptop Fire on Flight : हवेतच लॅपटॉपने घेतला पेट; विमानातील ५ प्रवासी जखमी, थरारक घटना

नवी दिल्ली : अमेरिकेत अटलांटा ते डॅलस असा प्रवास करणाऱ्या विमानात लॅपटॉपला अचानक आग लागल्याने मोठी खळबळ उडाली.

FSSAI Action : नेस्ले, पेप्सिको आणि कोका-कोलासह बड्या कंपन्यांना FSSAIचा दणका; भ्रामक जाहिरातींवर १५० हून अधिक नोटिस

नवी दिल्ली : नेस्ले, पेप्सिको आणि कोका-कोलासारख्या मोठ्या खाद्य कंपन्यांविरोधात भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक

Odisha Ship Accident : बंगालच्या उपसागरात मालवाहू जहाज बुडाले; २४ क्रू मेंबर्सचा शोध सुरू, ओडिशाच्या किनाऱ्याजवळ मोठी दुर्घटना

नवी दिल्ली : बंगालच्या उपसागरात शनिवारी पनामा ध्वज असलेले मालवाहू जहाज बुडाल्याची धक्कादायक घटना घडली. हे जहाज

ISRO : इस्त्रोची प्रक्षेपण वाहन निर्मितीतून माघार; खासगी कंपन्यांकडे जबाबदारी

नवी दिल्ली : भारताच्या अंतराळ कार्यक्रमात मोठा बदल होण्याची शक्यता आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्त्रो)