रायगड : शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर रायगडावर जाणाऱ्या शिवभक्तांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. मुंबईतील दादर येथून रायगड पायथ्याजवळील सांदोशीपर्यंत विशेष एसटी बससेवा सुरू करण्यात येणार आहे. यामुळे हजारो शिवप्रेमींचा प्रवास अधिक सुरक्षित, सोयीस्कर आणि किफायतशीर होईल असं मानल जात आहे.
नवी दिल्ली : भारताच्या नागरी विमाननिर्मिती क्षेत्रासाठी एक ऐतिहासिक संधी निर्माण झाली आहे. रशियाची युनायटेड एअरक्राफ्ट कॉर्पोरेशन (UAC) आणि भारताची ...
हिंदवी स्वराज्याची राजधानी आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या वैभवशाली इतिहासाचे प्रतीक असलेल्या दुर्गराज रायगडावर यंदा २७ जून २०२६ रोजी शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. दरवर्षी या ऐतिहासिक सोहळ्यासाठी राज्यभरातून मोठ्या संख्येने शिवभक्त रायगडावर दाखल होतात. याच पार्श्वभूमीवर श्री शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समितीने मुंबई ते सांदोशी विशेष बससेवा करण्याचा निर्णय घेतला आहे. या बस सेवाचा शुभारंभ समितेचे अध्यक्ष सुनील पवार यांच्या हस्ते १ जून रोजी करण्यात आला होता. यावेळी समितीचे पदाधिकारी, शिवभक्त आणि विविध मान्यवर उपस्थित होते. या उपक्रमासाठी समितीचे सदस्य दीपेश पटवर्धन यांनी विशेष पुढाकार घेतला आहे.
Nashik : दिंडोरी ( Dindori ) तालुक्यातील कौडासर (Kaudasar) येथे अवकाळी पावसादरम्यान ११ केव्ही वीजवाहक तार तुटून शेतात पडल्याने झालेल्या दुर्घटनेत एका महिलेचा मृत्यू ...
रायगडावर कसे पोहोचाल?
Raigad Fort येथे जाण्यासाठी सर्वात जवळचे शहर म्हणजे Mahad आहे. महाड बसस्थानकापासून पाचाड गाव किंवा रोपवे स्टेशनपर्यंत एसटी बस आणि खासगी वाहनांची सुविधा उपलब्ध आहे. महाड आगारातून पहाटे ५.३० वाजल्यापासून पाचाडसाठी बस सुटतात. त्या बसने पाचाडाकडे येणे शक्य आहे. पाचाडहून महाडकडे शेवटची बस साधारणता सायंकाळी ४ ते ५ वाजेपर्यंत उपलब्ध असते.तसेच मुंबईपासून खासगी वाहानाने गेल्यास आठशे ते हजार रुपये खर्च होतो . परंतु आता बससेवेमुळे खर्च आणि वेळ दोन्हीही कमी लागेल.