Bharat Taxi Service : महाराष्ट्रात लवकरच अॅप आधारित सहकारी टॅक्सी सेवा, 'या' शहरात सुरु होणार; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

महाराष्ट्रातील प्रवाशांसाठी आणि टॅक्सी चालकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राज्यात लवकरच अॅप आधारित सहकारी टॅक्सी सेवा (Bharat Taxi Service) सुरू करण्याची तयारी सुरू झाली असून यासाठी शासन स्तरावर हालचाली वेगाने सुरू आहेत. या नव्या उपक्रमामुळे चालकांचे उत्पन्न वाढण्यास मदत होणार असून प्रवाशांनाही अधिक सोयीस्कर आणि विश्वासार्ह सेवा मिळण्याची अपेक्षा आहे. (Bharat Taxi App)

राज्यात ऑनलाइन कॅब आणि टॅक्सी सेवांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे दररोज हजारो नागरिक विविध मोबाइल अॅपच्या माध्यमातून प्रवासासाठी वाहनांची बुकिंग करतात. याच पार्श्वभूमीवर सहकारी तत्त्वावर आधारित टॅक्सी सेवा सुरू करण्याचा निर्णय पुढे आला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे अनेक टॅक्सी चालकांना उद्योगाची नवी दिशा मिळणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परिवहन विभागाला या सेवेसाठी आवश्यक नियमावली तयार करण्याचे आणि आवश्यक परवानग्यांची प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. अलीकडेच या प्रकल्पासंदर्भात बैठक पार पडली असून त्यामध्ये योजनेच्या विविध बाबींचा आढावा घेण्यात आला.



सहकार भारत टॅक्सी को-ऑपरेटिव्ह लिमिटेडच्या माध्यमातून ही सेवा सुरू केली जाणार आहे. या उपक्रमाचा मुख्य उद्देश टॅक्सी चालकांना अधिक आर्थिक लाभ मिळवून देणे आणि त्यांना स्थिर उत्पन्नाची संधी उपलब्ध करून देणे तसेच सामाजिक आणि व्यावसायिक सक्षमीकरण करण्याच्या उद्देश हा आहे. चालकांना सहकारी संस्थेच्या माध्यमातून थेट जोडले जाणार असल्याने त्यांना अधिक फायदा मिळू शकतो. तसेच या उपक्रमामुळे प्रवाशांना देखील कमी खर्चा

मिळालेल्या माहितीनुसार,या सेवेची माहिती सहकार भारत टॅक्सीचे प्रतिनिधी असलेले कर्नल हिमांशु यांनी दिली. या सेवेची सुरुवात प्रथम मुंबईत केली जाणार आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्याने पुणे आणि नागपूरसह इतर प्रमुख शहरांमध्येही विस्तार करण्यात येणार आहे.

या नव्या सहकारी टॅक्सी मॉडेलमुळे प्रवाशांना अधिक पर्याय उपलब्ध होतील, तर चालकांसाठीही उत्पन्न वाढीचा नवा मार्ग खुला होणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. या सेवेमुळे प्रवाशांना दर्जेदार सेवेचा लाभ मिळेल. या टॅक्सी सेवा राज्यातील काही छोट्या शहरात सुरु करण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
Comments
Add Comment

FYJC : अकरावी प्रवेशासाठी मंगळवार ४ ऑगस्टपासून विशेष फेरी

मुंबई : शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठीच्या इयत्ता अकरावी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत आतापर्यंत १५ लाखांहून

Devendra Fadnavis : राष्ट्रीय स्तरावर शालेय शिक्षणात महाराष्ट्राचे महत्त्वपूर्ण स्थान; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राज्यातील शालेय शिक्षण क्षेत्रात अभिनव उपक्रमांची अंमलबजावणी https://prahaar.in/2026/08/03/promotion-for-18-officers-of-the-legislature-secretariat/ शालेय

Mumbai Metro : मेट्रो -६ प्रकल्पाचे ८८ टक्के काम पूर्ण, कारशेडचा प्रश्न कायम

मुंबई : स्वामी समर्थ नगर-जोगेश्वरी-विक्रोळी मेट्रो-६चे काम अंतिम टप्प्यात पोहोचले असले तरी कांजुरमार्ग कारशेडचा

Sumantrao Pendharkar : 'विको'ला जागतिक ओळख देणारे उद्योगरत्न सुमंतराव पेंढरकर यांचे निधन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली

मुंबई : प्रसिद्ध आयुर्वेदिक उत्पादन कंपनी 'विको लॅबोरेटरीज'ला जागतिक स्तरावर ओळख मिळवून देणारे उद्योगपती आणि

Maharashtra Vidhan Bhavan : विधान मंडळ सचिवालयातील १८ अधिकाऱ्यांना पदोन्नती

मुंबई : महाराष्ट्र विधान मंडळ सचिवालयातील उपसचिव, अवर सचिव, अवर सचिव (समिती) आणि कक्ष अधिकारी अशा एकूण १८ पदांवर

Mohan Bhagwat : सरसंघचालक मुंबईत साधणार 'जेन-झीं'शी संवाद

मुंबई : देशातील तरुण पिढी सध्या लोकशाही, नेतृत्व आणि राष्ट्रउभारणीसारख्या महत्त्वपूर्ण विषयांवर सक्रियपणे