Aviation Industry : विमान कंपन्यांना केंद्राकडून दहा हजार कोटींची मदत

नवी दिल्ली : पश्चिम आशियातील वाढत्या तणावामुळे विमानांच्या इंधनाचे दर गगनाला भिडले असताना, केंद्र सरकारने विमान वाहतूक क्षेत्राला मोठा दिलासा दिला आहे. देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय भारतीय विमान कंपन्यांना स्थिर दराने इंधन पुरवण्यासाठी तेल कंपन्यांना १० हजार कोटी रुपयांचे बजेट पॅकेज देण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी मंजुरी दिली. माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पत्रकारांना या 'किंमत स्थिरीकरण निधी' निर्णयाची माहिती दिली.


आंतरराष्ट्रीय बाजारात विमानांच्या इंधनाचे दर कमालीचे वाढले आहेत. मार्च २०२६ मध्ये ६०.५० रुपये प्रति लीटर असलेले इंधन अवघ्या दोन महिन्यांत, म्हणजेच मे २०२६ मध्ये थेट १४२ रुपये प्रति लीटरवर पोहोचले आहे. विमान चालवण्याच्या एकूण खर्चात एकट्या इंधनाचा वाटा तब्बल ४० ते ६० टक्के असतो. सरकारच्या या हस्तक्षेपामुळे विमान कंपन्यांना स्थिर दराने इंधन मिळेल, परिणामी प्रवाशांवर अचानक वाढीव तिकीट दरांचा बोजा पडणार नाही. सरकार हा १० हजार कोटींचा निधी तेल विपणन कंपन्यांना व्याजमुक्त आगाऊ रक्कम म्हणून देणार आहे. जेव्हा जेव्हा आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाचे दर एका निश्चित मर्यादेपलीकडे जातील, तेव्हा या निधीतून तेल कंपन्यांची भरपाई केली जाईल. हे पॅकेज तात्पुरते असून आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाचे दर कमी होताच, तेल कंपन्यांकडून ही अतिरिक्त रक्कम वसूल करून पुन्हा सरकारी तिजोरीत जमा केली जाईल.


३ वर्षांचा करार


या योजनेचा लाभ घेणाऱ्या विमान कंपन्यांना तेल कंपन्यांसोबत ३ वर्षांचा करार करावा लागेल आणि या काळात त्यांना केवळ याच सरकारी तेल कंपन्यांकडून इंधन खरेदी करावे लागेल. या संपूर्ण प्रक्रियेवर नागरी विमान वाहतूक मंत्रालय आणि पेट्रोलियम मंत्रालयाची देखरेख समिती लक्ष ठेवणार आहे.


हवाई क्षेत्र बंदीचा फटका कमी होणार


पाकिस्तानने आपले हवाई क्षेत्र भारतीय विमानांसाठी बंद केल्यामुळे युरोप, उत्तर अमेरिका आणि मध्य आशियात जाणाऱ्या भारतीय विमानांना मोठा वळसा घालून जावे लागत आहे. यामुळे इंधनाचा वापर आणि परिचालन खर्च आधीच वाढला आहे. त्यातच इंधनाचे दर वाढल्याने काही कंपन्यांनी आंतरराष्ट्रीय फेऱ्या रद्द करण्यास सुरुवात केली होती. केंद्राच्या या आर्थिक पाठबळामुळे विमान कंपन्यांचे मोठे नुकसान टळणार असून, देशातील टियर-२ आणि टियर-३ (छोटे नागरिक व प्रादेशिक) शहरांमधील विमान सेवा अखंडित सुरू राहण्यास मदत होणार आहे. तसेच पर्यटन, व्यापार आणि 'उडान' योजनेलाही यामुळे बळ मिळेल.

Comments
Add Comment

Hareshwar Patil : माजी महापौर हरेश्वर पाटील यांचे निधन

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईचे माजी महापौर हरेश्वर पाटील यांचे बुधवारी पहाटेच्या सुमारास दुःखद निधन झाले. ते

Nale Safai : रेल्वे, BMC, लोकप्रतिनिधी यांच्या समन्वयातून साधणार नालेसफाई

उपमहापौर संजय घाडी यांनी केली कुर्ला भागातील नाल्यांची सफाई मुंबई (विशेष प्रतिनिधी) : रेल्वे हद्दीतील

Wipro: टीसीएसनंतर विप्रोमध्येही कॉर्पोरेट जिहाद

पुणे : नाशिक येथील 'टीसीएस' आणि मुंबईतील 'एसबीआय' बँकिंग क्षेत्रातील वादग्रस्त प्रकरणांनंतर आता पुण्याच्या

Anti-hand kiln campaign : हातभट्टी विरोधी मोहिमेला वेग; दीड कोटीचा मुद्देमाल जप्त

मुंबई: मागील आठवड्यात पुणे शहरामध्ये घडलेल्या विषारी दारु दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर विविध अवैध हातभट्टी

Pune Crime : नसरापूर प्रकरणी न्यायालयात तीन लहान मुलांची साक्ष

पुणे : पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथील चिमुकलीवर झालेल्या अत्याचार आणि खून प्रकरणाच्या खटल्यात एक मोठी घडामोडी

Mephedrone in Pune : पुण्यातून ३७०० कोटींचे मेफेड्रोन जप्त, विश्रांतवाडीतून ३४० किलो कच्चा माल जप्त

पुणे : पुणे पोलिसांनी पुणे, दिल्ली, कुरकुंभ आणि सांगली परिसरात धाडी टाकून तब्बल ३ हजार ७०० कोटी रुपयांचे