Trade : मे महिन्यात १४.५ कोटी टन मालवाहतुकीचे लक्ष्य साध्य

चेन्नई : विविध जागतिक आव्हानांना तोंड देत भारतीय रेल्वेने मे महिन्यात १४.५ कोटी टन मालवाहतूक करून आपल्या वृद्धीचा वेग कायम राखला आहे. ही कामगिरी मे २०२५ च्या तुलनेत १.३ टक्क्यांची वाढ दर्शवते. मिळालेल्या माहितीनुसार, लोहखनिज , पोलाद, खते आणि इतर वस्तूंच्या वाहतुकीतील भक्कम कामगिरीमुळे ही वाढ झाली आहे. पश्चिम आशियातील भू-राजकीय तणाव आणि त्याचे लॉजिस्टिक्स व पुरवठा साखळीवर झालेले अप्रत्यक्ष परिणाम यांसारख्या आव्हानांनंतरही रेल्वेने हे यश मिळवले आहे. रेल्वेने सातत्यपूर्ण परिचालन देखरेख आणि मालमत्तेचा कार्यक्षम वापर करून देशभरात जीवनावश्यक वस्तूंची अखंड वाहतूक सुनिश्चित करण्यावर भर दिला आहे.प्रमुख घटकांचा विचार केल्यास, इतर वस्तूंच्या वाहतुकीत १६ टक्क्यांची मोठी वाढ नोंदवली गेली. तर गेल्या वर्षाच्या याच कालावधीच्या तुलनेत लोहखनिजाच्या वाहतुकीत ४.८ टक्के आणि पिग आयर्न व तयार पोलादाच्या वाहतुकीत ३.५ टक्क्यांची वाढ झाली आहे. खतांच्या वाहतुकीतही ६.२ टक्क्यांची चांगली वाढ झाली असून, यातून रेल्वेची अर्थव्यवस्थेच्या प्रमुख क्षेत्रांना मदत करण्याची कटिबद्धता दिसून येते.


रेल्वेच्या मालवाहतुकीत सर्वाधिक वाटा असलेल्या कोळशाच्या वाहतुकीने गेल्या वर्षाच्या तुलनेत सुमारे १ टक्क्याच्या वाढीसह आपली स्थिर घोडदौड कायम ठेवली आहे. अधिकृत प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, औष्णिक वीज केंद्रांची गरज पूर्ण करण्यासाठी आणि ऊर्जा सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी भारतीय रेल्वेने कोळशाच्या वाहतुकीला प्राधान्य दिले आणि संपूर्ण नेटवर्कमध्ये यावर बारीक लक्ष ठेवले. याशिवाय, देशांतर्गत आणि आयात-निर्यात अशा दोन्ही प्रकारच्या कंटेनर वाहतुकीवर रेल्वेने देखरेख वाढवली आहे. या उपायांमुळे आव्हानात्मक परिस्थितीतही मालवाहतुकीतील वाढ आणि पुरवठा साखळीची कार्यक्षमता टिकवून ठेवण्यास मदत झाली.


६१ कोटींहून अधिक प्रवाशांचा प्रवासठ

लांब पल्ल्याच्या प्रवासाची सातत्याने वाढणारी मागणी लक्षात घेता, भारतीय रेल्वेने मे २०२६ दरम्यान ६१ कोटींहून अधिक प्रवाशांना त्यांच्या गंतव्यस्थानापर्यंत पोहोचवले. गेल्या वर्षाच्या याच कालावधीत हा आकडा सुमारे ५९ कोटी होता. ही वाढ प्रामुख्याने बिगर-उपनगरीय क्षेत्रामुळे झाली आहे. यात ७.४ टक्क्यांची वाढ नोंदवली गेली असून, प्रवाशांची संख्या २८ कोटींवरून ३० कोटींवर पोहोचली आहे. उन्हाळ्यातील प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेता रेल्वेने विविध मार्गांवर मोठ्या संख्येने 'विशेष ग्रीष्मकालीन राहत' ट्रेन्स चालवल्या.


वंदे भारत आणि अमृत भारत सेवांचा विस्तार

आधुनिक ट्रेन सेवांच्या सातत्यपूर्ण विस्तारामुळे प्रवाशांचा प्रवास अधिक सुकर झाला आहे. रेल्वे सध्या १६४ वंदे भारत सेवा चालवत आहे. यामध्ये नुकतीच हावडा आणि कामाख्या दरम्यान सुरू झालेल्या 'स्लीपर वंदे भारत' सेवेचाही समावेश आहे. अमृत भारत सेवांची संख्या ६८ वर पोहोचली असून, त्यापैकी तीन नवीन सेवांचे उद्घाटन मे २०२६ दरम्यान करण्यात आले होते.

Comments
Add Comment

Jayant Patil : जयंत पाटील यांनी घेतली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट

आमदार जितेंद्र आव्हाडही सोबत; 'नंदनवन'वर एक तास खलबते मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे

Ro-ko Unstoppable : रोहित आणि विराटने रचला इतिहास; गांगुली-द्रविडला मागं टाकतं ही कामगिरी करणारी ठरली तिसरी जोडी

Mumbai : भारत आणि इंग्लंड यांच्यात दुसरा एकदिवसीय सामना कार्डिफ येथे सुरु आहे. इंग्लंडनं टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी

India's energy storage : भारताची ऊर्जा साठवणूक क्षमता २०३५-३६ पर्यंत दहा पटींनी वाढणार

नवी दिल्ली : भारताच्या विकासाच्या प्रवासात ऊर्जा क्षेत्राचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. देशाची वाढती वीज गरज आणि

Indian Fishermen : शिक्षा पूर्ण होऊनही १७८ भारतीय मच्छीमार पाकिस्तानच्या तुरुंगात

कॉन्स्युलर कराराचे उल्लंघन; डहाणू-तलासरीतील १८ कुटुंबांचा न्यायासाठी आक्रोश डहाणू : भारत-पाकिस्तानदरम्यान

CUTS International : बाईक टॅक्सींसाठी देशव्यापी सुसंगत धोरणाची गरज, 'कट्स इंटरनॅशनल'चा अहवाल

नवी दिल्ली : देशातील बाईक टॅक्सी सेवांसाठी सध्या असलेल्या विसंगत राज्यनिहाय नियमांऐवजी, एक सुसंगत आणि

Jagannath Rath Yatra Stampede : जगन्नाथ रथयात्रेदरम्यान प्रचंड गर्दीमुळे चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती; एकाचा मृत्यू, अनेक जखमी

भुवनेशवर : ओडिसातील पुरी येथे गुरुवारी जगप्रसिद्ध जगन्नाथ रथयात्रेदरम्यान चेंगराचेंगरीसदृश परिस्थिती