कर्जातून सुटका करण्यासाठी स्वतःचाच मृत्यूचा रचला कट; जळालेल्या कारमागचं धक्कादायक हत्याकांड उघड

जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यात उघडकीस आलेल्या एका धक्कादायक प्रकरणाने संपूर्ण परिसर खळबळ उडाली आहे. कर्जबाजारीपणातून सुटका मिळवण्यासाठी एका व्यक्तीने स्वतःच्या मृत्यूचा खोटा बनाव रचत निष्पाप तरुणाची हत्या (Murder) केल्याचा प्रकार पोलिसांच्या तपासात समोर आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपीसह तिघांना अटक (Arrest) केली असून पुढील तपास सुरू आहे. (Jalna Crime News)

काही दिवसांपूर्वी जाफराबाद तालुक्यातील गोपी शिवार परिसरात रस्त्याच्या कडेला उभी असलेल्या एका कारला आग लागल्याची घटना समोर आली होती. कार पूर्णपणे जळून गेली होती आणि त्यामध्ये एका व्यक्तीचा जळालेला मृतदेह आढळून आला होता. सुरुवातीला हा अपघात असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मात्र मृतदेहाची ओळख पटवताना काही विसंगती आढळल्याने पोलिसांनी सखोल तपास सुरू केला.

पोलिसांच्या अथक प्रयत्नानंतर त्यांना धक्कादायक माहिती हाथी लागली. तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, नितीन गवळी हा मोठ्या आर्थिक अडचणीत सापडला होता. कर्जाच्या ओझ्यातून बाहेर पडण्यासाठी त्याने स्वतःचा मृत्यू झाल्याचा बनाव करण्याचा कट रचला. यासाठी त्याने आपल्या मित्रांच्या मदतीने संदीप चव्हाण या तरुणाला लक्ष्य केले आणि त्याला ठार मारायचे ठरवले.

पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपींनी सर्वप्रथम संदीपचा खुन केला. त्यानंतर त्याचा मृतदेह कारमध्ये ठेवून दिला आणि वाहनाला आग लावण्यात आली. कारमधील जळालेला मृतदेह हा नितीन गवळीचाच असल्याचा आभास निर्माण करण्याचा आरोपींचा प्रयत्न होता.

मात्र पोलिसांनी तांत्रिक पुरावे, गुप्त माहिती आणि विविध तपासाच्या आधारे संपूर्ण कट उघड केला. तपासात नितीन गवळी जिवंत असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांनी नितीन गवळी, अमित फुलारे आणि आकाश गवळी या तिघांवर गुन्हा दाखल केला आणि जाफराबाद येथून तिघांना अटक केली.

या घटनेमुळे जालना जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली असून स्वतःच्या फायद्यासाठी एका निष्पाप तरुणाचा जीव घेतल्याने संताप व्यक्त केला जात आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.
Comments
Add Comment

Weather Update : महाराष्ट्रासाठी पुढचे २४ तास महत्त्वाचे ! राज्यातील 3० जिल्ह्यांना यलो अलर्ट; लवकरच मान्सूनचे आगमन होणार ?

Mumbai : मुंबईसह राज्यातील काही भागात मंगळवारी (२३ जून ) ला पावसानी हजेरी लावली. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या

Nitesh Rane : ओसरगाव टोलनाक्यावर 'एमएच-०७' वाहनांना टोलमाफी

 पालकमंत्री नितेश राणे यांची वाढदिवसानिमित्त सिंधुदुर्गवासीयांना मोठी भेट; स्वतंत्र मार्गिका, व्यावसायिक

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; पती-पत्नी ठार, दोन चिमुकल्यांसह चालक गंभीर

Buldhana : राज्यात रस्ते अपघातांच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असताना समृद्धी महामार्गावर (Samruddhi Mahamarg) पुन्हा एकदा

Forest Minister Ganesh Naik : कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि खानदेशात बिबट सफारी विकसित करणार

वनमंत्री गणेश नाईक यांची घोषणा; विदर्भातील प्रत्येक जिल्ह्यात ताडोबाच्या धर्तीवर व्याघ्र प्रकल्प मुंबई :

Chhagan Bhujbal : शिवभोजन केंद्र चालकांना दरमहा अनुदान देण्याबाबत शासन सकारात्मक मंत्री छगन भुजबळ यांचे विधान परिषदेत आश्वासन

बंद शिवभोजन केंद्रे पुन्हा सुरू करण्यास प्राधान्य; निधीसाठी अर्थ विभागाशी चर्चा करणार मुंबई : राज्यातील

Maharashtra Monsoon 2026 : राज्यात २४ ते २७ जूनदरम्यान पावसाचा जोर वाढण्याची शक्यता

मुंबई : भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार राज्यात मान्सून सक्रिय होण्यासाठी पोषक परिस्थिती निर्माण