मुंबई : सहाव्या फेरीतील निराशाजनक कामगिरीनंतर भारतीय बुद्धिबळपटूंनी नॉर्वे चेस स्पर्धेत शानदार पुनरागमन केले आहे. सातव्या फेरीत आर. प्रज्ञानानंद, डी. गुकेश आणि दिव्या देशमुख यांनी विजय मिळवला आहे. या विजयसह त्यांचे विजेतेपदाच्या शर्यतीतील आव्हान कायम राहिले आहे.
प्रज्ञानानंदची शानदार कामगिरी
भारताचा युवा ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानानंदने फ्रान्सच्या अलीरेझा फिरोजाला क्लासिकल सामन्यात पराभूत करत तीन गुण मिळवले आहेत. पांढऱ्या मोहऱ्यांसह खेळताना प्रज्ञानानंदने 26व्या चालीपासून सामन्यावर पकड मजबूत करत प्रतिस्पर्ध्याला सलग दुसऱ्यांदा पराभूत केले.
गुकेशने टायब्रेकरमध्ये दाखवली कमाल
विश्वविजेता डी. गुकेश मागील सामन्यात अमेरिकेच्या वेस्ली सो विरुद्धच्या क्लासिकल सामन्यात विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचला होता. मात्र सामना ड्रॉ राहिला. त्यानंतर झालेल्या आर्मागेडन टायब्रेकमध्ये गुकेशने शानदार खेळ करत विजय मिळवला. या विजयातून गुकेशने दीड गुणांची कमाई केली.
Mumbai : अफगाणिस्तानविरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यापूर्वी भारतीय संघाच्या निवडीवरून वाद निर्माण झाला होता. रणजी ट्रॉफीमध्ये 60 विकेट्स घेऊन धुमाकूळ ...
दिव्या देशमुखची मोठी बाजी
महिला गटात भारताच्या दिव्या देशमुखने कोनेरू हम्पीला आर्मागेडन टायब्रेकमध्ये पराभूत करून विजेतेपदाच्या शर्यतीत आपले स्थान कायम ठेवले आहे. या विजयामुळे दिव्याच्या खात्यात 10 गुण जमा झाले आहेत. महिला गटात तिने सातत्याने चांगली कामगिरी करुन दाखवली आहे. महिला गटात कझाकिस्तानची बिबिसारा असाउबायेवा साडेबारा गुणांसह अव्वल स्थानी आहे. दिव्या देशमुख दुसऱ्या स्थानावर असून पुढील फेरीत या दोघींमध्ये थेट सामना होणार आहे.
ओपन गटात रोमांचक स्पर्धा
ओपन गटात वेस्ली सो साडेबारा गुणांसह पहिल्या स्थानावर कायम आहे. अलीरेझा फिरोजा दहा गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे. तर प्रज्ञानानंदा, मॅग्नस कार्लसन आणि विन्सेंट कीमर प्रत्येकी नऊ गुणांसह तिसऱ्या स्थानांवर आहेत. या गटात चांगली चुरस पहायला मिळत आहे. टॉप तीन खेळांडूंच्या गुणांमध्ये फारसे अंतर नाही. त्यामुळे अखेरचे काही सामने आणखी रोमांचक होण्याची शक्यता आहे.
Mumbai : भारताची स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू हिने इंडोनेशिया ओपन सुपर 1000 स्पर्धेत विजयी सलामी दिली आहे. मंगळवारी झालेल्या पहिल्या फेरीच्या सामन्यात ...
भारतीय खेळाडूंचे पुनरागमन
सहाव्या फेरीत सर्व भारतीय खेळाडूंना पराभवाचा सामना करावा लागला होता. मात्र सातव्या फेरीत मिळालेल्या विजयांमुळे भारतीय चाहत्यांच्या आशा पुन्हा उंचावल्या आहेत. आता उर्वरित फेऱ्यांमध्ये प्रज्ञानानंद आणि दिव्या देशमुख यांच्याकडे विशेष लक्ष आहे.