वसई-विरारकरांसाठी मोठी खुशखबर! मेट्रो १३ मार्गिकेचा नवा आराखडा तयार, प्रवास होणार अधिक वेगवान

मुंबई : मुंबई महानगर प्रदेशातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी मेट्रो (Metro) नेटवर्कचा विस्तार वेगाने सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर वसई, विरार, नालासोपारा आणि भाईंदर परिसरातील नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. भाईंदर ते विरार दरम्यान प्रस्तावित असलेल्या मेट्रो १३ मार्गिकेचा सुधारित आराखडा मंजुरीसाठी शासनाकडे पाठवण्यात आला आहे.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (MMRDA) सध्या सुमारे ३३० किलोमीटर लांबीचे मेट्रो नेटवर्क विकसित करण्यात येत आहे. या नेटवर्कमध्ये एकूण १४ मेट्रो मार्गिकांचा समावेश असून काही मार्गिका सुरू झाल्या आहेत, तर काहींचे काम प्रगतीपथावर आहे. मात्र मेट्रो १३ मार्गिकेचे प्रत्यक्ष काम अद्याप सुरू झालेले नाही.



भाईंदर ते विरार या मार्गिकेचा मूळ आराखडा २०२० मध्ये तयार करण्यात आला होता. त्यावेळी संपूर्ण मार्गिका उन्नत स्वरूपात प्रस्तावित होती. मात्र परिसरातील वाढती लोकसंख्या, विकासकामे आणि बदललेली परिस्थिती लक्षात घेऊन नव्याने आराखडा तयार करण्यात आला आहे.

नवीन योजनेनुसार मेट्रो १३ मार्गिका सुमारे २४.९० किलोमीटर लांबीची असेल. यापैकी २१.६५ किलोमीटर भाग उन्नत तर ३.२५ किलोमीटर भाग भूमिगत असणार आहे. या मार्गिकेवर एकूण १७ स्थानकांची योजना करण्यात आली असून त्यापैकी १४ स्थानके उन्नत आणि ३ स्थानके भूमिगत असतील. व्हीव्हीएमसी फायर ब्रिगेड स्टेशन, अचोळे गाव आणि नालासोपारा पश्चिम ही स्थानके भूमिगत स्वरूपात उभारली जाणार आहेत.

या प्रकल्पातील आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे नायगाव खाडीवरील दुमजली पूल. या पुलाच्या खालच्या स्तरावर सहा पदरी रस्ता असेल, तर वरच्या स्तरावरून मेट्रो धावणार आहे.

मेट्रो १३ मार्गिका पूर्ण झाल्यानंतर भाईंदर, वसई, नालासोपारा आणि विरार परिसरातील नागरिकांचा प्रवास अधिक जलद, सुरक्षित आणि सोयीस्कर होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

 

 

 
Comments
Add Comment

Mumbai Crime : संतापजनक! मुंबईत सात वर्षाच्या मुलीवर अत्याचार, संतप्त नागरिकांचा रस्ता रोको आंदोलन

मुंबई : मुंबई (Mumbai) येथील पायधुनी परिसरात अत्यंत संतापजनक घटना उघडकीस आली आहे. एका ७ वर्षांच्या

Local Train News : केवळ स्थानकावरील प्लॅटफॉर्मवरूनच ट्रेनमध्ये चढावे व उतरावे; मध्य रेल्वेचे प्रवाशांना आवाहन

मध्य रेल्वे प्रवाशांना विनंती करते की त्यांनी केवळ स्थानकावरील प्लॅटफॉर्मवरूनच ट्रेनमध्ये चढावे व उतरावे आणि

Pratap Sarnaik : आषाढी यात्रेसाठी राज्य परिवहन महामंडळाकडून ५ हजार ५०० विशेष बसेस सोडणार..

ग्रुप बुकींग असल्यास राज्याच्या कोणत्याही गावातून थेट पंढरपूर पर्यंत बस मिळणार. पंढरपूर :- आषाढी यात्रेच्या

BMC News : पुढील वर्षी एप्रिल पर्यंत मिळणार १७० दशलक्ष लिटर पाणी- अतिरिक्त आयुक्तांचे आदेश

मलनिस्सारण प्रकल्पाचे काम नियोजित वेळेत वेगाने पूर्ण करण्याचे अतिरिक्त आयुक्तांचे आदेश मुंबई : समुद्रात

Mumbai-Pune Railway : मुंबई-पुणे रेल्वे सेवा ठप्प; प्रवाशांच्या मदतीला एसटी धावली, अतिरिक्त शिवनेरी बसेस सुरू

मुंबई : लोणावळा-कर्जत घाट विभागात झालेल्या भीषण भूस्खलनामुळे मुंबई-पुणे रेल्वे मार्गावरील वाहतूक मोठ्या

'Dhamaal 4' Movie : 'धमाल 4'चा बॉक्स ऑफिसवर धडाका; विकेंडला ६० कोटींचा टप्पा गाठण्याची शक्यता

मुंबई : अजय देवगण (Ajay Devgn) स्टारर 'धमाल 4' (Dhamaal 4) बॉक्स ऑफिसवर (Box Office) हिट (Hit) ठरण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे. दुसऱ्या