मुंबई : पावसाळ्यापूर्वी मुंबईतील नालेसफाईची सुमारे ८० टक्के कामे पूर्णत्वाकडे आली असली तरी नाल्यांमध्ये अजूनही तरंगता कचरा आढळत असल्याने नागरिकांनी नाल्यांमध्ये कचरा टाकू नये, असे आवाहन उपमहापौर संजय घाडी यांनी केले. नालेसफाई ही जशी महानगरपालिकेची जबाबदारी आहे, तशीच ती नागरिकांचीही असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.उपमहापौर घाडी यांनी मंगळवारी वांद्रे (पूर्व) परिसरातील विविध ठिकाणांची पाहणी केली. खेरवाडी नागरी आरोग्य केंद्र, पटेल नर्सिंग नथ्थुराम चौहान मंडई, तीन बंगला परिसरातील नाले, शांतीलाल कंपाऊंडमधील शौचालय नूतनीकरण काम, गोळीबार नाला, पूरनियंत्रण दरवाजे तसेच सांताक्रुझ येथील विष्णूप्रसाद नंदराय देसाई रुग्णालयाला त्यांनी भेट दिली.
सुरत : गुजरातच्या सुरत जिल्ह्यातील बारडोली जवळून जाणाऱ्या धुळे हायवेवर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या दोन एसटी बसचा अत्यंत थरकाप उडवणारा भीषण ...
खेरवाडी नागरी आरोग्य केंद्रातील २५ खाटांच्या प्रसूतिगृह इमारतीची दुरुस्ती तातडीने करण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. आरोग्य सेवांबाबत समाधान व्यक्त करताना परिसर स्वच्छता आणि सुशोभीकरणावर अधिक भर देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.पटेल नर्सिंग नथ्थुराम चौहान मंडईत मासळी विक्रेत्या महिलांशी संवाद साधून मंडईच्या नूतनीकरणाबाबत सूचना देण्यात आल्या. तसेच शांतीलाल कंपाऊंडमधील सार्वजनिक शौचालयाचे काम लवकर पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले.
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या कार्यकाळाला मंगळवार ९ जून २०२६ रोजी दोन वर्षे पूर्ण होतील. मोदी त्याच दिवशी नेहरूंना मागे टाकत ...
गोळीबार नाल्यावरील फ्लड गेट्सची पाहणी करताना पूरस्थिती टाळण्यासाठी आवश्यक त्या ठिकाणी अतिरिक्त उदंचन पंप बसविण्याची सूचना घाडी यांनी केली. विष्णूप्रसाद नंदराय देसाई रुग्णालयात डॉक्टर, कर्मचारी आणि रुग्णांशी संवाद साधत आरोग्य सेवांचा आढावा घेतला.यावेळी कार्डिनल ग्रेशस विद्यालयालाही त्यांनी भेट दिली. पावसाळ्यात शाळेच्या परिसरात पाणी साचण्याच्या समस्येकडे शाळा प्रशासनाने लक्ष वेधले असून त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचे आश्वासन घाडी यांनी दिले. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरी सुविधा, आरोग्य सेवा आणि पूरनियंत्रण यंत्रणा अधिक सक्षम करण्यावर भर देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.