Nitesh Rane : अनिकेत तटकरे यांच्या विजयात भाजपाचा सिंहाचा वाटा असेल : नितेश राणे

मुंबई : कोकण विधान परिषद निवडणुकीमध्ये महायुतीचे उमेदवार म्हणून अनिकेत तटकरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला. याआधी झालेल्या मेळाव्यात बोलताना, अनिकेत तटकरे यांच्या विजयामध्ये भाजपाचा सिंहाचा वाटा असेल असे राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी सांगितले. महायुतीचे व्यासपीठ पाहून निवडणुकीची आवश्यकता वाटत नाही, कारण कोकणच्या राजकारणातील सगळेच खेळाडू या व्यासपीठावर आहेत, मग लढणार कोणाशी असा सवाल त्यांनी उपस्थित केला.





महायुती एकजुटीने या निवडणुकीत उतरली आहे आणि जे मागे उरले आहेत त्यांच्यावर आम्ही आता दुर्बीण ठेवून लक्ष ठेवणार आहोत. खरंतर ही निवडणूक म्हणजे सगळा आकड्यांचा खेळ आहे. ही निवडणूक एकदिलाने लढवणार आहोत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण , खासदार नारायण राणे यांनी तसे निर्देश आम्हाला दिले आहेत, त्यामुळे सर्वच भाजपाच्या पदाधिकाऱ्यांच्यावतीने अनिकेत तटकरे यांना शुभेच्छा आणि २२ जूनच्या निकालामध्ये भाजपचा सिंहाचा वाटा असेल असा विश्वास नितेश राणे यांनी व्यक्त केला.



कोकण विधान परिषद निवडणुकीमध्ये अनिकेत तटकरे हे योग्य उमेदवार आहेत आणि चांगल्याला चांगले म्हणणे हा माणुसकीचा धर्म आहे. अनिकेत तटकरे यांनी यापूर्वीही आमदार म्हणून चांगले काम केले आहे. कोकण विकासासाठी त्यांची मेहनत नेहमी असते. कोकणचे दरडोई उत्पन्न वाढविण्यासाठी लक्ष असते, यापुढेही ते चांगले काम करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.



आम्ही महायुती आहोत तर समोर फक्त ५५ मते आहेत म्हणजे चणे कुरमुरे आहेत असे मंत्री नितेश राणे म्हणाले. बाळ माने हे विरोधात का निवडणूक लढवत आहेत ? त्यांना आणि त्यांच्यासोबतच्यांना ५५ मतदार सांभाळताना त्रास होईल. खेळीमेळीच्या वातावरणात निवडणूक घेऊ. नेहमी निवडणूक लढायची पीएच.डी. घ्यायची नाही असा टोला मंत्री नितेश राणेंनी मारला. आजचे हे चित्र पाहता ही निवडणूक बिनविरोध होऊ शकते, त्यामुळे फटाके घ्या असे सांगत सिंधुदुर्गमधे भाजपकडून पूर्ण सहकार्य मिळणार असल्याची ग्वाही मंत्री नितेश राणेंनी दिली.


राणे आणि तटकरे यांची मैत्री आजसाठी आदर्श


२०१८ ला सिंधुदुर्गने अनिकेत तटकरे यांना जास्त मतदान केले होते, त्यावेळी आम्ही स्वाभिमान पक्षात होतो. मात्र प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि खासदार राणे यांची राजकारणापलीकडची मैत्री आहे. हे तेव्हाही स्पष्ट होते. आजच्या काळात ही शिकण्यासारखी गोष्ट आहे असे नितेश राणे यावेळी म्हणाले.

Comments
Add Comment

MIDC : मृत मराठा आंदोलकांच्या वारसांना आता एमआयडीसीत नोकरी

जिल्हाधिकाऱ्यांना वारसांच्या पडताळणीचे निर्देश; सामान्य प्रशासन विभागाचे परिपत्रक जारी मुंबई : मराठा

Weater Update : राज्यातील २३ जिल्ह्यांना हायअलर्ट, मेघगर्जनेसह पाऊस, विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्याची शक्यता

मुंबई : पुढील २ दिवसांमध्ये केरळसह तमिळनाडूमध्ये मान्सून धडक मारण्याची शक्यता आहे. तर राज्यात पावसाला पोषक

Election : राज्यसभा आणि राज्य विधान परिषदा 2026 च्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर

नवी दिल्ली : भारतीय निवडणूक आयोगाने (ECI) तीन राज्यांतील विधान परिषदांच्या (आमदारांतर्फे होणाऱ्या) द्वैवार्षिक

Pratap Sarnaik: स्वच्छ, हरित आणि सक्षम एसटी घडवण्याचा संकल्प;

७८ हजार वृक्ष लागवड आणि इंधन बचतीची व्यापक मोहीम एसटीच्या ७८ व्या वर्धापन दिनानिमित्त परिवहन मंत्री प्रताप

Pune Crime : पुण्याच्या करडे घाटात गोळीबार, गँगस्टर ठार

पुणे : पुणे जिल्ह्यातील गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे. ताजी घटना शिरूर तालुक्यातील करडे घाट परिसरातली आहे. घाटात

दख्खनची राणी'चे ९७ व्या वर्षात पदार्पण

मुंबई : मध्य रेल्वेची अत्यंत लोकप्रिय आणि मानाची ट्रेन असलेल्या “डेक्कन क्वीन” (दख्खनची राणी) ने सोमवारी १ जून