Nitesh Rane : अनिकेत तटकरे यांच्या विजयात भाजपाचा सिंहाचा वाटा असेल : नितेश राणे

मुंबई : कोकण विधान परिषद निवडणुकीमध्ये महायुतीचे उमेदवार म्हणून अनिकेत तटकरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला. याआधी झालेल्या मेळाव्यात बोलताना, अनिकेत तटकरे यांच्या विजयामध्ये भाजपाचा सिंहाचा वाटा असेल असे राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी सांगितले. महायुतीचे व्यासपीठ पाहून निवडणुकीची आवश्यकता वाटत नाही, कारण कोकणच्या राजकारणातील सगळेच खेळाडू या व्यासपीठावर आहेत, मग लढणार कोणाशी असा सवाल त्यांनी उपस्थित केला.





महायुती एकजुटीने या निवडणुकीत उतरली आहे आणि जे मागे उरले आहेत त्यांच्यावर आम्ही आता दुर्बीण ठेवून लक्ष ठेवणार आहोत. खरंतर ही निवडणूक म्हणजे सगळा आकड्यांचा खेळ आहे. ही निवडणूक एकदिलाने लढवणार आहोत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण , खासदार नारायण राणे यांनी तसे निर्देश आम्हाला दिले आहेत, त्यामुळे सर्वच भाजपाच्या पदाधिकाऱ्यांच्यावतीने अनिकेत तटकरे यांना शुभेच्छा आणि २२ जूनच्या निकालामध्ये भाजपचा सिंहाचा वाटा असेल असा विश्वास नितेश राणे यांनी व्यक्त केला.



कोकण विधान परिषद निवडणुकीमध्ये अनिकेत तटकरे हे योग्य उमेदवार आहेत आणि चांगल्याला चांगले म्हणणे हा माणुसकीचा धर्म आहे. अनिकेत तटकरे यांनी यापूर्वीही आमदार म्हणून चांगले काम केले आहे. कोकण विकासासाठी त्यांची मेहनत नेहमी असते. कोकणचे दरडोई उत्पन्न वाढविण्यासाठी लक्ष असते, यापुढेही ते चांगले काम करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.



आम्ही महायुती आहोत तर समोर फक्त ५५ मते आहेत म्हणजे चणे कुरमुरे आहेत असे मंत्री नितेश राणे म्हणाले. बाळ माने हे विरोधात का निवडणूक लढवत आहेत ? त्यांना आणि त्यांच्यासोबतच्यांना ५५ मतदार सांभाळताना त्रास होईल. खेळीमेळीच्या वातावरणात निवडणूक घेऊ. नेहमी निवडणूक लढायची पीएच.डी. घ्यायची नाही असा टोला मंत्री नितेश राणेंनी मारला. आजचे हे चित्र पाहता ही निवडणूक बिनविरोध होऊ शकते, त्यामुळे फटाके घ्या असे सांगत सिंधुदुर्गमधे भाजपकडून पूर्ण सहकार्य मिळणार असल्याची ग्वाही मंत्री नितेश राणेंनी दिली.


राणे आणि तटकरे यांची मैत्री आजसाठी आदर्श


२०१८ ला सिंधुदुर्गने अनिकेत तटकरे यांना जास्त मतदान केले होते, त्यावेळी आम्ही स्वाभिमान पक्षात होतो. मात्र प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि खासदार राणे यांची राजकारणापलीकडची मैत्री आहे. हे तेव्हाही स्पष्ट होते. आजच्या काळात ही शिकण्यासारखी गोष्ट आहे असे नितेश राणे यावेळी म्हणाले.

Comments
Add Comment

Nitesh Rane : अंडी फेकली, पण लक्षात ठेवा ईद आणि मोहरमही येतोय, पुढे कसा कार्यक्रम...माझगावमधील घटनेनंतर मंत्री नितेश राणे आक्रमक, दिला कडक इशारा

मुंबई : मुंबईत गणेशोत्सवाचा उत्साह सुरू असतानाच, माझगाव परिसरातील 'माझगाव मोरया' (Mazgoan Morya) गणपतीच्या आगमन

Vikroli Women Suicide : विक्रोळीत वृध्द महिलेचा इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारण्याचा प्रयत्न; पोलिसांच्या सतर्कतेमुळे वाचला जीव

मुंबई : मुंबईतील विक्रोळी परिसरात इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या 65 वर्षीय

Vile Parle Crime : मुंबईतील संतापजनक घटना! द्रोणाचार्य पुरस्कार विजेत्या शिक्षकाने 16 वर्षीय विद्यार्थींनीला बोलावून घेतलं अन्...

मुंबई : मुंबईतील विलेपार्ले परिसरात द्रोणाचार्य पुरस्काराने सन्मानित 48 वर्षीय जिम्नॅस्टिक्स

Nashik : ‘मिशन ग्रीन मान्सून’च्या नवव्या टप्प्यात सिन्नर औद्योगिक क्षेत्रात वृक्षारोपण

Nashik : उन्नत नाशिक अभियानांतर्गत नाशिक शहर व जिल्हा हरित करण्याच्या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या ‘मिशन ग्रीन

Bhuleshwar Cha Raja : 'ऐकलं असतं तर ही वेळ आली नसती...' भुलेश्वरचा राजा प्रकरणात चक्रावून टाकणारा खुलासा

मुंबई : मुंबईतील गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी भुलेश्वर परिसरात काळीज पिळवटून टाकणारी दुर्घटना घडली.

Mumbai News : मुंबईत 11व्या मजल्यावरून पडून AC तंत्रज्ञाचा मृत्यू; पर्यवेक्षक आणि कंत्राटदार ताब्यात

मुंबई: मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुलातील (BKC) टेन बीकेसी कॉम्प्लेक्समध्ये एसी युनिट बसवताना 11व्या मजल्यावरून