Nitesh Rane : अनिकेत तटकरे यांच्या विजयात भाजपाचा सिंहाचा वाटा असेल : नितेश राणे

मुंबई : कोकण विधान परिषद निवडणुकीमध्ये महायुतीचे उमेदवार म्हणून अनिकेत तटकरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला. याआधी झालेल्या मेळाव्यात बोलताना, अनिकेत तटकरे यांच्या विजयामध्ये भाजपाचा सिंहाचा वाटा असेल असे राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी सांगितले. महायुतीचे व्यासपीठ पाहून निवडणुकीची आवश्यकता वाटत नाही, कारण कोकणच्या राजकारणातील सगळेच खेळाडू या व्यासपीठावर आहेत, मग लढणार कोणाशी असा सवाल त्यांनी उपस्थित केला.





महायुती एकजुटीने या निवडणुकीत उतरली आहे आणि जे मागे उरले आहेत त्यांच्यावर आम्ही आता दुर्बीण ठेवून लक्ष ठेवणार आहोत. खरंतर ही निवडणूक म्हणजे सगळा आकड्यांचा खेळ आहे. ही निवडणूक एकदिलाने लढवणार आहोत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण , खासदार नारायण राणे यांनी तसे निर्देश आम्हाला दिले आहेत, त्यामुळे सर्वच भाजपाच्या पदाधिकाऱ्यांच्यावतीने अनिकेत तटकरे यांना शुभेच्छा आणि २२ जूनच्या निकालामध्ये भाजपचा सिंहाचा वाटा असेल असा विश्वास नितेश राणे यांनी व्यक्त केला.



कोकण विधान परिषद निवडणुकीमध्ये अनिकेत तटकरे हे योग्य उमेदवार आहेत आणि चांगल्याला चांगले म्हणणे हा माणुसकीचा धर्म आहे. अनिकेत तटकरे यांनी यापूर्वीही आमदार म्हणून चांगले काम केले आहे. कोकण विकासासाठी त्यांची मेहनत नेहमी असते. कोकणचे दरडोई उत्पन्न वाढविण्यासाठी लक्ष असते, यापुढेही ते चांगले काम करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.



आम्ही महायुती आहोत तर समोर फक्त ५५ मते आहेत म्हणजे चणे कुरमुरे आहेत असे मंत्री नितेश राणे म्हणाले. बाळ माने हे विरोधात का निवडणूक लढवत आहेत ? त्यांना आणि त्यांच्यासोबतच्यांना ५५ मतदार सांभाळताना त्रास होईल. खेळीमेळीच्या वातावरणात निवडणूक घेऊ. नेहमी निवडणूक लढायची पीएच.डी. घ्यायची नाही असा टोला मंत्री नितेश राणेंनी मारला. आजचे हे चित्र पाहता ही निवडणूक बिनविरोध होऊ शकते, त्यामुळे फटाके घ्या असे सांगत सिंधुदुर्गमधे भाजपकडून पूर्ण सहकार्य मिळणार असल्याची ग्वाही मंत्री नितेश राणेंनी दिली.


राणे आणि तटकरे यांची मैत्री आजसाठी आदर्श


२०१८ ला सिंधुदुर्गने अनिकेत तटकरे यांना जास्त मतदान केले होते, त्यावेळी आम्ही स्वाभिमान पक्षात होतो. मात्र प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि खासदार राणे यांची राजकारणापलीकडची मैत्री आहे. हे तेव्हाही स्पष्ट होते. आजच्या काळात ही शिकण्यासारखी गोष्ट आहे असे नितेश राणे यावेळी म्हणाले.

Comments
Add Comment

Prashant Kishor : जनतेने बिहारसाठी 'चांगल्या' मुख्यमंत्र्याची निवड करण्याचा संदेश दिला, विजयानंतरची प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया

पाटणा : बिहारच्या बांकीपूर विधानसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत जन सुराज पक्षाचे संस्थापक आणि अध्यक्ष

Rain Update : 'पश्चिमी विक्षोभा'मुळे देशभरात मुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अनेक राज्यांना सतर्कतेचा इशारा

नवी दिल्ली : हवामान विभागाने देशभरात आठवडाभर मान्सून सक्रिय राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. उत्तर भारतातील

FYJC : अकरावी प्रवेशासाठी मंगळवार ४ ऑगस्टपासून विशेष फेरी

मुंबई : शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठीच्या इयत्ता अकरावी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत आतापर्यंत १५ लाखांहून

Devendra Fadnavis : राष्ट्रीय स्तरावर शालेय शिक्षणात महाराष्ट्राचे महत्त्वपूर्ण स्थान; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राज्यातील शालेय शिक्षण क्षेत्रात अभिनव उपक्रमांची अंमलबजावणी https://prahaar.in/2026/08/03/promotion-for-18-officers-of-the-legislature-secretariat/ शालेय

Mumbai Metro : मेट्रो -६ प्रकल्पाचे ८८ टक्के काम पूर्ण, कारशेडचा प्रश्न कायम

मुंबई : स्वामी समर्थ नगर-जोगेश्वरी-विक्रोळी मेट्रो-६चे काम अंतिम टप्प्यात पोहोचले असले तरी कांजुरमार्ग कारशेडचा

Chandrashekhar Bawankule : आमचा 'शेर' महाराष्ट्रात प्रचंड ताकद निर्माण करतोय!

- महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून मंत्री नितेश राणे यांच्याबद्दल गौरवोद्गार - नितेश राणे