Devendra Fadnavis : २०४७ पर्यंत 'एसटी'च्या सर्व बस इलेक्ट्रिक होणार

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; ई-बसेससाठी चार्जिंग स्टेशनचे जाळे उभारण्याचे निर्देश

मुंबई : राज्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा चेहरामोहरा बदलून ती पूर्णपणे पर्यावरणपूरक आणि आधुनिक करण्यासाठी राज्य सरकारने पावले उचलली आहेत. 'विकसित महाराष्ट्र' संकल्पनेचा भाग म्हणून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) ताफ्यातील सर्वच्या सर्व बसेस टप्प्याटप्प्याने इलेक्ट्रिक (ई-बसेस) करण्यात येणार असून, सन २०४७ पर्यंत १०० टक्के 'एसटी' ताफा ई-बसेसमध्ये रूपांतरीत केला जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी दिली. या महत्त्वाकांक्षी उद्दिष्टाच्या अनुषंगाने राज्यात ई-बसेससाठी आवश्यक असलेल्या चार्जिंग स्टेशनचे जाळे उभारण्याच्या कामाला तीव्र गती देण्याचे निर्देशही त्यांनी प्रशासनाला दिले.

amp/"> amp/" class="section-post-content-internal-post-title">Aditi Tatkare : ८० लाख लाडक्या बहिणी वगळल्या नाहीत!

मंत्री आदिती तटकरे; ई-केवायसी केलेली एकही महिला लाभापासून वंचित राहणार नाही मुंबई : 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने'तून तब्बल ८० लाख महिलांना ...



मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली 'वर्षा' निवासस्थानी एसटी महामंडळाच्या ई-बसेससंदर्भातील आढावा बैठक पार पडली. या बैठकीला परिवहन मंत्री प्रताप सरनाईक (दूरदृश्य प्रणालीद्वारे), मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव लोकेश चंद्र, अपर मुख्य सचिव संजय सेठी, एसटीचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर, मुख्यमंत्र्यांचे गुंतवणूक सल्लागार कौस्तुभ धवसे व उपसचिव चेतन निकम प्रामुख्याने उपस्थित होते.



एसटी महामंडळाच्या ताफ्याचे ई-बसेसमध्ये रूपांतर करण्यासाठी सरकारने निश्चित कालमर्यादा आखली आहे. यानुसार सन २०२९ पर्यंत ५० टक्के, २०३५ पर्यंत ८० टक्के, तर स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात म्हणजेच २०४७ पर्यंत १०० टक्के ताफा पूर्णपणे इलेक्ट्रिक केला जाईल. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी काही महत्त्वाच्या सूचना केल्या. त्यानुसार, पर्यावरणपूरक ई-बसेस ज्या मार्गांवर चालवल्या जाणार आहेत, त्या मार्गांचा अभ्यास करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाची मदत घेतली जावी. पुरवठादाराकडून नवीन ई-बस प्राप्त होताच पुढील ७ दिवसांत तिचे तांत्रिक निरीक्षण व चाचणी पूर्ण करावी. ज्या प्रमुख मार्गांवर सध्या खाजगी बसेस मोठ्या प्रमाणावर धावतात, त्या मार्गांचा विशेष अभ्यास करून तिथे प्रवाशांसाठी एसटीच्या ई-बसेसचा सक्षम पर्याय तयार ठेवावा, असे निर्देश देण्यात आले.

amp/">
amp/" class="section-post-content-internal-post-title">Aditi Tatkare : ८० लाख लाडक्या बहिणी वगळल्या नाहीत!

मंत्री आदिती तटकरे; ई-केवायसी केलेली एकही महिला लाभापासून वंचित राहणार नाही मुंबई : 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने'तून तब्बल ८० लाख महिलांना ...



ई-वाहन धोरणांतर्गत आर्थिक प्रोत्साहन

- राज्य शासनाच्या विद्यमान ई-वाहन धोरणांतर्गत सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढविण्यासाठी विशेष प्रोत्साहन दिले जात आहे. या धोरणानुसार, १ हजार ५०० ई-बसेसना बसच्या मूळ किमतीच्या १० टक्के किंवा कमाल २० लाख रुपये इतके आर्थिक अनुदान देण्याची तरतूद करण्यात आली आहे. राज्यातील सार्वजनिक वाहतूक अधिक शाश्वत आणि प्रदूषणमुक्त करण्यासाठी हे धोरण महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
- सध्या एसटी महामंडळ जीसीसी मॉडेलवर ५ हजार १५० ई-बसेसचा अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबवत आहे. या प्रकल्पामुळे राज्यातील सर्वसामान्य प्रवाशांना आगामी काळात अधिक आधुनिक, आरामदायी आणि पूर्णपणे प्रदूषणमुक्त प्रवासाची उत्तम सुविधा उपलब्ध होईल, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.
Tags
Devendra Fadnavispratap sarnaikMSRTCElectric busesST Bus ElectricEco-friendly TransportChargingCharging Station MaharashtraMaharashtra Public TransportMSRTC E-Buses 2047

Comments
Add Comment

BMC News : मलनि:सारण वाहिन्यांसह प्रक्रिया केंद्रांच्या कामांसाठी १२ सल्लागार कंपन्यांचे पॅनेल

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईच्या हद्दीतील कोणत्याही भौगोलिक क्षेत्रात मलनिःसारण वाहिन्यांचे जाळे

Pratap Sarnaik : एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ५ टक्क्यांनी वाढ

- प्रताप सरनाईकांची विधानसभेत घोषणा; ५३ टक्क्यांवरून ५८ टक्क्यांपर्यंत वाढ करणार Pratap Sarnaik : मुंबई : राज्य परिवहन

#HBDNiteshRane : सोशल मीडियावर मंत्री नितेश राणेंच्या वाढदिवसाचा बोलबाला

- 'ट्विटर'वर हॅशटॅग प्रथम क्रमांकावर; राजकीय नेत्यांसह नेटिझन्सकडून शुभेच्छांचा वर्षाव मुंबई : राज्याचे पावसाळी

Mumbai Rain: मुंबईत पावसाची दमदार हजेरी; ४८ तासांत मोठी अपडेट

Mumbai Rain : मुंबई : मुंबईकरांसाठी (Mumbai) अखेर दिलासादायक बातमी समोर आली आहे. गेल्या अनेक दिवसांप

BMC: सो व्हॉट? महापालिका अधिकाऱ्याचा अरेरावीपणा

लोकप्रतिनिधीच्या अवमान प्रकरणी महापालिका राजशिष्टाचार अधिकारी यांच्या विधी समितीत निलंबनाचा ठराव मुंबई

Kunal Shah : मुंबईकर कुणाल शाह चर्चेत; FreeCharge ते CRED असा प्रेरणादायी प्रवास

मुंबई : विल्सन कॉलेजमधून फिलॉसॉफी विषयात पदवी घेतल्यानंतर मॅनेजमेंटचे शिक्षण अर्धवट सोडणाऱ्या मुंबईकर कुणाल