Accidental News : शिर्डी-नाशिक महामार्गावर भीषण अपघात; एसटी बस-कारची जोरदार धडक, दोघांचा जागीच मृत्यू...

Shirdi-Nashik Highway : अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी-नाशिक महामार्गावर रविवारी भीषण अपघात झाला. राज्य परिवहन महामंडळाची (एसटी) बस आणि एर्टिगा कार यांच्यात समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर सुमारे १५ जण जखमी झाले आहेत. अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. मिळालेल्या माहितीनुसार, पनवेलहून शिर्डीकडे जाणारी एसटी बस नियमित प्रवासी वाहतूक करत होती. त्याचवेळी नाशिकच्या दिशेने जाणारी एर्टिगा कार सावळीविहीर परिसरातून जात असताना दोन्ही वाहनांची समोरासमोर भीषण धडक झाली. धडकेचा जोर इतका प्रचंड होता की कारचा चेंदामेंदा झाला.


दोघांचा जागीच मृत्यू, १५ जखमी


या भीषण अपघातात कारमधील दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. तर बस आणि कारमधील मिळून सुमारे १५ जण जखमी झाले आहेत. काही जखमींना किरकोळ दुखापती झाल्या आहेत तरा काहींची प्रकृती चिंताजनक आहे.


पोलिसांकडून तातडीने बचावकार्य


अपघाताची माहिती मिळताच शिर्डी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने तातडीने बचावकार्य सुरू केले. जखमींना वाहनांमधून बाहेर काढण्यात आले. गंभीर जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. यासाठी पोलिसांच्या व्हॅनचा वापर करण्यात आला. सर्वांना शिर्डी येथील साईबाबा संस्थानच्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.अपघातानंतर शिर्डी-नाशिक महामार्गावर काही काळ वाहतुकीची कोंडी झाली होती. पोलिसांनी आणि स्थानिक नागरिकांनी संयुक्तपणे प्रयत्न करत वाहतूक सुरळीत केली. दरम्यान, अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. सध्या पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. अपघातामुळे मृतांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तर जखमींवर उपचार सुरू असून त्यांच्या प्रकृतीवर डॉक्टरांचे लक्ष आहे. शिर्डी-नाशिक महामार्गावरील या दुर्घटनेने पुन्हा एकदा रस्ते सुरक्षेचा प्रश्न चर्चेत आला आहे.

Comments
Add Comment

DCM Sunetra Pawar : महिला शेतकऱ्यांना हक्क व सन्मान मिळवून देण्यासाठी शासन कटिबद्ध- उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित पत्रकार परिषद मुंबई : महिला शेतकऱ्यांना त्यांचे हक्क आणि सन्मान

Monsoon News : अरबी समुद्रात चक्राकार वारे, राज्यात मान्सूनच्या प्रवासाला वेग; १ जुलैपासून मान्सून पूर्ण सक्रिय होणार

मुंबई : महाराष्ट्रात जून महिन्याच्या सुरुवातीला दाखल झालेला मान्सून गेल्या काही दिवसांपासून रखडल्यामुळे

८.६ लाख मेट्रिक टन कच्चे तेल घेऊन तीन टँकर भारताकडे रवाना ऊर्जा पुरवठा सुरक्षेला मोठा दिलासा

नवी दिल्ली : भारताच्या सागरी आणि ऊर्जा सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची घडामोड घडली आहे. भारतीय ध्वज असलेले तीन

Indian Navy : भारताच्या नौदल ताफ्यात तीन स्वदेशी युद्धनौकांचा समावेश वाढती क्षमता, आत्मनिर्भरता, आधुनिकीकरणाचे प्रतीक

नवी दिल्ली : भारतीय नौदलाच्या इतिहासात आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठत रविवारी एकाच वेळी तीन अत्याधुनिक स्वदेशी

NEET Exam : कडक सुरक्षा आणि कडक नियमांमध्ये ‘नीट’ परीक्षा उशिरा आलेल्यांना प्रवेश नाकारल्याने गोंधळ

नवी दिल्ली : ३ मे रोजी झालेली मूळ परीक्षा पेपर फुटीमुळे रद्द झाल्यानंतर, रविवारी देशभरात कडक सुरक्षेमध्ये

Ratnagiri : गणपतीपुळे दुर्घटनेतील उर्वरित चार तरुणांचे मृतदेहही सापडले

रत्नागिरी : गणपतीपुळे येथे पर्यटनासाठी आलेल्या आणि समुद्रात बुडून बेपत्ता झालेल्या छत्रपती संभाजीनगर