Mumbai-Goa Highway Accident : उभ्या कंटेनरला कारची भीषण धडक; दोन जणांचा जागीच मृत्यू, कुटुंबावर दुःखाचा डोंगर...

पोलादपूर: मुंबई-गोवा महामार्गावर पुन्हा एकदा भीषण अपघाताची घटना घडली आहे. पोलादपूरजवळ झालेल्या या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एक जण गंभीर जखमी आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अनिल मार्कंडे हे आपल्या कुटुंबासह कारने मुंबई-गोवा महामार्गावरून दापोलीकडे जात होते. त्यांच्या कारची रस्त्याच्या कडेला उभ्या कंटेनरला जोराची धडक बसली. धडक एवढी जोराची होती की कारचा चेंदामेंदा झाला.



या अपघातात सुवर्णा मार्कंडे आणि अनुशी अनिल मार्कंडे यांचा जागीच मृत्यू झाला. तर अनिल मार्कंडे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आणखी एक जण किरकोळ जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.अपघाताची माहिती मिळताच पोलादपूर पोलीस आणि स्थानिक नागरिक घटनास्थळी दाखल झाले. कारमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी जेसीबीची मदत घ्यावी लागली. जखमींना तातडीने पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारांनंतर गंभीर जखमी अनिल मार्कंडे यांना पुढील उपचारांसाठी माणगाव येथे नेण्यात आले आहे.मुंबई-गोवा महामार्गावरील वाढत्या अपघातांमुळे पुन्हा एकदा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. विशेषतः महामार्गावर उभ्या असलेल्या जड वाहनांमुळे अपघातांची संख्या वाढत असल्याची चर्चा होत आहे. या दुर्घटनेमुळे एका कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात शोककळा पसरली आहे. पोलिसांकडून अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू आहे.

Comments
Add Comment

Dapoli Mahabaleshwar highway : दापोली–पोलादपूर–महाबळेश्वर राष्ट्रीय महामार्गासाठी प्रवीण दरेकरांची गडकरींकडे मागणी

मुंबई : दापोली–पोलादपूरमार्गे महाबळेश्वर राष्ट्रीय महामार्गाला मंजुरी देण्याची मागणी भाजपचे गटनेते तथा आमदार

Rice productivity : कोकणातील तांदूळ उत्पादकतेत १२ टक्क्याने घट

खारजमिनीत वाढ, हवामान बदल आणि वाढत्या नागरिकरणाचा विपरीत परिणाम रायगड : कोकण किनारपट्टीचे मुख्य, पारंपरिक आणि

Nitesh Rane : महाडला मिळणार आधुनिक मच्छी मार्केट; १५ दिवसांत प्रस्ताव सादर करण्याचे नितेश राणेंचे निर्देश

मुंबई : प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेअंतर्गत रायगड जिल्ह्यातील महाड शहरात आधुनिक मच्छी मार्केट इमारत

MLA Pramod Jathar : 'वनतारा'च्या धर्तीवर तिलारी खोऱ्यात राष्ट्रीय उद्यान?

- भाजप आमदार प्रमोद जठार यांची मागणी; वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मुंबई : सिंधुदुर्ग

Ratnagiri : गणपतीपुळे दुर्घटनेतील उर्वरित चार तरुणांचे मृतदेहही सापडले

रत्नागिरी : गणपतीपुळे येथे पर्यटनासाठी आलेल्या आणि समुद्रात बुडून बेपत्ता झालेल्या छत्रपती संभाजीनगर

RTI : माहिती अधिकार कायद्यात मोठे बदल; महाराष्ट्र शासनाचे नवे नियम लागू

रायगड : माहितीचा अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत अर्जदारांसाठी महाराष्ट्र शासनाने काही महत्त्वपूर्ण बदल लागू केले