Hardik Pandya : हार्दिक पांड्याचं कर्णधारपद धोक्यात; व्यवस्थापनाचा संयम संपला...

Mumbai : तब्बल पाच वेळा आयपीएल जिंकलेली मुंबई इंडियन्स सध्या मोठ्या संकटातून जात आहे. आयपीएल २०२६ मध्ये मुंबई इंडियन्सची कामगिरी अत्यंत निराशाजनक ठरली. संघाला १४ पैकी फक्त ४ सामने जिंकता आले. संघ गुणतालिकेत नवव्या स्थानावर राहिला. सलग सहाव्या वर्षी ट्रॉफीपासून दूर राहिल्यानंतर आता संघ व्यवस्थापनाचा संयम संपल्याची चर्चा रंगू लागली आहे. या पार्श्वभूमीवर हार्दिक पांड्याला MI मधून वगळण्यात येणार असल्याच्या बातम्या येऊ लागल्या आहेत. अद्याप MI व्यवस्थापनाचा अधिकत निर्णय आलेला नाही. पण चाहत्यांमध्ये हार्दिकला MI मधून बाहेरचा रस्ता दाखवला जाणार असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे.


हार्दिकच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह


हार्दिक पांड्याने २०२४ मध्ये गुजरातमधून मुंबईमध्ये पुनरागमन केले होते. त्यामुळे रोहित शर्माला कर्णधारपदापासून दूर करण्यात आले होते. मात्र हार्दिकच्या नेतृत्वाखाली संघाला अपेक्षित यश मिळालं नाही. २०२५ मध्ये मुंबई प्लेऑफपर्यंत पोहोचली खरी, पण फायनल गाठण्यात संघाला अपयश आले होते. त्यानंतर २०२६ मध्ये संघाची कामगिरी आणखी खालावली. त्यामुळे हार्दिकचं कर्णधारपदच नव्हे, तर अंतिम संघातील त्याच्या स्थानावरही शंका व्यक्त केली जात आहे.


व्यवस्थापन नाराज?


काही मीडिया रिपोर्टनुसार, संघ व्यवस्थापन हार्दिकच्या रणनीती आणि नेतृत्वावर समाधानी नसल्याचं बोललं जात आहे. पॉवरप्लेचा योग्य वापर करण्यात अपयश, बदलत्या टी-२० क्रिकेटशी जुळवून न घेणं आणि प्रशिक्षकांच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी न होणं हे मोठे मुद्दे मानले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर आगामी हंगामापूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठे बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


गुजरातमध्ये सुपरहिट, मुंबईत संघर्ष


विशेष म्हणजे २०२२ मध्ये मुंबई इंडियन्सने हार्दिकला रिलीज केलं होतं. त्यानंतर त्याने गुजरात टायटन्सचे नेतृत्व स्वीकारत पहिल्याच हंगामात संघाला विजेतेपद मिळवून दिलं होतं. पुढच्या वर्षीही गुजरात फायनलमध्ये पोहोचली होती. मात्र मुंबईत पुनरागमनानंतर हार्दिकला तोच प्रभाव निर्माण करता आला नाही. त्यामुळे पुढील काही दिवसांत मुंबई इंडियन्सचे व्यवस्थापन मोठा निर्णय घेऊ शकते, अशी चर्चा जोर धरू लागली आहे.


रोहित पुन्हा कर्णधार?


सोशल मीडियावर चाहत्यांमध्ये आता एकच प्रश्न चर्चेत आहे हार्दिक बाहेर आणि रोहित पुन्हा कॅप्टन ? अद्याप याबाबतची अधिकृत घोषणा झालेली नाही. पण MI चे व्यवस्थापन लवकरच निर्णय घेणार असल्याचे समजते.

Comments
Add Comment

Nashik News : राष्ट्रकुलमध्ये नाशिकच्या सुपुत्राची सुवर्ण झेप; लेकाने 'गोल्ड' जिंकल्याची बातमी शिक्षकांच्या फोनवरून कळली, शाळेत पालकांचा सत्कार

Nashik News : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये भारताच्या पॅरा-अॅथलेटिक्स संघाने ऐतिहासिक कामगिरी करत देशाची मान

CWG 2026 : नीरजसह तीन भारतीय भालाफेकपटू अंतिम फेरीत

ग्लासगो : दोन वेळचा ऑलिम्पिक पदक विजेता नीरज चोप्रा २०२६ च्या राष्ट्रकुल खेळांमधील पुरुषांच्या भालाफेक

England Coach Change : ईसीबीचा मोठा निर्णय! ब्रेंडन मॅक्युलमच्या जागी स्टीफन फ्लेमिंग यांची इंग्लंडच्या कसोटी प्रशिक्षकपदी नियुक्ती

मुंबई : इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने (ECB) गुरुवार, ३० जुलै रोजी कसोटी संघाच्या व्यवस्थापनात मोठे बदल केले

Commonwealth Games 2026 : नीरज चोप्रा विरुद्ध अर्शद नदीम यांच्यात होणार रोमहर्षक महामुकाबला; जाणून घ्या थेट प्रक्षेपणाची संपूर्ण माहिती

जागतिक स्तरावर भालाफेक (Javelin Throw) क्षेत्रातील दोन सर्वात मोठी आणि लोकप्रिय नावे पुन्हा एकदा आमनेसामने येण्यासाठी

Ajinkya Rahane : जे अनेक दिग्गजांना जमले नाही, ते अजिंक्यने करून दाखवले; अजिंक्यच्या कर्णधारपदाची अविस्मरणीय कामगिरी

मुंबई : भारतीय क्रिकेटमध्ये अजिंक्य राहणेचा पर्व आता संपुष्टात आले आहे. अजिंक्य राहणेने ३८ व्या वर्षी

Ajinkya Rahane Retire : "तुम्ही मला परकं मानलं नाही..."; निवृत्तीची घोषणा करताना अजिंक्य रहाणेचा कंठ दाटला, भावुक व्हिडिओ शेअर करत म्हणाला...

मुंबई : भारतीय क्रिकेट संघातील अत्यंत शांत, संयमी आणि कठीण काळात संघाचा 'संकटमोचक' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माजी