Hardik Pandya : हार्दिक पांड्याचं कर्णधारपद धोक्यात; व्यवस्थापनाचा संयम संपला...

Mumbai : तब्बल पाच वेळा आयपीएल जिंकलेली मुंबई इंडियन्स सध्या मोठ्या संकटातून जात आहे. आयपीएल २०२६ मध्ये मुंबई इंडियन्सची कामगिरी अत्यंत निराशाजनक ठरली. संघाला १४ पैकी फक्त ४ सामने जिंकता आले. संघ गुणतालिकेत नवव्या स्थानावर राहिला. सलग सहाव्या वर्षी ट्रॉफीपासून दूर राहिल्यानंतर आता संघ व्यवस्थापनाचा संयम संपल्याची चर्चा रंगू लागली आहे. या पार्श्वभूमीवर हार्दिक पांड्याला MI मधून वगळण्यात येणार असल्याच्या बातम्या येऊ लागल्या आहेत. अद्याप MI व्यवस्थापनाचा अधिकत निर्णय आलेला नाही. पण चाहत्यांमध्ये हार्दिकला MI मधून बाहेरचा रस्ता दाखवला जाणार असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे.


हार्दिकच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह


हार्दिक पांड्याने २०२४ मध्ये गुजरातमधून मुंबईमध्ये पुनरागमन केले होते. त्यामुळे रोहित शर्माला कर्णधारपदापासून दूर करण्यात आले होते. मात्र हार्दिकच्या नेतृत्वाखाली संघाला अपेक्षित यश मिळालं नाही. २०२५ मध्ये मुंबई प्लेऑफपर्यंत पोहोचली खरी, पण फायनल गाठण्यात संघाला अपयश आले होते. त्यानंतर २०२६ मध्ये संघाची कामगिरी आणखी खालावली. त्यामुळे हार्दिकचं कर्णधारपदच नव्हे, तर अंतिम संघातील त्याच्या स्थानावरही शंका व्यक्त केली जात आहे.


व्यवस्थापन नाराज?


काही मीडिया रिपोर्टनुसार, संघ व्यवस्थापन हार्दिकच्या रणनीती आणि नेतृत्वावर समाधानी नसल्याचं बोललं जात आहे. पॉवरप्लेचा योग्य वापर करण्यात अपयश, बदलत्या टी-२० क्रिकेटशी जुळवून न घेणं आणि प्रशिक्षकांच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी न होणं हे मोठे मुद्दे मानले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर आगामी हंगामापूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठे बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


गुजरातमध्ये सुपरहिट, मुंबईत संघर्ष


विशेष म्हणजे २०२२ मध्ये मुंबई इंडियन्सने हार्दिकला रिलीज केलं होतं. त्यानंतर त्याने गुजरात टायटन्सचे नेतृत्व स्वीकारत पहिल्याच हंगामात संघाला विजेतेपद मिळवून दिलं होतं. पुढच्या वर्षीही गुजरात फायनलमध्ये पोहोचली होती. मात्र मुंबईत पुनरागमनानंतर हार्दिकला तोच प्रभाव निर्माण करता आला नाही. त्यामुळे पुढील काही दिवसांत मुंबई इंडियन्सचे व्यवस्थापन मोठा निर्णय घेऊ शकते, अशी चर्चा जोर धरू लागली आहे.


रोहित पुन्हा कर्णधार?


सोशल मीडियावर चाहत्यांमध्ये आता एकच प्रश्न चर्चेत आहे हार्दिक बाहेर आणि रोहित पुन्हा कॅप्टन ? अद्याप याबाबतची अधिकृत घोषणा झालेली नाही. पण MI चे व्यवस्थापन लवकरच निर्णय घेणार असल्याचे समजते.

Comments
Add Comment

Ind vs Eng : लॉर्ड्सवर भारत आणि इंग्लंड महिला संघामध्ये ऐतिहासिक कसोटी सामना

लंडन: क्रिकेटचे सर्वात प्रतिष्ठित मैदान असलेल्या लॉर्ड्सवर शुक्रवारी पहिला महिला कसोटी सामना खेळला जाणार असून,

Abhishek Sharma : क्रिकेटपटू अभिषेक शर्माच्या प्रकरणात न्यायालयाकडून समन्स जारी

आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार नवी दिल्ली : दिल्ली उच्च न्यायालयाने, भारतीय क्रिकेटपटू अभिषेक

Sai Kishore : भारतीय फिरकी गोलंदाज साई किशोर ग्लॉस्टरशायरकडून काउंटी क्रिकेटमध्ये पुनरागमन करणार

भारताचा डावखुरा फिरकी गोलंदाज आर. साई किशोर (Sai Kishore) पुन्हा एकदा इंग्लंडमध्ये काउंटी क्रिकेट खेळणार आहे. या २९

IND vs ENG: निर्णायक सामन्यापूर्वी भारतीय संघात मोठे बदल ! तिलक,वरुण संघातून बाहेर;संजू सॅमसनचे पुनरागमन ?

ब्रिस्टल : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील चौथा सामना गुरुवारी (9 जुलै) ब्रिस्टलच्या

World Cup Quarter-final : बेल्जियमने स्पेनविरुद्धच्या 'महायुद्धा'साठी कंबर कसली; खेळाडूंच्या नृत्याची चर्चा

लॉस एंजेलिस: अमेरिकेवर दणदणीत विजय मिळवून उपांत्यपूर्व फेरीत धडक मारल्यानंतर, आता बेल्जियमचा संघ पूर्णपणे

WI vs SL : वेस्ट  इंडिजचा ऐतिहासिक विजय मात्र, आयसीसीने ठोठावले दंड; नेमकं कारण काय ? 

बार्बुडा: वेस्ट इंडिजने श्रीलंकेविरुद्धची दोन सामन्यांची कसोटी मालिका १-० ने जिंकून इतिहास रचला आहे. रॉस्टन