Nagpur Heatwave : नागपुरात उष्णतेची तीव्र लाट, गेल्या २४ तासांत उष्माघातामुळे ११ जणांचा मृत्यू ?

नागपूर : नागपूरमध्ये उष्णतेची तीव्र लाट कायम आहे. गेल्या २४ तासांत उष्माघातामुळे ११ जणांचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. नागपुरात सलग सात दिवस तापमान ४५ अंश सेल्सिअसच्या वर होते. नागपूरसह संपूर्ण विदर्भात सध्या तीव्र उष्णतेची लाट असून, नागरिकांना या उन्हाचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. नागपूरमध्ये बुधवारी सलग सातव्या दिवशी तापमान ४५ अंश सेल्सिअसच्या वर नोंदवले गेले. या भीषण उष्णतेच्या काळात गेल्या २४ तासांत उष्माघाताच्या संशयास्पद स्थितीमुळे ११ जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तीव्र उन्हामुळे शहरातील रुग्णालयांच्या शवागारांमध्ये अज्ञात मृतदेहांची संख्या वाढली आहे. गेल्या तीन दिवसांत शहराच्या विविध भागांतून एकूण १४ मृतदेह हाती आले असून, त्यापैकी फक्त बुधवारीच ११ मृतदेह आढळली आहेत. बहुतांश मृतदेह दुपारच्या कडक उन्हाच्या वेळेत आढळल्याने हे मृत्यू उष्माघाताशी संबंधित असल्याचा दाट संशय आहे.



रेल्वे स्थानक आणि धावत्या गाड्यांमध्ये ५ प्रवाशांचा मृत्यू :


गेल्या २४ तासांत नागपूर रेल्वे स्टेशन आणि शहरातून जाणाऱ्या गाड्यांच्या अनारक्षित व स्लीपर कोचमधून ५ मृतदेह आढळले आहेत. यामध्ये नागपूर रेल्वे स्टेशनच्या आवारात दोन अज्ञात मृतदेह आढळून आले, तर शहरातून जाणाऱ्या धावत्या गाड्यांमध्ये तीन प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. रेल्वे अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, प्रचंड उष्णता, प्रवाशांचे आजारपण आणि डब्यांमधील गुदमरल्यासारख्या परिस्थितीमुळे हे मृत्यू झाले असावेत.



शहरातील वेगवेगळ्या परिसरात आढळले मृतदेह :


रेल्वे स्थानकाव्यतिरिक्त उर्वरित ५ मृतदेह शहरातील लकडगंज, कळमना, सक्करदरा आणि ताजबाग परिसरात पडून असलेले आढळले. लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका उड्डाणपुलाजवळ ६५ वर्षीय वृद्धाचा मृतदेह आढळला. तसेच, कळमना येथील एपीएमसी (APMC) फळ बाजारातून एका ५० वर्षीय पुरुषाचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला. सक्करदरा येथील नंदनवन भागात एका उड्डाणपुलाजवळ सुमारे ५० वर्षांचा एक व्यक्ती बेशुद्ध अवस्थेत सापडला. त्यानंतर दुपारच्या वेळी ताजबाग येथील सुफी दर्ग्याजवळ आणि एका संकुलाजवळून अनुक्रमे ५५ आणि ६० वर्षे वयोगटातील आणखी दोन पुरुषांचे मृतदेह आढळले.



तीन दिवसांतील एकूण आकडेवारी १४ वर :


यापूर्वी २५ ते २६ मे दरम्यान शहराच्या विविध भागांतून आणखी तीन मृतदेह सापडले गेले होते. यामध्ये शासकीय, वैद्यकीय, महाविद्यालय, व रुग्णालय जवळ एक, हिंगणा येथे ३५ ते ४० वर्षे वयोगटातील एक आणि पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अशोक चौकाजवळ सुमारे ४५ वर्षे वयोगटातील तिसरा मृतदेह सापडला होता.सध्या पोलिसांनी या सर्व प्रकरणांमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद केली असून मृतांची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

Comments
Add Comment

Maharashtra Rain Alert : पुढील २४ तासांत मुसळधार पावसाची शक्यता, २३ जिल्ह्यांना यलो अलर्ट

मुंबई : राज्यात मान्सून (Monsoon) पुन्हा सक्रिय झाला असून पुढील २४ तास अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. हवामान विभागाने (India

Ketan Agrawal Murder Case : 'खून मी नाही, त्याने केला!'... केतन अग्रवाल हत्याकांडात नवा ट्विस्ट; पोलिसही चक्रावले

Ketan Agrawal Murder Case : आधी कॉफी, मग कट? केतन हत्येपूर्वी सिया-चेतनची तासभर चर्चा

कॅफेत बसून रचला गेला होता प्लॅन? पुणे :  पुण्यातील लोहगड (Lohgad) किल्ल्यावर व्यावसायिक केतन अग्रवाल याच्या मृत्यू (Death)

Nitesh Rane : मच्छिमारांच्या सुविधांसाठी दिघी जेट्टी प्रकल्प पावसाळा संपल्यानंतर तातडीने मार्गी लावा

मुंबई, : रायगड(raigad) जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील मौजे दिघी येथील मच्छिमार जेट्टी प्रकल्प तसेच परिसरातील गाळ

अवकाळी पावसाने बाधित शेतकऱ्यांना ३३४ कोटी ९८ लाख रुपयांच्या मदतीस मंजुरी

कोकणातील आंबा व काजू उत्पादकांना मोठा दिलासा मुंबई दि.  २५ : एप्रिल व मे २०२६ या कालावधीत राज्यातील विविध

Sanjay Raut : खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्यांवर कारवाईची मागणी

शिवसेना महिला सेनेकडून मुंबई पोलीस आयुक्तांना निवेदन, कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा मुंबई, दि. २५ जून