Water Management : तलावांमध्ये १७ टक्केच पाणीसाठा शिल्लक

पाणी जपून वापरण्याचे मुंबईकरांना आवाहन


मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांमध्ये फक्त २,५८,४१० द. श. लि. (१७.८५ टक्के) इतका पाणीसाठा शिल्लक आहे. पुढील ६१ दिवस म्हणजेच किमान दोन महिने पुरेल इतकाच पाणीसाठा उरल्याने आणि अल निनो वादळाचा प्रभाव, त्याचा पावसावर विपरित परिणाम होण्याची शक्यता असल्याने पाणी जपून वापरावे, असे आवाहन पालिकेने केले आहे.मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांतून दररोज ४,२०० दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा करण्यात येतो. त्यामध्ये ठाणे, भिवंडी महापालिकेचा २०० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा समाविष्ट आहे. आगामी काळात मुंबईसह राज्यात अल निनो वादळाचा प्रभाव असेल. त्यामुळे १७ ऑगस्टपर्यंत पुरेल अशा पद्धतीने पाण्याचा वापर करायचा आहे. त्यासाठीच मुंबई महापालिकेने १५ मेपासून मुंबईत १० टक्के पाणीकपात लागू केली आहे, अशी माहिती पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली.पालिकेने राज्य सरकारकडे राखीव पाणीसाठ्याची मागणी अगोदरच केली होती. त्याला सरकारकडूनदेखील मंजुरी मिळाल्याचे समजते. त्यामुळे यदाकदाचित सात तलावांतील पाणीसाठा संपुष्टात आल्यास राखीव कोट्यातून पाणीपुरवठा करण्याची तजवीज महापालिकेने अगोदरच करून ठेवली आहे. मात्र वेळेत पाऊस न पडल्यास आणि संपूर्ण जून महिना पावसाविना गेल्यास मुंबईला आणखीन मोठ्या पाणीकपातीच्या संकटाला तोंड द्यावे लागू शकते.


">पर्यायी स्रोत निर्माण होईपर्यंत संकट कायम

लोकसंख्या, पाण्याची वाढती मागणी, दररोज होणारा अपुरा पालिकेने मुंबई शहराची वाढती पाणीपुरवठा पाहता पाण्याचे नवीन स्रोत निर्माण करण्यासाठी एकीकडे सात ठिकाणी एसटीपी प्रकल्प राबवायला सुरुवात केली आहे. दुसरीकडे समुद्राचे खारे पाणी गोडे करण्याचा प्रकल्प हाती घेतला आहे. त्याचप्रमाणे पालिकेने गारगाई हे नवीन धरण बांधण्याचे कामदेखील हाती घेतले आहे. नवे पाणी प्रकल्प निर्माण होण्यासाठी काही वर्षांचा कालावधी लागणार असल्याने तोपर्यंत मुंबईकरांना पाण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागणार आहे.

Tags
Mumbai Water SupplyBMC Water CutMumbai Lakes Water LevelEl Nino Impact MaharashtraWater Scarcity Mumbai
Comments
Add Comment

Chandrashekhar Bawankule : राज्यातील २ लाख आदिवासींना मिळणार 'सातबारा'

- वनपट्टाधारकांसाठी 'नमुना ७ ई आणि १२ ई' लागू; महसूलमंत्र्यांची विधानसभेत ऐतिहासिक घोषणा मुंबई : राज्यातील लाखो

Mumbai Water Supply : मुंबईसाठी दिलासादायक बातमी! विहारनंतर तुळशी तलावही ओसंडून वाहू लागला

मुंबई : मुंबईत सुरू असलेल्या दमदार पावसामुळे शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी महत्त्वाचा असलेला तुळशी तलाव (Tulsi lake)

Bhandup Bus Accident : भरधाव बेस्ट बसचं भांडुपमध्ये नियंत्रण सुटलं; पादचाऱ्यासह अनेक वाहनांना धडक

मुंबई : मुंबईतील भांडुप (Bhandup) परिसरात बेस्ट बसचा विचित्र अपघात (Accident) घडला. भांडुपमधील कोकण नगर (Kokan Nagar) येथील क्रिटिकल

Vasai-Virar Rain Update : वसई-विरारमध्ये पावसाचा कहर! पूर, वीज आणि इंटरनेट बंद; हजारो नागरिकांचे जनजीवन विस्कळीत

पालघर : वसई-विरार (Vasai- Virar) परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. सलग दोन

Mumbai Rain : मुसळधार पावसामुळे विहार तलाव भरला; मुंबईतील पहिला तलाव ओव्हरफ्लो!

मुंबई : मुंबईत (Mumbai) सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे (Heavy Rain) अखेर मुंबईतील पहिला Vihar (विहार) Lake (तलाव) ओसंडून (Overflow) वाहू

Wadala building collapse : वडाळ्यात इमारतीचा पहिला मजला कोसळला; तिघेजण किरकोळ जखमी

मुंबई: मुंबईतील वडाळा (Wadala)(पूर्व) परिसरात मंगळवारी इमारतीचा पहिला मजला कोसळल्याची घटना घडली. शांतीनगर येथील