Water Management : तलावांमध्ये १७ टक्केच पाणीसाठा शिल्लक

पाणी जपून वापरण्याचे मुंबईकरांना आवाहन


मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांमध्ये फक्त २,५८,४१० द. श. लि. (१७.८५ टक्के) इतका पाणीसाठा शिल्लक आहे. पुढील ६१ दिवस म्हणजेच किमान दोन महिने पुरेल इतकाच पाणीसाठा उरल्याने आणि अल निनो वादळाचा प्रभाव, त्याचा पावसावर विपरित परिणाम होण्याची शक्यता असल्याने पाणी जपून वापरावे, असे आवाहन पालिकेने केले आहे.मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांतून दररोज ४,२०० दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा करण्यात येतो. त्यामध्ये ठाणे, भिवंडी महापालिकेचा २०० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा समाविष्ट आहे. आगामी काळात मुंबईसह राज्यात अल निनो वादळाचा प्रभाव असेल. त्यामुळे १७ ऑगस्टपर्यंत पुरेल अशा पद्धतीने पाण्याचा वापर करायचा आहे. त्यासाठीच मुंबई महापालिकेने १५ मेपासून मुंबईत १० टक्के पाणीकपात लागू केली आहे, अशी माहिती पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली.पालिकेने राज्य सरकारकडे राखीव पाणीसाठ्याची मागणी अगोदरच केली होती. त्याला सरकारकडूनदेखील मंजुरी मिळाल्याचे समजते. त्यामुळे यदाकदाचित सात तलावांतील पाणीसाठा संपुष्टात आल्यास राखीव कोट्यातून पाणीपुरवठा करण्याची तजवीज महापालिकेने अगोदरच करून ठेवली आहे. मात्र वेळेत पाऊस न पडल्यास आणि संपूर्ण जून महिना पावसाविना गेल्यास मुंबईला आणखीन मोठ्या पाणीकपातीच्या संकटाला तोंड द्यावे लागू शकते.


">पर्यायी स्रोत निर्माण होईपर्यंत संकट कायम

लोकसंख्या, पाण्याची वाढती मागणी, दररोज होणारा अपुरा पालिकेने मुंबई शहराची वाढती पाणीपुरवठा पाहता पाण्याचे नवीन स्रोत निर्माण करण्यासाठी एकीकडे सात ठिकाणी एसटीपी प्रकल्प राबवायला सुरुवात केली आहे. दुसरीकडे समुद्राचे खारे पाणी गोडे करण्याचा प्रकल्प हाती घेतला आहे. त्याचप्रमाणे पालिकेने गारगाई हे नवीन धरण बांधण्याचे कामदेखील हाती घेतले आहे. नवे पाणी प्रकल्प निर्माण होण्यासाठी काही वर्षांचा कालावधी लागणार असल्याने तोपर्यंत मुंबईकरांना पाण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागणार आहे.

Tags
Mumbai Water SupplyBMC Water CutMumbai Lakes Water LevelEl Nino Impact MaharashtraWater Scarcity Mumbai
Comments
Add Comment

Mhada : म्हाडाच्या घरांसाठी शुक्रवारपर्यंत अर्ज करता येणार

आतापर्यंत ८७ हजार २३९ अर्ज, तर ६१,१५३ अनामत रक्कमेसह अर्ज दाखल मुंबई : म्हाडाच्या २६४० घरांसाठी अर्ज करण्याची

Nashik :नाशिकच्या TCS मध्ये कॉर्पोरेट जिहाद तर मुंबईत बँक जिहाद ? नरिमन पॉइंटच्या शाखेतील धक्कादायक घटना

मुंबई : नाशिकच्या TCS मधील कॉर्पोरेट जिहादचे प्रकरण उजेडात आले, पोलिसांनी गुन्हे नोंदवले आणि कायदेशीर कारवाई सुरू

मच्छिमार कामगारांच्या कल्याणासाठी शासन कटिबद्ध – मंत्री नितेश राणे

मुंबई  : महाराष्ट्र मच्छिमार उद्योगातील मच्छिमार आणि इतर श्रमजीवी कामगार मंडळाच्या कामकाजाचा आढावा घेताना

Marathi :मराठीचे धिंडवडे काढणारा 'तो' फलक अखेर हटवला

 'प्रहार'च्या वृत्तानंतर प्रशासनाला जाग मुंबई : मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर मराठी भाषेची आणि व्याकरणाची

Mumbai Crime : हायप्रोफाइल टॉवरमध्ये सुरू होता ड्रग्जचा काळाबाजार; उग्र वासामुळे पोलिसांनी टाकला छापा, मैत्रिणीसह तिघे ताब्यात...

Crime News : दक्षिण मुंबईतील आग्रीपाडा परिसरातील हायप्रोफाइल यास्मीन टॉवरमध्ये सुरू असलेला ड्रग्जचा मोठा रॅकेट मुंबई

किनारी सुरक्षेसाठी समन्वय यंत्रणा अधिक सक्षम करणार – मंत्री नितेश राणे

मुंबई  : महाराष्ट्राचा विस्तीर्ण समुद्रकिनारा लक्षात घेता किनारी सुरक्षा अधिक सक्षम करणे ही काळाची गरज आहे.