गुगलवर अहिराणी बोलीला अधिकृत मान्यता; खान्देश वासियांमध्ये आनंद

खान्देशची ओळख असलेल्या अहिराणी बोलीला आता जागतिक स्तरावर नवी ओळख मिळाली असून, गुगलने अहिराणी भाषेला अधिकृत मान्यता दिली आहे. त्यामुळे आता अहिराणी भाषा गुगल कीबोर्डवर सहज टाईप करता येणार असून, डिजिटल माध्यमातही या मायबोलीचे स्थान निर्माण झाले आहे. या निर्णयामुळे खान्देशवासीयांमध्ये आनंद आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.


अहिराणी ही फक्त बोली नसून खान्देशच्या संस्कृतीचा, लोकजीवनाचा आणि परंपरेचा आत्मा मानली जाते. गावखेड्यांतील दैनंदिन व्यवहार, लोकगीते, सण-उत्सव, नातेसंबंध आणि लोकसंस्कृती यामध्ये अहिराणीचा गोडवा आजही टिकून आहे. आता गुगलसारख्या जागतिक तंत्रज्ञान मंचावर या बोलीला स्थान मिळाल्याने तिच्या जतन आणि संवर्धनाला मोठी चालना मिळणार आहे.



या यशामागे जागतिक अहिराणी भाषा संवर्धन परिषद, उत्तर महाराष्ट्र खान्देश विकास मंडळ, विविध सामाजिक-सांस्कृतिक संस्था, साहित्यिक, कवी, संशोधक आणि भाषा प्रेमी यांचे दीर्घकालीन प्रयत्न कारणीभूत ठरले आहेत. अनेक वर्षांपासून विविध माध्यमांतून अहिराणी भाषा जिवंत ठेवण्यासाठी सातत्याने कार्य करण्यात येत होते.


गुगलवरील मान्यतेमुळे नव्या पिढीला अहिराणी भाषेशी जोडण्यास मदत होणार असून, डिजिटल युगात मायबोली अधिक सक्षमपणे पुढे येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.“जी भाषा टिकते, ती संस्कृती टिकते,” या भावनेतून आता अहिराणी अधिक अभिमानाने बोलली, लिहिली आणि जपली जावी, अशी भावना खान्देशवासीयांकडून व्यक्त होत आहे.

Comments
Add Comment

Shahapur Rain : शहापूरात पावसाचा कहर! हनुमान धबधब्यावर भीषण दुर्घटना; ५ पर्यटक वाहून गेले

शहापूर : ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात (Shahapur Rain) झालेल्या ढगफुटीसदृश मुसळधार पावसामुळे हनुमान धबधब्यावर मोठी

Maharashtra Monsoon Weather : पावसाचा पुन्हा जोर! पुढील २४ तास अतिमहत्त्वाचे; महाराष्ट्रातील २२ जिल्ह्यांना हवामान खात्याचा इशारा

मुंबई : जुलैच्या अखेरच्या आठवड्यात महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाने जोरदार पुनरागमन केले आहे. उत्तर-पश्चिम

Dam Water Level : राज्यात ५६ टक्के उपयुक्त पाणीसाठा, मराठवाड्यात मात्र चिंता कायम

पुणे : जुलै महिन्यात झालेल्या समाधानकारक पावसामुळे राज्यातील धरणांमधील उपयुक्त पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली

Dog Attack : रेबीजमुळे चिमुकल्या समर्थ स्वामीचा दुर्दैवी मृत्यू; भटक्या कुत्र्यांवर कारवाईची मागणी

सोलापूर : भवानी पेठ परिसरातील घोंगडे वस्ती येथे कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या समर्थ स्वामी या

Amravati News : धक्कादायक! आश्रमशाळेतील ४० विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा; जेवणानंतर उलट्या, पोटदुखीने उडाली खळबळ

अमरावती : अमरावतीच्या मेळघाट परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. धारणी तालुक्यातील टीटंबा येथील शासकीय

Mumbai-Pune Water Update : मुंबई-पुणेकरांची पाण्याची चिंता मिटली! धरणांत मुबलक जलसाठा; पाहा कोणत्या तलावात किती टक्के पाणी ?

मुंबई : यंदाच्या मान्सूनने सुरुवातीला हुलकावणी दिली असली, तरी जुलै महिन्यात मुंबई (Mumbai) आणि पुण्याच्या पाणलोट