Idris Nayakwadi : इद्रीस नायकवाडी राजीनामा दो ! सुनेत्रा पवार यांची सूचना; कार्यशैली अमान्य असल्याने युवा नेतृत्वाची नाराजी

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यपाल नियुक्त आमदार इद्रीस नायकवाडी यांना पक्षनेतृत्वाने राजीनामा देण्याचे निर्देश दिल्याची माहिती समोर आली आहे. खुद्द उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या सूचनेवरून राजीनाम्याची मागणी करण्यात आल्याची चर्चा असून, नायकवाडी यांच्या कार्यशैलीवर युवा नेतृत्व नाराज असल्याचे कळते आहे. मात्र, आपण राजीनामा देणार नसल्याची भूमिका नायकवाडी यांनी घेतल्याने पक्षात नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.


अलीकडेच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या विशेष कार्य अधिकाऱ्याने (ओएसडी) इद्रीस नायकवाडी यांची भेट घेतली होती. याच भेटीत त्यांना पक्षाच्या वतीने राजीनामा देण्याची सूचना देण्यात आल्याचे समजते. मंगळवारी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली असून, या बैठकीत नायकवाडी यांच्या राजीनाम्याचा विषय चर्चेला येण्याची दाट शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे.


राजीनाम्याच्या चर्चेवर बोलताना इद्रीस नायकवाडी यांनी मात्र या वृत्ताचे खंडन केले आहे. "उपमुख्यमंत्र्यांचे ओएसडी हे मंत्रालयात सातत्याने भेटत असतात. परंतु, मला कोणत्याही नेत्याकडून किंवा पक्षाकडून राजीनामा मागण्यात आलेला नाही," असे स्पष्टीकरण त्यांनी दिले. तसेच, "यापूर्वी दिवंगत नेते अजित पवार यांच्याकडून मला अशी कोणतीही सूचना कधीही देण्यात आली नव्हती. त्यामुळे राजीनामा देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही," अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.



राजीनाम्यासाठी दबाव का ?


दिवंगत नेते अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा ‘अल्पसंख्याक चेहरा’ म्हणून नायकवाडी यांना विधानपरिषदेवर संधी दिली होती. मात्र, अजित पवारांच्या निधनानंतर पक्षांतर्गत समीकरणे बदलली आहेत. सध्या झिशान सिद्दीकी यांच्या रूपाने राष्ट्रवादीचा एक युवा आमदार विधानपरिषदेत अल्पसंख्याक समुदायाचे प्रतिनिधित्व करत आहे. त्यातच पक्षातील नवोदित युवा नेतृत्वाला नायकवाडी यांची कार्यशैली मान्य नसल्याने एकाच समाजाचे दोन प्रतिनिधी ठेवण्याऐवजी नायकवाडींना पदमुक्त करण्याची हालचाल सुरू असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

Comments
Add Comment

Maharashtra : देशातील पहिला 'पाण्याचा सातबारा' महाराष्ट्रात

योजना प्रायोगिक तत्त्वावर राबविणार; महसूल, पाणीपुरवठा व स्वच्छता, ग्रामविकास विभागाची तयारी मुंबई : पाण्याचा

मास्टर की वापरून रात्री रूममध्ये आला कर्मचारी, दांपत्याची झोप उडाली

कोलवा : गोव्यातील कोलवा परिसरातल्या एका बड्या हॉटेलमध्ये धक्कादायक घटना घडली. पर्यटनासाठी आलेले दांपत्य

Worli Jetty : वरळी जेट्टीच्या नियोजित विकासाला गती; जलवाहतूक आणि हेलिपॅड सुविधांवर भर

मुंबईतील सागरी वाहतूक अधिक सक्षम आणि आधुनिक करण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध मुंबई  : वरळी जेट्टीच्या नियोजित

Chhagan Bhujbal : राज्यात इंधनटंचाई नाही, नागरिकांनी घाबरून अनावश्यक साठा करू नये, छगन भुजबळांचे आवाहन

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात इंधन तुटवडा जाणवत आहे. पेट्रोल डिझेलच्या किमतीत सातत्याने वाढ होत आहे.

Sindhudurg : सिंधुदुर्गातील वाढत्या पर्यटक संख्येचा विचार करून वाहतुकीचे नियोजन करा, पालकमंत्री नितेश राणे यांचे निर्देश

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर देशांतर्गत पर्यटनाला मोठी चालना मिळाली असून, सिंधुदुर्ग (Sindhudurg)

Jammu Kashmir Accident : जम्मू काश्मीरमधील धक्कादायक घटना, गुलमर्ग गोंडोला थांबल्याने ३०० पर्यटक सापडले संकटात !

गुलमर्ग : गुलमर्ग गोंडोला या नावाने प्रसिद्ध असलेली गुलमर्गची केबल कार सेवा तांत्रिक बिघाडामुळे बंद पडली आणि