IPL 2026 : राजस्थान अंतिम चारमध्ये पोहोचणार?

- सुशील परब


मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात आयपीएल २०२६ मधील ६९वा सामना आज मुंबईच्या वानखेडे स्टेडियम येथे आहे. राजस्थान रॉयल्ससाठी हा सामना ‘करो या मरो’ असा असून प्लेऑफमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी विजय अत्यावश्यक आहे. दुसरीकडे, मुंबई इंडियन्सचे स्पर्धेतील आव्हान आधीच संपुष्टात आले असल्याने हा त्यांचा अखेरचा लीग सामना ठरणार आहे.



आयपीएल २०२६ ची प्लेऑफ शर्यत सध्या अत्यंत रोमांचक टप्प्यावर पोहोचली आहे. तीन संघांनी आपले स्थान जवळपास निश्चित केले असून उर्वरित जागेसाठी चुरस वाढली आहे. राजस्थान रॉयल्ससाठी सर्वात मोठा आशेचा किरण म्हणजे युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी. या हंगामात त्याने आपल्या आक्रमक फलंदाजीने अनेक दिग्गज गोलंदाजांना धूळ चारली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राजस्थानच्या चाहत्यांच्या आशा त्याच्यावर टिकून आहेत. जर वैभवने पुन्हा एकदा मोठी खेळी केली, तर राजस्थान रॉयल्स प्लेऑफकडे मोठे पाऊल टाकू शकतात. दुसरी गोष्ट म्हणजे फलंदाजीत यशस्वी जयस्वाल, ध्रुव जुरेल, डोनोवन फरेरा यांच्यावर संघाची मोठी जबाबदारी असेल, तर गोलंदाजीत जोफ्रा आर्चर, दासुन शनाका आणि यशराज यांच्याकडून प्रभावी कामगिरीची अपेक्षा असेल.



याच्या उलट मुंबई इंडियन्सकडे रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या आणि जॅक यांसारखे स्टार फलंदाज असूनही या हंगामात अपेक्षेप्रमाणे चमकू शकली नाही. १३ सामन्यांत केवळ ४ विजय मिळवत मुंबईचा संघ स्पर्धेबाहेर गेला. यामुळे आता सर्वांच्या नजरा या निर्णायक सामन्याकडे लागल्या आहेत. राजस्थान रॉयल्स विजय मिळवत अंतिम चारमध्ये धडक मारणार का, की मुंबई इंडियन्स त्यांचा मार्ग रोखणार, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

Comments
Add Comment

ISSF World Cup : सोनम आणि हिमांशूला १० मीटर एअर रायफल मिश्र सांघिक प्रकारात कांस्यपदक

हाँगझोऊ : चीनमधील हाँगझोऊ येथे सुरू असलेल्या आयएसएसएफ विश्वचषकात भारतीय रायफल नेमबाज सोनम उत्तम मस्कर आणि

Valluri Ajaya Babu : कोण आहे वल्लुरी अजय बाबू ? आधी वडिलांनी जिंकले पदक , १६ वर्षानंतर मुलाने बापाला टाकले मागे

ग्लासगो : कॉमनवेल्थ गेम्स २०२६ या स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी उत्तम कामगिरी करत आतापर्यंत १० पदके जिंकली आहेत. यात

IND VS SL : बीसीसीआयची मोठी घोषणा! श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर; या खेळाडूचा पहिल्यांदाच भारतीय संघात समावेश

मुंबई : भारत आणि श्रीलंका यांच्यात ऑगस्टमध्ये दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेसाठी भारतीय

CWG 2026 : कॉमन वेल्थ गेम्समध्ये नाशिकच्या सर्वेशची चमक! उंच उडीत भारताला जिंकून दिले पहिले रौप्य पदक

ग्लासगो : कॉमन वेल्थ गेम्स २०२६ ग्लासगो येथे खेळला जात आहे. या स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी अपेक्षेप्रमाणे कामगिरी

CWG 2026 : कॉमन वेल्थ गेम्स २०२६ वेटलीफटिंगमध्ये भारताचा दबाब कायम; माणिपूरच्या बिंद्यारानीने सलग दुसर्‍यांदा जिंकले पदक

ग्लासगो : कॉमन वेल्थ गेम्स २०२६ ग्लासगो येथे सुरू असलेल्या स्पर्धेत भारतीय संघाने एकूण १० पदक जिंकले आहेत.

WI vs PAK : ५ षटकात पाच विकेट्स! वेस्ट इंडिज विरुद्ध पाकिस्तान सामन्यात घडला इतिहास

त्रिनिदाद : वेस्ट इंडिज आणि पाकिस्तान यांच्यात सध्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना खेळला जात