'एसआयआर' प्रक्रियेत एकाही पात्र मतदार वागळणार नाही

 मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम; बोगस मतदान रोखणे हाच मोहिमेचा हेतू


मुंबई : मतदार याद्यांच्या पुनरीक्षणासाठी राबवल्या जाणाऱ्या 'एसआयआर' प्रक्रियेदरम्यान कोणत्याही कायदेशीर आणि पात्र मतदाराचे नाव यादीतून वगळले जाणार नाही, अशी ग्वाही राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी शुक्रवारी दिली. मतदार याद्या अधिक अचूक आणि पारदर्शक बनवणे हाच या मोहिमेचा मुख्य उद्देश असून, राजकीय पक्षांनी आणि नागरिकांनी या प्रक्रियेला सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. चोक्कलिंगम म्हणाले, अनेकदा निवडणूक काळात मतदार यादीतून नावे गायब असणे, एकाच मतदाराचे नाव दोन ठिकाणी असणे किंवा मृत व्यक्तींच्या नावावर मतदान होणे अशा तक्रारी मोठ्या प्रमाणावर समोर येतात. या सर्व त्रुटी कायमच्या दूर करण्यासाठी निवडणूक आयोगाने या विशेष मोहिमेचे आयोजन केले आहे. या अंतर्गत घरोघरी जाऊन मतदारांची पडताळणी केली जात असून, दुबार नावे आणि मृत किंवा स्थलांतरित मतदारांची नावे यादीतून हटवण्याची कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.मात्र, या प्रक्रियेत काही पात्र मतदारांची नावे जाणीवपूर्वक किंवा तांत्रिक चुकीमुळे वगळली जात असल्याचा संशय काही पक्षांकडून केला जात आहे. त्याबाबत विचारले असता चोक्कलिंगम म्हणाले, अंतिम निर्णय घेण्यापूर्वी प्रत्येक मतदाराला आपली बाजू मांडण्याची पुरेशी संधी दिली जात असून, कोणावरही अन्याय होणार नाही याची संपूर्ण खबरदारी घेतली जात आहे.


कोणत्याही दबावाशिवाय प्रक्रिया सुरू


निवडणूक आयोगाने सर्व जिल्हाधिकारी आणि निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना 'एसआयआर' प्रक्रियेत पूर्ण पारदर्शकता ठेवण्याचे सक्त निर्देश दिले आहेत. या प्रक्रियेमध्ये तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात असून, प्रत्येक बदलाची नोंद डिजिटल पद्धतीने ठेवली जात आहे. मतदारांनीही आपल्या नावातील चुका दुरुस्त करण्यासाठी, पत्ता बदलण्यासाठी किंवा नवीन नाव नोंदणीसाठी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. ही प्रक्रिया कोणत्याही दबावाशिवाय आणि निःपक्षपातीपणे पूर्ण करून एक अत्यंत शुद्ध आणि निर्दोष मतदार यादी तयार करण्यासाठी आयोग कटिबद्ध असल्याचे चोक्कलिंगम म्हणाले.

Comments
Add Comment

Devendra Fadnavis : अल निनोचा मोठा परिणाम राज्यावर होईल, टास्क फोर्स तयार

मुंबई : अल निनोचा मोठा परिणाम आपल्या राज्यावर होईल. या संदर्भात आपण तयारी करत आहोत. आपण त्याचा टास्क फोर्स तयार

Devendra Fadnavis : गुटखा व्यवसाय करणाऱ्यांवर आता मकोका अंतर्गत कठोर कारवाई

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा अधिवेशनात दिले होते स्पष्ट संकेत अन्न व औषध प्रशासन मार्फत अत्यंत

Dahanu Love Jihad : डहाणू लव्ह जिहाद प्रकरणी डीसीपी मीना मकवानांच्या अध्यक्षतेखाली एसआयटीची स्थापना

एसआयटी स्थापनेसाठी आमदार चित्रा वाघ यांनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार मुंबई : पालघर जिल्ह्यातील डहाणू येथे

Devendra Fadnavis : ग्रामीण भागातील पाणीपुरवठा १०० टक्के सौर ऊर्जेवर आणणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : पाणीपुरवठा योजनेच्या व्यवस्थापनासाठी तालुकास्तरावर युनिटची निर्मिती मुंबई :

Konkan Railway : गणेशोत्सवासाठी आताच तयारीला लागा ! कोकण रेल्वेचे कधी सुरू होणार आरक्षण ?

मुंबई : यंदा १४ सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थी असल्यामुळे ११, १२ आणि १३ सप्टेंबर रोजी गावी पोहोचू इच्छिणाऱ्यांची

Sejal Pawar : सेजल पवारचं करिअर संपणार ? KEM रुग्णालय मोठा निर्णय घेणार ?

मुंबई : सध्या सोशल मीडियावर दोन व्हिडिओ तुफान वायरल होत आहेत. एक म्हणजे ३७० ची बिर्याणी आणि डॉ. सेजल पवार हिचं