Nashik : डिझेल टंचाईमुळे सोमवारपासून जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये लिलाव बंद

Nashik : डिझेलची टंचाई निर्माण झाल्यामुळे आशिया खंडातील सर्वात मोठी कांदा बाजार समिती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लासलगाव बाजार समितीतील व्यापाऱ्यांनी सोमवारपासून (दि.२५) कांदा व धान्याचे लिलाव बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, जोपर्यंत डिझेलचा पुरवठा सुरळीत होत नाही, तोपर्यंत अन्य राज्यांमध्ये कांदा व धान्य पाठविणेही बंद ठेवण्याचे निश्चित करण्यात आले आहे.


या निर्णयामुळे जिल्ह्यातील शेतमालावर मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.दरम्यान, जिल्ह्यातील इतर बाजार समित्यांनीही हेच धोरण स्वीकारण्याचा निर्णय घेतला असून, त्याचा थेट परिणाम इतर भागांत जाणाऱ्या भाजीपाल्यावरही होण्याची शक्यता आहे.



केंद्र सरकारने मागील आठवड्यात दोन वेळा पेट्रोलियम पदार्थांच्या किमती वाढवल्यानंतर अचानक डिझेलची टंचाई निर्माण झाली आहे. प्रशासन आणि राज्य सरकारकडून डिझेल व पेट्रोल मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्याचा दावा केला जात असला, तरी प्रत्यक्ष परिस्थिती वेगळी असल्याचे दिसून येत आहे. ग्रामीण भागात शेतीसाठी आवश्यक डिझेल उपलब्ध होत नसल्याने शेतीकामांवर थेट परिणाम होऊ लागला आहे.


दुसरीकडे, भाजीपाला, कांदा व धान्य बाजार समितीत लिलावासाठी आणण्यासाठी शेतकऱ्यांकडे डिझेल नसल्याने आवकही प्रभावित होत आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांनी पुढील पावले उचलण्यास सुरुवात केली असून, सोमवारपासून मोठी अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे. कांदा व इतर शेतीमाल इतरत्र पाठविण्यासाठी ट्रकचालकांना इंधन उपलब्ध होत नसल्यामुळे बाजार समितीतील कांदा व धान्याचे लिलाव सोमवार (दि. २५) पासून बेमुदत बंद राहणार आहेत. लिलाव ठप्प झाल्यास कांद्याचे दर आणखी घसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. व्यापारी असोसिएशनने सोमवारपासून कांदा व धान्य लिलावात सहभागी होणार नसल्याचे पत्र बाजार समितीला दिले आहे.



या इंधन टंचाईमुळे केवळ व्यापारीच नाही, तर शेतकरी, ट्रान्सपोर्टर्स आणि अडते यांच्यातही चिंतेचे वातावरण आहे. लासलगाव बाजारपेठ बंद राहिल्यास त्याचा थेट परिणाम देशातील कांदा पुरवठ्यावर होईल आणि बहुतांश राज्यांमध्ये कांद्याचे भाव कडाडू शकतात. त्यामुळे आता सरकार यावर काय पावले उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment

Mumabi News : समुद्राच्या मोठ्या भरतीने चौपाट्यांवर कचऱ्याचा खच

दहा दिवसांमध्ये २ हजार ४९९ मेट्रीक टन कचरा केला जमा मुंबई : मुंबईतील समुद्रकिनारे स्वच्छ, सुरक्षित आणि

BMC News : मुंबईकरांना जागतिक दर्जाची, सुलभ आणि उत्तरदायी आरोग्यसेवा

- मुंबई महानगरपालिका बनवत आहे टप्पेनिहाय आराखडा मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईतील नागरिकांना दर्जेदार,

Mumbai News : एकाच दिवशी मुंबईत २७ हजार ८६६ महिलांच्या कर्करोगाची तपासणी

मुंबईत २९८ ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवशी राबवले महिलांसाठी स्तन कर्करोग तपासणी शिबिर आशिया बूक रेकॉर्ड

Ayodhya : धार्मिक व्यवस्थापनासाठी नऊ सदस्यीय समिती स्थापन

नवी दिल्ली : श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या बुधवारी झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत मंदिराच्या

Srinagar : अनंतनागमध्ये पोलिस पथकावर दहशतवादी हल्ला; जखमी हेड कॉन्स्टेबल हुतात्मा

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात पोलिस पथकावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात गंभीर जखमी झालेले हेड

Kalyan Banerjee : तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी लोकसभेतून निलंबित

नवी दिल्ली : लोकसभेने तृणमूल काँग्रेसचे (TMC) खासदार कल्याण बॅनर्जी यांना पावसाळी अधिवेशनाच्या उर्वरित