Jalgaon : जळगाव जिल्ह्यात २ पोलीस अधिकारी तर १ कर्मचारी तडकाफडकी निलंबित

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील बोदवड पोलीस ठाण्याचे (Bodwad Police Station) दोन अधिकारी व एका पोलीस कर्मचाऱ्यावर तडकाफडकी निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यात झालेल्या हलगर्जीपणा आणि वेळेत प्रतिबंधक कारवाई न केल्याने खुनासारखा गंभीर गुन्हा घडल्याचा आरोप ठेवत त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.


माहितीनुसार निलंबितांमध्ये पोलीस ठाणे प्रभारी सहाय्यक निरीक्षक दीपक सुरवडकर, टाऊन बिट प्रभारी सहाय्यक फौजदार रवींद्र गुरचळ आणि हेड कॉन्स्टेबल नंदकिशोर धनके यांचा समावेश आहे. या कारवाईने पोलिस दलात खळबळ उडाली आहे.



नेमके प्रकरण काय ?


या प्रकरणाची सुरुवात झाली १ मे रोजी. बोदवड पोलीस ठाणे येथे एक गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणातील तक्रारीमध्ये गंभीर वाद निर्माण झाल्याने या पार्श्वभूमीवर अदखलपात्र गुन्हा नोंदविण्यात आला होता. यामुळे दोन्ही गटांमध्ये वाद वाढला. पुढे काही चुकीचे कृत्य गडू नये आणि तणाव कमी करण्यासाठी तातडीने प्रतिबंधक कारवाई करण्यात यावी याची जबाबदारी हेड कॉन्स्टेबल नंदकिशोर धनके यांच्याकडे सोपविण्यात आली होती. मात्र, त्यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखूनही कोणतीही चौकशी किंवा कारवाईची तत्परता दाखवली नाही. त्यामुळे दोन्ही गटांतील संघर्ष अधिक वाढत गेला आणि अखेर खुनासारखी गंभीर घटना घडली.


दरम्यान, सहाय्यक फौजदार रवींद्र गुरचळ हे बोदवड शहराचे टाऊन बिट प्रभारी म्हणून कार्यरत होते. १९ मे रोजी ते दोन्ही गटांमध्ये पुन्हा वाद सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोकॉ मोहन चौधरी यांना सोबत घेऊन घटनास्थळी गेले होते. संबंधित दोन्ही गटांतील वाढत्या वैमनस्याची पूर्ण माहिती असूनही त्यांनी केवळ दोन्ही पक्षांना पोलिस ठाण्यामध्ये आणून कोणतीही कायदेशीर अथवा प्रतिबंधक कारवाई न करता सोडून दिले. या निष्काळजीपणामुळे २१ मे रोजी गंभीर गुन्हा घडल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.



या संपूर्ण प्रकरणात पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी सहाय्यक निरीक्षक दीपक सुरवडकर यांच्यावरही गंभीर जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. १९ मे रोजी हिदायत नगर परिसरातील वादाची सविस्तर माहिती पोकॉ मोहन चौधरी यांनी त्यांना फोन तसेच व्हॉट्सॲपद्वारे दिली होती. स्थानिक नगरसेवकाने देखील परिसरातील संवेदनशील परिस्थितीबाबत त्यांना सतर्क केले होते. मात्र, इतकी गंभीर माहिती मिळूनही त्यांनी स्वतः कोणतीही तातडीची कारवाई केली नाही किंवा अधीनस्थ कर्मचाऱ्यांना योग्य सूचना दिल्या नाहीत.


तसेच वरिष्ठ कार्यालय किंवा नियंत्रण कक्षालाही वेळेत माहिती देण्यात आली नाही. परिणामी, परिसरातील कायदा व सुव्यवस्था राखण्यात अपयश आल्याचा ठपका ठेवत त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळे पोलिस विभागात खळबळ उडाली असून, वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असल्याची माहिती मिळत आहे.

Comments
Add Comment

Hinjawadi-Shivajinagar Metro: स्थानके अजूनही 'यार्डातच'; अपूर्ण कामांमुळे पुणेकरांच्या आशा मावळल्या

PUNE : हिंजवडी आयटी हबला दिलासा देण्यासाठी प्रस्तावित असलेला हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो प्रकल्प गेल्या अनेक

JALGAON CRIME : लग्नाचे आमिष दाखवून २३ वर्षीय तरुणीवर दोन वर्षे अत्याचार; संशयित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

JALGAON: लग्नाचे खोटे आमिष दाखवून एका २३ वर्षीय तरुणीवर गेल्या दोन वर्षांपासून जळगाव आणि धुळे परिसरात शारीरिक व

Pratap Sarnaik : एसटी कर्मचाऱ्यांना सरकारी कर्मचाऱ्याप्रमाणे ५८ टक्के महागाई भत्ता

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा; घरभाडे भत्ताही वाढवणार मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन

Chhatrapati Sambhajinagar : १५ वर्षांचं प्रेम अवघ्या ७ दिवसांत संपलं; नवविवाहितेचा मृत्यू

छत्रपती संभाजीनगर शहरात डोळ्यात टचकन पाणी येईल अशी धक्कादायक घटना समोर आली आहे.लग्नानंतर अवघ्या सात दिवसांतच

Uri Blast : 'उरी'मध्ये शहीद झालेल्या महाराष्ट्रातील दोन जवानांना मुख्यमंत्र्यांकडून श्रद्धांजली

मुंबई : जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यातील उरी सेक्टरमध्ये (Uri Blast) नियंत्रण रेषेजवळ कर्तव्य बजावत असताना

Maharashtra Monsoon Weather Alert : मान्सूनची गाडी अडकली! राज्यात उकाड्याचा कहर कायम; ‘या’ कारणामुळे पाऊस पुढे सरकेना

मुंबई : महाराष्ट्रात दाखल झालेल्या नैऋत्य मोसमी वाऱ्यांची (मान्सून) वाटचाल सध्या मंदावली असून राज्यातील