मराठा तरुणांच्या उद्योग उभारणीला फडणवीस सरकारकडून बळ

अण्णासाहेब पाटील महामंडळासाठी १५० कोटींचा निधी वितरित


मुंबई : फडणवीस सरकारने मराठा समाजातील तरुण उद्योजकांना मोठा आर्थिक दिलासा देत अण्णासाहेब पाटील महामंडळासाठी १५० कोटींचा निधी वितरित केला आहे. या निर्णयामुळे ग्रामीण आणि शहरी भागातील हजारो मराठा तरुणांना थेट फायदा होणार असून, त्यांना बँकेकडून कर्ज मिळणे आणि त्यावरील व्याज परतावा वेळेत मिळणे अधिक सुलभ होणार आहे.


अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत मराठा समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील तरुणांना उद्योगासाठी कर्ज व्याज परतावा योजना उपलब्ध करून दिली जाते. गेल्या काही काळापासून या महामंडळाच्या निधीत वाढ करण्याची मागणी केली जात होती. युवकांचा वाढता प्रतिसाद आणि रोजगाराच्या गरजा लक्षात घेऊन शासनाने हा निधी उपलब्ध करून दिला आहे. या निधीचा वापर मुख्यत्वेकरून नवीन उद्योजकांना सवलतीच्या दरात कर्ज पुरवठा करणे आणि प्रलंबित व्याज परताव्याचे विषय मार्गी लावण्यासाठी केला जाणार आहे. त्यामुळे नवउद्योजकांवरील आर्थिक ताण लक्षणीयरीत्या कमी होणार आहे.


किती कर्ज मिळते?


मराठा समाजासह आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील बेरोजगार तरुणांना स्वयंरोजगारासाठी सक्षम करणे हा 'अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ कर्ज योजने'चा मुख्य उद्देश आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना व्यवसायासाठी १० लाख रुपयांपासून ते कमाल ५० लाख रुपयांपर्यंतच्या कर्जावर राज्य शासनातर्फे व्याज परतावा दिला जातो. बँकेकडून घेतलेल्या कर्जाचे हप्ते वेळेवर भरणाऱ्या लाभार्थ्यांच्या कर्जावरील व्याजाची रक्कम महामंडळामार्फत थेट त्यांच्या खात्यात जमा केली जाते.



योजनेचे स्वरूप आणि मर्यादा


अ) वैयक्तिक कर्ज योजना - वैयक्तिक स्वरूपात व्यवसाय सुरू करण्यासाठी १० लाख ते १५ लाख रुपयांपर्यंतच्या कर्जावरील व्याजाचा परतावा दिला जातो.


ब) गट प्रकल्प कर्ज योजना - दोन किंवा अधिक व्यक्तींनी एकत्रितपणे सुरू केलेल्या गट प्रकल्पांसाठी कमाल ५० लाख रुपयांपर्यंतच्या कर्जावर व्याज परतावा मिळतो.



पात्रता आणि आवश्यक कागदपत्रे


या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक असून, त्याचे कौटुंबिक उत्पन्न महामंडळाच्या निकषांच्या मर्यादेत असावे लागते. योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करताना मराठा समाजातील उमेदवारांसाठी जातीचे प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी पुरावा (उदा. ओळखपत्र, रेशन कार्ड), व्यवसायाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (प्रोजेक्ट रिपोर्ट) आणि 'ब' वर्ग सभासद नोंदणी यांसारखी महत्त्वाची कागदपत्रे सादर करावी लागतात.

Comments
Add Comment

Central Railway : मुसळधार पावसानंतर रेल्वेची शर्यत! लोणावळा–कर्जत मार्गावर १,१०० हून अधिक कामगारांचे युद्धपातळीवर काम; एक रेल्वे मार्ग सुरू

मुंबई : लोणावळा–कर्जत घाट विभागात मुसळधार पावसामुळे झालेल्या दरडी कोसळण्याच्या घटनेनंतर मध्य रेल्वेने रेल्वे

Hasan Mushrif : राज्यात नर्सिंग शिक्षणाच्या विस्ताराला मान्यता - मंत्री हसन मुश्रीफ

- कमी शुल्कामध्ये दर्जेदार शिक्षण उपलब्ध होणार मुंबई : राज्यातील आरोग्य व्यवस्थेसाठी कुशल परिचारिकांची

Devendra Fadnavis : सावंतवाडीत आता 'राजधानी'सह ३ महत्त्वाच्या गाड्या थांबणार! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

- रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडून मंजुरीचे पत्र मुंबई : कोकण रेल्वेवरील प्रवाशांसाठी आणि विशेषतः

Pratap Sarnaik : एसटी महामंडळाचा कायापालट होणार; जुन्या बसेस बदलून ताफ्यात ई-बसेस येणार

- दुर्गम भागासाठी २००० मिडी बसेस सज्ज; मंत्री प्रताप सरनाईक यांची विधानपरिषदेत घोषणा मुंबई : भविष्यात एसटी

Devendra Fadnavis : मुंबईच्या पूर नियंत्रणासाठी १३ हजार कोटींचा आराखडा; मुख्यमंत्र्यांची घोषणा

- 'फडणवीसांना बदनाम करा, पण महाराष्ट्राला नको', विरोधकांना आवाहन मुंबई : "मुंबईला दरवर्षी भेडसावणाऱ्या

Mumbai Tree Collapse : वादळ आणि पावसात उन्मळून पडणाऱ्या झाडांचे जोखीम मूल्यांकन सुरू

मुंबई : मुंबईतील वाढत्या वादळी वाऱ्यांच्या पार्श्वभूमीवर वृक्षसंवर्धन आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी मुंबई