केंद्र सरकारच्या १२ वर्षांच्या पूर्ततेनिमित्त भाजपचे महासंपर्क अभियान

नवी दिल्ली : केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला १२ वर्षे पूर्ण झाल्याच्या आणि तिसऱ्या कार्यकाळातील दोन वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने भारतीय जनता पक्ष देशभरात महिनाभर व्यापक जनसंपर्क मोहीम राबविणार आहे. हा उपक्रम ९ जूनपासून सुरू होऊन ९ जुलैपर्यंत चालणार आहे. पक्षाने या राष्ट्रव्यापी मोहिमेसाठी '१२ वर्षे, १२ मोठ्या कामगिरी' ही संकल्पना निश्चित केली आहे.


या मोहिमेदरम्यान केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री, खासदार, आमदार आणि पक्षाचे पदाधिकारी जाहीर सभा, पत्रकार परिषदा, आणि संवाद कार्यक्रमांचे आयोजन करणार आहेत. राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात येणाऱ्या या मोहिमेत अगदी बूथ पातळीपर्यंतच्या कार्यकर्त्यांचा सक्रिय सहभाग निश्चित केला जाणार आहे. विशेष म्हणजे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (आरएसएस) नुकत्याच राबवलेल्या गृहसंपर्क मोहिमेच्या धर्तीवरच भाजप हा उपक्रम चालवणार आहे.


प्रत्येक बूथ पातळीवर कार्यक्रमांचे आयोजन


या मोहिमेदरम्यान गावे, वस्त्या आणि शहरी वसाहतींमध्ये 'विकसित भारत संकल्प सभा' आयोजित केल्या जातील. यामध्ये सरकारने घेतलेले ऐतिहासिक निर्णय आणि त्याचे झालेले सकारात्मक परिणाम जनतेसमोर मांडले जातील. प्रत्येक बूथ क्षेत्रात कार्यक्रम आयोजित करणे आणि 'पन्ना प्रमुख' यांनी आपापल्या भागातील मतदारांशी वैयक्तिकरित्या संपर्क साधणे, असे उद्दिष्ट पक्षाने ठेवले आहे. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाची संघटनात्मक बांधणी मजबूत करणे आणि कार्यकर्त्यांना कामाला लावणे, या दृष्टीने भाजप या मोहिमेकडे पाहत आहे.


मंत्रालयांकडून अहवाल तयार करण्याचे काम सुरू


सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पक्षाने सर्व मंत्रालयांना त्यांच्या कार्यकाळातील प्रमुख कामगिरीवर आधारित सविस्तर अहवाल आणि लहान माहितीपुस्तिका तयार करण्यास सांगितले आहे, ज्या सर्वसामान्यांमध्ये वाटल्या जातील. याशिवाय एक मुख्य पुस्तिका देखील तयार केली जात आहे, ज्यामध्ये सरकारच्या मोठ्या यशाचा समावेश असेल.


या मुद्द्यांवर भर
कलम ३७० हटवणे आणि सर्जिकल स्ट्राईक
बालाकोट एअर स्ट्राईक आणि नक्षलवादावरील कडक कारवाई
डिजिटल इंडिया, जीएसटी सुधारणा आणि पायाभूत सुविधांचा विस्तार
किसान सन्मान निधी, लखपती दीदी योजना आणि कोव्हिड व्यवस्थापन व लसीकरण मोहीम
संरक्षण उत्पादनांचे स्वदेशीकरण
अयोध्येतील राम मंदिर निर्मिती आणि 'ऑपरेशन सिंदूर'
या सर्व महत्त्वाच्या ऐतिहासिक आणि जनकल्याणकारी निर्णयांना या देशव्यापी महासंपर्क मोहिमेचा मुख्य भाग बनवले जाणार आहे.


Comments
Add Comment

Egg Donation Case : तब्बल ३७ वेळा स्त्री बीज दान, बदलापूर प्रकरणी ५ हजार पानांचे आरोपपत्र ; १५ जणांवर गुन्हा

उल्हासनगर  : बदलापूरमध्ये उघडकीस आलेल्या बेकायदा स्त्री बीज दान प्रकरणाच्या तपासादरम्यान एका महिलेने तब्बल ३७

Ulhasnagar : उल्हासनगरच्या कैलास कॉलनी चौकात गोळीबार

उल्हासनगर : शहरातील कैलास कॉलनी चौक परिसरात गुरुवारी रात्री अचानक झालेल्या गोळीबाराच्या घटनेमुळे मोठी खळबळ

UPSC च्या विविध परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

पुणे : केंद्रीय लोकसेवा आयोगाद्वारे (यूपीएससी) वर्ष २०२७ मध्ये घेतल्या जाणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षा आणि भरती

Cyber Crime : मुंबईत सायबर गुन्ह्यातील १०० कोटी वाचविण्यात यश

मुंबई : गेल्या काही वर्षांत सायबर फसवणुकीच्या गुन्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून सायबर पोलिसांनी

भारतात अणुऊर्जा क्षेत्रात गुंतवणूक करणार अमेरिका

नवी दिल्ली : भारत आणि अमेरिकेतील अणुऊर्जा क्षेत्रातील सहकार्यामध्ये आगामी काळात "मोठ्या घडामोडी" घडणार असल्याचे

शुभम खैरनारची पुण्यात सीबीआयकडून सखोल चौकशी

पुणे : 'नीट' पेपरफुटी प्रकरणात नाशिक येथून अटक करण्यात आलेला मुख्य आरोपी शुभम खैरनार याला सीबीआयने पुण्यात आणले