भूमी अभिलेख विभागाचा; राज्यात ५० नवी कार्यालये सुरु होणार; १० हजार पदांच्या आकृतीबंधालाही मूर्तरूप

मुंबई : प्रशासकीय कामकाज लोकाभिमुख आणि वेगवान करण्यासाठी, भूमी अभिलेख विभागाच्या सुधारित आकृतीबंधानुसार नव्याने ५० कार्यालये निर्माण करण्यात आली असून, १० हजार ६८३ पदांच्या आकृतीबंधाला मूर्तरूप देण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा निर्णय घेतला आहे. याबाबतचा शासन निर्णय आणि आदेश बुधवारी प्रसिद्ध करण्यात आला.महसूल विभागाच्या अधिपत्याखालील भूमी अभिलेख विभागातील कामकाजाचा वाढता व्याप लक्षात घेऊन शासनाने ११ मार्च २०२६ रोजी १० हजार ६८३ पदांच्या सुधारीत आकृतीबंधास मंजुरी दिली होती. या अंतर्गत राज्यभरात अनेक नवीन कार्यालये स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली होती. आता या नव्या कार्यालयांना मूर्त रूप देत त्यांचे प्रशासकीय कार्यक्षेत्र आणि मुख्यालयाचे ठिकाण निश्चित करण्यात आले आहे. या शासन निर्णयानुसार राज्यात उप संचालक भूमी अभिलेख यांचे १ नवीन कार्यालय, तर जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख यांची ८, नगर भूमापन अधिकाऱ्यांची २३ तर विशेष उप अधीक्षक भूमी अभिलेख यांची १७ नवीन कार्यालये स्थापन केली जाणार आहेत.



रचना कशी असेल?


१. उप संचालक, भूमी अभिलेख (१ नवीन कार्यालय) : नांदेड
२. जिल्हा अधीक्षक, भूमी अभिलेख (८ नवीन कार्यालये) : नागपूर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, अहिल्यानगर (अहमदनगर), नाशिक, पुणे, रायगड
३. नगर भूमापन अधिकारी (२३ नवीन कार्यालये) : पुणे, नागपूर, ठाणे (कल्याण, डोंबिवली, मिरा-भाईंदर), पालघर (वसई, विरार), रायगड (अलिबाग), नाशिक (मालेगाव), अहिल्यानगर, सातारा (कराड), छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड, लातूर, बीड, अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, वर्धा आणि चंद्रपूर
४) विशेष उप अधीक्षक भूमी अभिलेख तथा चौकशी अधिकारी (१७ नवीन कार्यालये)
५) गावठाण, शहर मापन आणि नगर भूमापन या कामकाजासाठी नवीन १७ कार्यालये (५ शहर मापन/गावठाण आणि १२ चौकशी अधिकारी)
राज्यात शहरीकरण आणि ग्रामीण भागातील गावठाण विस्ताराचा वेग वाढला आहे. त्यामुळे मालमत्तांची मोजणी, नगर भूमापन, हद्द निश्चिती आणि चौकशीची कामे प्रलंबित राहू नयेत यासाठी संबंधित तालुक्यातील व शहरातील वाढता कामकाजाचा व्याप पाहून ही नवी कार्यालये आणि तेथील कर्मचारी निश्चित करण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत. यामुळे ही कामे आता अधिक वेगाने मार्गी लागतील.चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री, महाराष्ट्र

Comments
Add Comment

Mumbai Local Delay : पावसामुळे मुंबईकरांची धावपळ वाढली! मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावरील लोकल उशिराने

मुंबई : मुंबई, नवी मुंबई आणि रायगड परिसरात गुरुवारपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाचा (Heavy Rain) जोर शुक्रवारीही कायम

Mumbai Rain : मुंबईत पाऊस सुरूच! सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार, ऑरेंज अलर्ट जारी

मुंबई : मुंबईत (Mumbai) सलग तिसऱ्या दिवशीही मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. गेल्या चार दिवसांपासून मुंबईसह

Co-operation Minister Babasaheb Patil : राज्य सहकारी गृहनिर्माण महासंघाला मध्यवर्ती संस्थेचा दर्जा; गृहनिर्माण संस्थांच्या प्रश्नांवर सरकार सकारात्मक – सहकार मंत्री बाबासाहेब पाटील

मुंबई : राज्यातील गृहनिर्माण संस्थांच्या (Housing Societies) विविध प्रश्नांबाबत राज्य सरकार सकारात्मक असून, राज्य सहकारी

Manhole Death : अमरापूरकर यांच्या मृत्यूनंतरही मॅनहोल्समध्ये पडून अनेकांचा मृत्यू

मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबईतील कुर्ला खैरानी रोडवरील मॅनहोलमध्ये पडून एका व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर

waterborne diseases : पावसाळा कालावधीतील जलजन्य आजारांच्या अनुषंगाने आवश्यक उपाययोजना करा

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : संपूर्ण पावसाळ्याच्या कालावधीत मुंबईकरांना सुदृढ आणि निरोगी आरोग्य सेवा देण्यासाठी

Mayor Ritu Tawde : नागरिकांच्या सुरक्षिततेशी खेळणाऱ्यांची गय केली जाणार नाही, महापौरांचा कठोर इशारा

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : साकीनाका येथील खैरानी मार्गावर खुल्या मॅनहोलमध्ये पडून असलम इसाक शेख (वय ५५ वर्षे) यांचा