ICEYE भारतात उपग्रह उत्पादन सुरू करणार

नवी दिल्ली : अंतराळ-आधारित गुप्तचर क्षेत्रातील जगातील आघाडीची कंपनी 'आय-साय' (ICEYE) पुढील एका वर्षात भारतात आपले पहिले उपग्रह उत्पादन केंद्र स्थापन करणार आहे. या केंद्रामध्ये देशाच्या सुरक्षेसाठी, पाळत ठेवण्यासाठी आणि पर्यावरण निरीक्षणासाठी आवश्यक असलेल्या लहान उपग्रहांची निर्मिती केली जाईल. 'आय-साय'चे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सह-संस्थापक राफल मॉड्रझेव्स्की यांनी ही माहिती दिली. हे केंद्र कंपनीचे आशिया-पॅसिफिक क्षेत्रातील प्रमुख उत्पादन केंद्र म्हणून काम करेल आणि अमेरिका व युरोपमधील ऑपरेशन्सना पूरक ठरेल.



भारतातील गुंतवणुकीबाबत राफल मॉड्रझेव्स्की म्हणाले, भारताची सध्याची गरज आणि आमचे तंत्रज्ञान यामध्ये उत्तम ताळमेळ आहे. जागतिक स्तरावर सध्या दोन मोठे प्रवाह दिसत आहेत. वाढता संरक्षण खर्च आणि अंतराळ तंत्रज्ञानाचा वाढता वापर. भारतात हे दोन्ही प्रवाह प्रकर्षाने जाणवतात. अलीकडच्या जागतिक युद्धांमधून देश हे शिकत आहेत की, अंतराळ हीच गुप्तचर आणि संरक्षणासाठी पुढची सीमा आहे. आम्ही या क्षेत्रात तज्ज्ञ असल्याने भारताकडे आमची एक महत्त्वाची बाजारपेठ म्हणून पाहतो.



वर्षाला ४० उपग्रह तयार करण्याचे लक्ष्य : कंपनीने भारतातील गुंतवणुकीचा अचूक आकडा अद्याप जाहीर केलेला नाही, मात्र ही गुंतवणूक कोट्यवधी डॉलरच्या घरात असण्याची शक्यता आहे. पहिल्या वर्षी भारतात सुमारे १० उपग्रह तयार करण्याचे उद्दिष्ट आहे. पुढील काही वर्षांत हे प्रमाण वार्षिक २० ते ४० उपग्रहांपर्यंत वाढवले जाईल. पुढील ६ ते १२ महिन्यांत भारतात मजबूत पुरवठा साखळी आणि उत्पादन केंद्र उभारले जाईल. भारतात उत्पादित केलेले उपग्रह केवळ भारताचीच नाही, तर जागतिक बाजारपेठेचीही गरज भागवतील.


'एसएआर' तंत्रज्ञानात आघाडीवर : 'आय-साय'कडे सध्या जगातील सर्वात प्रगत 'एसएआर' उपग्रहांचा समूह आहे. हे उपग्रह ढगांच्या आडून किंवा रात्रीच्या अंधारातही पृथ्वीवरील स्पष्ट चित्रे आणि गुप्तचर माहिती गोळा करू शकतात. सध्या कंपनी वर्षाला ५० उपग्रह तयार करते आणि २०२८ पर्यंत ही संख्या वार्षिक १०० च्या पार नेण्याची त्यांची योजना आहे. आम्ही आमची भारतातील उपस्थिती केवळ सरकारी ऑर्डर्सवर अवलंबून ठेवत नाही आहोत. ऑर्डर्स असोत वा नसोत, आम्ही भारतात उपग्रह निर्मिती करण्यासाठी पूर्णपणे कटिबद्ध आहोत, असे मॉड्रझेव्स्की यांनी शेवटी स्पष्ट केले.




Comments
Add Comment

Fire : रतलामजवळ राजधानी एक्सप्रेसला आग

रतलाम : तिरुवनंतपुरम-हजरत निजामुद्दीन राजधानी एक्सप्रेसला (गाडी क्रमांक १२४३१) मध्य प्रदेशातील रतलाम जिल्ह्यात

Education : १ जुलैपासून इयत्ता ९ वी आणि १० वीसाठी तीन भाषा अनिवार्य, CBSE चा निर्णय

नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून इयत्ता ९ वी आणि १० वीच्या भाषा

NEET UG 2026 Paper Leak : नीट २०२६ पेपरफुटी प्रकरण : सीबीआयची मोठी कारवाई, एनटीएच्या बायोलॉजीच्या प्राध्यापिकेला पुण्यातून अटक

नवी दिल्ली : 'नीट-युजी' (NEET-UG) परीक्षेत झालेल्या गैरव्यवहाराप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) तपासाची चक्रे

'पाकिस्तानने ठरवावे की त्यांना भूगोलाचा भाग व्हायचे आहे की इतिहासाचा ?'

नवी दिल्ली : पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये पर्यटकांवर हल्ला केला आणि त्यांची हत्या केली. या

PM Modi : 'द हेग'मध्ये जाणवला महाराष्ट्र, राजस्थान आणि यूपीचा उत्साह! पंतप्रधान मोदींकडून नेदरलँड्समधील अनिवासी भारतीयांचे विशेष कौतुक

हेग : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी १६ मे रोजी नेदरलँड्समधील 'द हेग' (The Hague) शहरात अनिवासी भारतीयांच्या

Monsoon in Andaman 2026 : आला रे आला...अंदमान-निकोबारमध्ये पावसाची हजेरी, केरळ आणि कोकणात कधी धडकणार ?

संपूर्ण देशातील नागरिक आणि विशेषतः शेतकरी राजा ज्याची आतुरतेने वाट पाहत होता, तो मान्सून अखेर अंदमानच्या  (Andaman)