Monsoon Rain Update : उकाड्यापासून लवकरच सुटका! अंदमानात पुढच्या ४८ तासांत पावसाच्या सरी कोसळणार!

देशभरात उन्हाचा चटका वाढत असतानाच भारतीय हवामान विभागाने (India Meteorological Department) एक दिलासादायक बातमी दिली आहे. नैऋत्य मान्सूनच्या प्रवासासाठी सध्या अत्यंत पोषक वातावरण निर्माण झाले असून, येत्या १६ मे पर्यंत मान्सून दक्षिण बंगालचा उपसागर, अंदमान समुद्र आणि अंदमान-निकोबार बेटांवर धडकण्याची दाट शक्यता आहे. दरवर्षीच्या तुलनेत यंदा मान्सूनचे आगमन काहीसे लवकर होण्याची चिन्हे दिसत असल्याने, यावर्षी पावसाळा वेळेपूर्वीच सुरू होऊ शकतो, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.



बंगालच्या उपसागरात हालचाली वाढल्या



हवामान विभागाने १३ मे रोजी प्रसिद्ध केलेल्या बुलेटिननुसार, बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मान्सूनला गती मिळत आहे. समुद्रावरील आर्द्रता, वाऱ्यांचा वेग आणि वातावरणीय दाब हे सर्व घटक मान्सूनच्या प्रगतीला पोषक ठरत आहेत. यामुळे मान्सूनच्या पुढील प्रवासाचा मार्ग मोकळा झाला असून, अंदमानात पाऊस दाखल झाल्यानंतर मान्सूनच्या अधिकृत प्रवासाची घोषणा केली जाईल.



एकीकडे मान्सूनची चाहूल, तर दुसरीकडे उष्णतेचा कहर


मान्सूनचे आगमन जवळ आले असले तरी, उत्तर आणि पश्चिम भारताला सध्या उष्णतेच्या तीव्र लाटेचा सामना करावा लागत आहे. विशेषतः राजस्थानमधील बाडमेर येथे तापमानाचा पारा ४८.३ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचला असून, हे देशातील सर्वाधिक तापमान ठरले आहे. पुढील एक आठवडा मध्य आणि उत्तर भारतात हीच स्थिती कायम राहणार असल्याचा इशाराही हवामान विभागाने दिला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, १३ ते १९ मे दरम्यान ईशान्य भारतातील राज्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. यासोबतच दक्षिण भारतातील तामिळनाडू, केरळ, कर्नाटक आणि पुद्दुचेरी या भागांतही १७ मे पर्यंत पावसाचा जोर कायम राहील. मान्सून पूर्व पावसाच्या या सरींमुळे दक्षिण भारतात उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळणार आहे. बंगालच्या उपसागराच्या नैऋत्य आणि पश्चिम-मध्य भागात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र आता अधिक सक्रिय झाले आहे. या प्रणालीचे रूपांतर 'वेल-मार्क्ड लो प्रेशर एरिया'मध्ये झाले असून, यामुळे समुद्रात मोठ्या प्रमाणावर हालचाली सुरू आहेत. या हवामान प्रणालीचा थेट परिणाम देशातील पावसाच्या वितरणावर होणार असून मान्सूनच्या वेगवान हालचालींसाठी ही यंत्रणा महत्त्वाची ठरणार आहे.





केरळनंतर महाराष्ट्राचा नंबर ?


अंदमान-निकोबारमध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर साधारणपणे तो केरळच्या दिशेने प्रवास करतो. अंदमानात मान्सून वेळेआधी पोहोचत असल्यामुळे केरळ आणि त्यानंतर महाराष्ट्रातही मान्सूनचे आगमन लवकर होणार का, याकडे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे डोळे लागले आहेत. जूनच्या पहिल्या पंधरवड्यात महाराष्ट्रात पावसाची एन्ट्री होऊ शकते, असे प्राथमिक संकेत मिळत आहेत.

Comments
Add Comment

Rain Update : 'पश्चिमी विक्षोभा'मुळे देशभरात मुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अनेक राज्यांना सतर्कतेचा इशारा

नवी दिल्ली : हवामान विभागाने देशभरात आठवडाभर मान्सून सक्रिय राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. उत्तर भारतातील

Liquor Ban : दारू मिळणारच नाही...ओल्ड मॉन्क सह 'या' प्रसिद्ध ब्रँड्सवर बंदी; प्रशासनाचा मोठा निर्णय!

नवी दिल्ली : मद्यप्रेमींसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. देशातील लोकप्रिय आणि

Melody Tiramisu Flavour : 'मेलोडी'चा नवीन इटालियन ट्विस्ट! मोदींनी मेलोनींना दिलेल्या 'त्या' गिफ्टवरून पारलेने लाँच केला 'Melody Tiramisu'!

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) आणि इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी (Giorgia Meloni) यांच्यातील

NEET UG Counselling 2026 : नीट यूजी काऊन्सिलिंगचे वेळापत्रक जाहीर; 'या' तारखेपासून सुरू होणार नोंदणी प्रक्रिया!

नवी दिल्ली : वैद्यकीय प्रवेशाची वाट पाहणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे.

CJP Protest Case : 'गुन्हेगारांना सोडणार नाही'; CJP आंदोलन प्रकरणी केंद्र सरकारचे सर्वोच्च न्यायालयात स्पष्ट विधान

नवी दिल्ली : नीट पेपरफुटी आणि शैक्षणिक सुधारणांविरोधातील आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांविरुद्ध दाखल करण्यात

Kangana Ranaut : "होय, मी मवाळ हिंदू होते; पण आता...भूतकाळातील टीकेवर कंगना रणौतचे टीकाकारांना चोख उत्तर

नवी दिल्ली : आपल्या बिनधास्त आणि रोखठोक वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असलेली बॉलिवूड अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना