Nashik connection of NEET paper exam : ३ मे रोजी देशभरात पार पडलेली बहुचर्चित 'नीट' (NEET UG) परीक्षा पेपरफुटीच्या गंभीर आरोपानंतर अखेर रद्द करण्याचा कठोर निर्णय प्रशासनाने घेतला आहे. आता या प्रकरणाचा सखोल तपास सीबीआयकडे (CBI) सोपवण्यात आला असून, दोषींवर कडक कारवाईचे निर्देश देण्यात आले आहेत. मात्र, या निर्णयामुळे देशभरातील तब्बल २२ लाख आणि महाराष्ट्रातील दीड लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना आता पुन्हा एकदा परीक्षेला सामोरे जावे लागणार आहे. या खळबळजनक प्रकरणात आता नाशिक कनेक्शन समोर आले आहे.
NEET पेपर लीक प्रकरणात महत्त्वाची माहिती समोर आली असून नाशिकमधून (Nashik) नीट परीक्षेचा पहिला पेपर फुटला असून येथून पहिली प्रश्नपत्रिका बाहेर पडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. प्रश्नपत्रिका लीक झाल्यानंतर पहिली कॉपी नाशिकमध्ये समोर आली. नाशिकमधील ही लीक प्रश्नपत्रिका हरियाणात पोहोचली, येथे फुटलेल्या पेपरचे 10 सेट तयार करण्यात आले. (Nashik connection)
नाशिक : बहुचर्चित भोंदू बाबा अशोक खरातची सखोल चौकशी सुरू आहे. या प्रकरणात अनेक बड्या नेत्यांची नावे समोर आल्याने खळबळ उडाली होती. या प्रकरणात रूपाली ...
त्यानंतर, हरियाणातून बिहार, आंध्र प्रदेश, जम्मू आणि काश्मीरपर्यंत नीटची प्रश्नपत्रिका सहजपणे पोहोचल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात एकाला ताब्यात घेतल्याची देखील माहिती समोर येत आहे. नीट पेपरफुटी प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्यात आला असून माहितीनुसार जयपूरमधून अटक करण्यात आलेला मनीष हाच पेपरफुटीचा मास्टरमाईंड असल्याचे दिसून येते. मनिषने प्रश्नपत्रिका प्रिंट होण्यापूर्वीच पेपरमधील संभावित प्रश्न माहिती करुन घेतले होते.
या घोटाळ्याची व्याप्ती किती मोठी होती, याचा अंदाज यावरून येतो की, 'नीट'मधील एकूण १८० प्रश्नांपैकी तब्बल १५० प्रश्न या हस्तलिखित संचातून जसेच्या तसे विचारले गेले होते. याचा सरळ अर्थ असा की, ज्या विद्यार्थ्यांच्या हाती ही चिठ्ठी लागली, त्यांना ७२० पैकी सहज ६०० गुण मिळवणे सहज शक्य होते. या प्रचंड मोठ्या गैरव्यवहारामुळे आणि प्रामाणिक विद्यार्थ्यांवर होणारा अन्याय टाळण्यासाठी, ३ मे रोजी झालेली NEET UG 2026 ची परीक्षा अखेर अधिकृतरीत्या रद्द घोषित करण्यात आली आहे.
मुख्यमंत्र्यांची लेखी मंजुरी बंधनकारक; पंतप्रधानांच्या आवाहनानंतर राज्य सरकारचा मोठा निर्णय मुंबई : जागतिक इंधन संकटाच्या पार्श्वभूमीवर ...
आता, नव्या परीक्षेची तारीख लवकरच जाहीर होईल, त्यासाठी परीक्षार्थींचे परीक्षा केंद्र 3 मे रोजीचेच राहणार असून विद्यार्थ्यांना नव्याने रजिस्ट्रेशन करण्याची गरज नाही. विद्यार्थ्यांकडून नव्या परीक्षेसाठी शुल्क घेतले जाणार नाही, मात्र नव्या परीक्षेसाठी नवे ओळखपत्र दिले जाणार आहे. विद्यार्थी,पालकांनी फक्त एनटीएच्या सूचनांवर लक्ष ठेवावे, असे आवाहन केंद्राकडून करण्यात आले आहे.




