Khandala-Lonavala : खंडाळा-लोणावळा घाटातील ७० टक्के वाहतूक वळली 'मिसिंग लिंक'कडे

अवघ्या १० दिवसांत बोरघाटातील चित्र बदलले; वेळ आणि इंधनाची बचत करत 'सुसाट' प्रवास


मुंबई : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील (एक्स्प्रेस वे) प्रवासातील सर्वात कठीण टप्पा समजला जाणारा बोरघाट आता वाहतूक कोंडीतून मुक्त झाला आहे. गेल्या अनेक दशकांपासून प्रवाशांच्या संयमाची परीक्षा पाहणाऱ्या खंडाळा-लोणावळा घाटातील सुमारे ७० टक्के हलकी वाहतूक आता नवनिर्मित 'मिसिंग लिंक'कडे वळली आहे. अवघ्या १० दिवसांपूर्वी सुरू झालेल्या या मार्गामुळे घाटातील वाहनांच्या लांबच लांब रांगा गायब झाल्या असून मुंबई-पुणे प्रवास अधिक वेगवान आणि सुरक्षित झाला आहे.मे महिन्यातील उन्हाळी सुट्ट्या आणि शनिवार-रविवारचा 'विकेंड' म्हणजे बोरघाटात ५ ते ६ किलोमीटरच्या रांगा हे समीकरणच बनले होते. मात्र, 'मिसिंग लिंक' सुरू झाल्यापासून हे चित्र पूर्णपणे पालटले आहे. सध्या केवळ ३० टक्के अवजड वाहने जुन्या घाट मार्गाचा वापर करत असल्याने लोणावळा-खंडाळ्यातील तीव्र वळणे आता मोकळा श्वास घेत आहेत.



मिसिंग लिंकमुळे प्रवासाचे एकूण अंतर ६ किलोमीटरने कमी झाले आहे. परिणामी, मुंबई ते पुणे या प्रवासातील २५ ते ३० मिनिटांचा मौल्यवान वेळ वाचत आहे. घाटातील तीव्र चढ-उतार आणि वळणांमुळे होणारी वाहतूक कोंडी आता पूर्णपणे नाहीशी झाली आहे. घाट उतरताना होणारे भीषण अपघात हा चिंतेचा विषय होता. नवीन मार्ग सुरक्षित असल्याने गेल्या १० दिवसांत या मार्गावर एकाही अपघाताची नोंद झालेली नाही. एक्स्प्रेस वे सहा पदरी असला, तरी ५.६८ किमीचा हा नवीन भाग आठ पदरी आहे. त्यामुळे वाहनांना अधिक वेग आणि मोकळी जागा मिळत आहे. घाटातील संथ वाहतुकीमुळे होणारा इंधनाचा अपव्यय बोगद्यातील प्रवासामुळे टळला आहे.

७ वर्षांच्या परिश्रमाचे फलित


महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) २०१९ मध्ये या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे काम हाती घेतले होते. सुमारे ६ हजार ७०० कोटी रुपये खर्च करून सात वर्षांच्या अथक परिश्रमानंतर हा प्रकल्प पूर्ण झाला आहे. लोणावळा-खंडाळा शहरांना बायपास करून थेट बोगद्यातून नेणाऱ्या या मार्गामुळे प्रवाशांचे 'सुसाट' प्रवासाचे स्वप्न अखेर सत्यात उतरले आहे

Comments
Add Comment

Chandrashekhar Bawankule : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची १,०५३ एकर वनजमीन सुरक्षित! महसूलमंत्री बावनकुळेंच्या निर्णयाने वन विभागाचा हक्क कायम

मुंबई : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानालगतच्या (Sanjay Gandhi National Park forest) महत्त्वाच्या वनक्षेत्राबाबत राज्य सरकारने मोठा

Special Trains : मुंबई आणि मडगाव दरम्यान धावणार ४ साप्ताहिक विशेष गाड्या; प्रवाशांना मोठा दिलासा

मुंबई: आठवड्याच्या अखेरीस आणि आगामी सणासुदीच्या काळात प्रवासाचे नियोजन करणाऱ्या प्रवाशांसाठी मध्य रेल्वेने एक

Gold medal-winning athlete : सुवर्णपदक विजेता खेळाडू राज ठाकरेंवर भडकला; अडीच तास ताटकळत ठेवूनही भेट न झाल्याने नाराजी

मुंबई : क्रीडा क्षेत्रात देशाचे आणि राज्याचे नाव उज्ज्वल करणाऱ्या खेळाडूंना अनेकदा प्रशासकीय आणि राजकीय

Shrinivas Vinayak Kulkarni : मराठी साहित्यातील तेजस्वी पर्व संपले; मौज नियतकालिकाचे संपादक आणि 'डोह'कार श्री. वि. कुलकर्णी यांना मुख्यमंत्र्यांनी वाहिली श्रद्धांजली

मुंबई : ज्येष्ठ साहित्यिक, 'डोह'कार म्हणून ओळखले जाणारे श्रीनिवास विनायक कुलकर्णी म्हणजेच श्री. वि. कुलकर्णी (Shrinivas

Mangal Prabhat Lodha : म्हाडासाठी राखीव घरे न देणाऱ्या विकासकांवर कडक कारवाई करा; गरज पडल्यास कारागृहात पाठवा - मंत्री मंगल प्रभात लोढा

नागरिक आणि म्हाडा मधील संवाद अधिक प्रभावी करण्यासाठी सल्लागार समिती स्थापन करण्याच्या मंत्री लोढा यांच्या

Samagra Shiksha Abhiyan : २२ वर्षांचा संघर्ष अखेर संपला! समग्र शिक्षा अभियानातील ३,२७६ कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवाशाश्वती; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय

मुंबई : तब्बल २२ वर्षांपासून समग्र शिक्षा अभियानांतर्गत (Samagra Shiksha Abhiyan) कंत्राटी तत्त्वावर कार्यरत असलेल्या ३,२७६