आसाम : आसामच्या राजकारणात पुन्हा एकदा हिमंता बिस्वा सरमा (Himanta Biswa Sarma) यांचे वर्चस्व कायम राहिले असून, त्यांची भाजप विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी एकमताने निवड करण्यात आली आहे. यामुळे हिमंता बिस्वा सरमा सलग दुसऱ्यांदा आसामचे मुख्यमंत्री बनणार आहेत. १२ मे रोजी गुवाहाटी येथे होणाऱ्या भव्य शपथविधी सोहळ्यात ते मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी शनिवारी एक महत्त्वपूर्ण संकेत दिला आहे. त्यांनी सांगितले की, युक्रेनसोबत सुरू असलेले युद्ध पूर्णपणे ...
जेपी नड्डा यांनी सांगितले की, विधानसभा पक्षनेतेपदासाठी एकूण आठ प्रस्ताव सादर करण्यात आले होते. रणजित कुमार दास, विश्वजित, अजंता निओ, रामेश्वर तेली, राजदीप राय, अशोक सिंघल, पियुष हजारिका आणि चक्रधर गोगोई यांनी हिमंता बिस्वा सरमा यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. विशेष म्हणजे या सर्व प्रस्तावांना भाजप तसेच मित्रपक्षांच्या आमदारांनी एकमताने पाठिंबा दिला.
एनडीएतील मित्रपक्षांचे नेते आणि आमदार देखील बैठकीला उपस्थित होते. आसाम गण परिषदचे नेते अतुल बोरा (Atul Bora) यांनीही हिमंता यांच्या नावाला समर्थन दिले. त्यामुळे कोणतीही मतभिन्नता न होता हिमंता बिस्वा सरमा यांची एकमताने विधिमंडळ पक्षनेते म्हणून निवड निश्चित झाली.
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी म्हटले की, काँग्रेस फक्त खोटेपणा आणि विश्वासघाताचे राजकारण करते. काँग्रेसच्या सत्तेच्या पुस्तकात ...
राजकीय विश्लेषकांच्या मते, हिमंता बिस्वा सरमा यांच्या नेतृत्वाखालील सरकारने गेल्या कार्यकाळात कायदा-सुव्यवस्था, पायाभूत सुविधा, गुंतवणूक आणि ईशान्य भारतातील विकासाच्या मुद्द्यांवर भर दिला. याच कामगिरीच्या जोरावर भाजपला पुन्हा जनतेचा कौल मिळाल्याचे मानले जात आहे.
View this post on Instagram
सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी मिळाल्यानंतर हिमंता बिस्वा सरमा यांच्यासमोर रोजगार, पूरस्थिती, उद्योगवाढ आणि सीमावाद यांसारख्या महत्त्वाच्या प्रश्नांवर काम करण्याचे मोठे आव्हान असणार आहे.




