कोकणची पोरं हुश्शार ! बारावी प्रमाणे दहावीच्या निकालातही ९७.६२ टक्क्यांसह राज्यात कोकणच अव्वल

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केलेल्या दहावीच्या निकालात कोकण विभागाने पुन्हा एकदा आपला दबदबा कायम राखला आहे. बारावीच्या निकालातील यशाची परंपरा जपत, दहावीतही ९७.६२ टक्के निकालासह कोकण विभागाने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. यंदा राज्याचा एकूण निकाल ९२.०९ टक्के लागला असून, निकालात नेहमीप्रमाणेच मुलींनी बाजी मारली आहे.


फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या या परीक्षेसाठी राज्यातील नऊ विभागीय मंडळांतून एकूण १५ लाख ५५ हजार २६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १५ लाख ४२ हजार ४७२ विद्यार्थी परीक्षेला बसले होते, ज्यातील १४ लाख २० हजार ४८६ विद्यार्थी यशस्वी झाले आहेत. राज्यातील नऊ मंडळांमध्ये कोकण विभागाने बाजी मारली असली, तर छत्रपती संभाजीनगर विभागाचा निकाल सर्वांत कमी (८८.४१ टक्के) लागला आहे. कोल्हापूर ९५.४७ टक्क्यांसह दुसऱ्या स्थानी असून, मुंबई (९४.९७ टक्के) आणि पुणे (९४.२४ टक्के) यांनीही समाधानकारक कामगिरी केली आहे.


मुलींचे वर्चस्व कायम

यंदाही निकालात 'लेकी' सरस ठरल्या आहेत. परीक्षेला बसलेल्या ७ लाख २२ हजार ४५ मुलींपैकी ९४.९६ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या, तर ८ लाख २० हजार ४२७ मुलांपैकी ८९.५६ टक्के मुले यशस्वी झाली. मुलांच्या तुलनेत मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ५.४० टक्क्यांनी अधिक आहे.


विभागनिहाय निकाल


• कोकण : ९७.६२%
• कोल्हापूर : ९५.४७%
• मुंबई : ९४.९७%
• पुणे : ९४.२४%
• नाशिक : ९०.५३%
• अमरावती : ९०.५०%
• नागपूर : ८९.०७%
• लातूर : ८८.४२%
• छत्रपती संभाजीनगर : ८८.४१%


श्रेणीसुधारसाठी तीन संधी

ज्या विद्यार्थ्यांना आपले गुण सुधारण्याची इच्छा आहे, त्यांच्यासाठी मंडळाने 'श्रेणीसुधार/गुणसुधार' योजना उपलब्ध करून दिली आहे. अशा विद्यार्थ्यांना जून-जुलै २०२६, फेब्रुवारी-मार्च २०२७ आणि जून-जुलै २०२७ अशा आगामी तीन परीक्षांमध्ये प्रविष्ट होण्याची संधी दिली जाणार आहे.दरम्यान, यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करतानाच शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना धीर दिला. ते म्हणाले, "एका परीक्षेचा निकाल तुमचे संपूर्ण आयुष्य किंवा बुद्धिमत्ता ठरवू शकत नाही. ही केवळ पहिली पायरी आहे. ज्यांना अपेक्षित यश मिळाले नाही, त्यांनी खचून न जाता फेरपरीक्षेच्या संधीचा लाभ घ्यावा, शासन आपल्या पाठीशी आहे," असा विश्वास त्यांनी व्यक्त केला

Comments
Add Comment

Coronation of Shivaji Maharaj : शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या तयारीला वेग; सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे'

रायगड : दुर्गराज रायगडावर तिथीनुसार २७ जून २०२६ रोजी साजऱ्या होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या तयारीला

Mantri Nitesh Rane : कोकणातील तीर्थस्थळे जलमार्गांनी जोडणार!

मंत्री नितेश राणे यांची संकल्पना; आंगणेवाडी, कुणकेश्वर, गणपतीपुळे, पाली बल्लाळेश्वर मंदिराचा समावेश मुंबई :

Narendra Modi : सिंधुदुर्ग आणि नाशिक जागतिक पर्यटन स्थळे म्हणून विकसित करणार!

नीती आयोगाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी मांडला रोडमॅप; २०४७ पर्यंत ५ ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट

Mumbai-Goa Highway Accident : उभ्या कंटेनरला कारची भीषण धडक; दोन जणांचा जागीच मृत्यू, कुटुंबावर दुःखाचा डोंगर...

पोलादपूर: मुंबई-गोवा महामार्गावर पुन्हा एकदा भीषण अपघाताची घटना घडली आहे. पोलादपूरजवळ झालेल्या या अपघातात दोन

Raigad Crime :मुंबईकर मुलीची माणगावमध्ये निर्घृण हत्या, मृतदेह जंगलात फेकला, परिसरात भीतीचं वातावरण

MANGAON : रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात एका १५ वर्षीय मुलीची निर्घृण हत्या करून तिचा मृतदेह जंगलात फेकून

Konkan Railway Alert : मांडवी, तेजस, मत्स्यगंधासह अनेक गाड्यांच्या वेळेत १५ जूनपासून मोठे बदल...

Mumbai-Goa Trains : कोकण रेल्वे मार्गावर प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आली आहे. पावसाळ्याचा विचार