Dr. Neelam Gorhe : राज्यातील अल्पवयीनांवरील अत्याचार प्रकरणांवर विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे व्यथित

थेऊर, लोणावळा, अकोला, कोल्हापूर आणि सोलापूर प्रकरणांत कठोर कारवाई, फास्ट ट्रॅक न्यायालयीन सुनावणी आणि पीडित कुटुंबांना तातडीच्या मदतीची मागणी


मुंबई : महाराष्ट्र विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी राज्यात अल्पवयीन मुली आणि मुलांवरील वाढत्या लैंगिक अत्याचारांच्या घटनांबाबत तीव्र चिंता व्यक्त करत पोलीस महासंचालक मा. श्री. सदानंद दाते यांना पत्र पाठवून कठोर आणि तातडीच्या कारवाईची मागणी केली आहे. थेऊर, लोणावळा, अकोला, कोल्हापूर आणि सोलापूर येथे घडलेल्या धक्कादायक घटनांचा उल्लेख करत त्यांनी आरोपींना कठोर शिक्षा आणि पीडितांना जलद न्याय देण्याची मागणी केली आहे.


डॉ. गोऱ्हे यांनी निवेदनात नमूद केले आहे की, अल्पवयीन मुलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये जवळचे नातेवाईक आणि शेजारीच आरोपी असल्याने समाजात भीतीचे आणि असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. थेऊर येथे ६ वर्षीय मुलीवर शेजाऱ्याकडून अत्याचाराचा प्रयत्न, लोणावळ्यात वडिलांकडूनच मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार, अकोल्यात १० वर्षीय चिमुकलीवर वृद्ध शेजाऱ्याकडून अत्याचार, कोल्हापुरात जन्मदाते वडील व नातेवाईकांकडून १५ वर्षीय मुलीवर पाच वर्षे सुरू असलेले अत्याचार तसेच सोलापुरात ११ वर्षीय मुलावर अनैसर्गिक अत्याचार या घटनांनी संपूर्ण राज्य हादरले असल्याचे त्यांनी म्हटले आहे.


या सर्व प्रकरणांचा तपास जलदगतीने पूर्ण करून तातडीने चार्जशीट दाखल करावी, आरोपींना जामीन मिळू नये यासाठी कठोर भूमिका घ्यावी आणि सर्व खटले फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवून दोषींना POCSO कायद्यानुसार कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी डॉ. गोऱ्हे यांनी केली आहे.


तसेच प्रत्येक पीडित बालकाच्या कुटुंबाला मनोधैर्य योजनेअंतर्गत ५ ते १० लाखांची आर्थिक मदत तत्काळ द्यावी, बालसंगोपन योजनेचा लाभ मिळवून द्यावा आणि पुनर्वसनासाठी विशेष कृती आराखडा तयार करावा, अशीही मागणी त्यांनी केली आहे. पीडित कुटुंबांना सुरक्षित निवास, आर्थिक उपजीविकेच्या संधी, साक्षीदार संरक्षण आणि आवश्यक शासकीय मदत उपलब्ध करून देण्यासाठी सर्वसमावेशक यंत्रणा उभारण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.


या अत्यंत संवेदनशील प्रकरणांकडे वैयक्तिक लक्ष देऊन पीडित कुटुंबियांना तातडीने न्याय मिळवून द्यावा, अशी अपेक्षा डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केली.

Comments
Add Comment

SSC Result : कधी आहे दहावीचा निकाल ? आली मोठी अपडेट

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) दहावीच्या परीक्षेचा निकाल

Mumbai Water Metro : मुंबई वॉटर मेट्रो प्रकल्पाविषयी काय म्हणाले मुख्यमंत्री फडणवीस ?

मुंबई : मुंबई महानगर प्रदेशातील वाढत्या वाहतूक गरजांसाठी शाश्वत आणि पर्यावरणपूरक जलवाहतूक व्यवस्था उभारण्याचा

DCM Eknath Shinde : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे हेलिकॉप्टर वादाळात अडकले आणि...

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे DCM Eknath Shinde हेलिकॉप्टरमधून प्रवास करत असताना

Mumbai Water Metro : मुंबई वॉटर मेट्रो प्रकल्पामुळे देशात आधुनिक जलवाहतुकीचा नवा अध्याय सुरू होणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

- महाराष्ट्र सागरी मंडळ आणि नॉर्वेच्या मे. हायके एएस यांच्यात सामंजस्य करार मुंबई : मुंबई महानगर प्रदेशातील

Chandrakant Patil : पदे बोगस, पदव्याही बोगस; वांद्रेतील 'हिरे' महाविद्यालयात १३२ विद्यार्थ्यांना गंडा, मंत्री चंद्रकांत पाटलांचे फौजदारी कारवाईचे आदेश

मुंबई : वांद्रे येथील डॉ. बळीराम हिरे महाविद्यालयात १३२ हून अधिक विद्यार्थ्यांना बोगस अभ्यासक्रम आणि पदव्या

Mumbai's water metro : मुंबईच्या वॉटर मेट्रोला 'नॉर्वे'चे सागरी तंत्रज्ञान

 १० नवीन जलमार्ग आणि ४५ टर्मिनल्सचे जाळे; महाराष्ट्र सागरी मंडळाचा 'हायके' कंपनीशी करार मुंबई : मुंबई महानगर