SRPF Exam : 'ते' ८५ प्रश्न, विद्यार्थ्यांचा संताप आणि आता SRPF भरतीला ब्रेक; प्रकरण काय ?

SRPF recruitment : राज्य राखीव पोलीस बल (SRPF) गट क्रमांक ५ च्या सशस्त्र पोलीस शिपाई भरती प्रक्रियेला अखेर स्थगिती देण्यात आली आहे. सदर भरती प्रक्रियेत खाजगी प्रकाशकाच्या प्रकाशन संस्थेतील सराव प्रश्नसंचातील तब्बल ८५ प्रश्न घेण्यात आल्याची बाब समोर आली होती. त्यानंतर अनेक विद्यार्थ्यांकडून संताप व्यक्त करण्यात येत होता. अखेर लेखी परीक्षेतील प्रश्नांबाबत गंभीर अनियमितता समोर आल्यानंतर प्रशासनाने हा मोठा निर्णय घेतला आहे.



प्रकरण नेमकं काय ?


२ मे २०२६ रोजी झालेल्या लेखी परीक्षेत १०० प्रश्नांपैकी तब्बल ८५ प्रश्न एका खासगी प्रकाशनाच्या सराव संचातून जसेच्या तसे विचारले गेले होते. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला होता. केवळ एकाच पुस्तकातील इतक्या मोठ्या प्रमाणात प्रश्न येणे हा निव्वळ योगायोग नसून, यात मोठा गैरप्रकार असल्याचा संशय विद्यार्थ्यांनी व्यक्त केला. अनेक दिवसांपासून प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी या परीक्षेवर तीव्र आक्षेप घेत ती रद्द करण्याची मागणी लावून धरली होती. (SRPF recruitment)


अखेर अप्पर पोलीस महासंचालकांनी विद्यार्थ्यांच्या तक्रारीची दखल घेत या प्रकरणाच्या सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यामुळे या प्रकरणाचा तपास पूर्ण होईपर्यंत संपूर्ण भरती प्रक्रिया थांबवण्यात आली आहे. "या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असून, अहवाल प्राप्त होताच पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल," असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.



एसआरपीएफनं काय म्हटलं ?


समादेशक, राज्य राखीव पोलीस बल, गट क्र. ५, दौंड यांचे अधिपत्याखालील सन २०२४-२५ सशस्त्र पोलीस शिपाई भरतीसाठी लेखी परीक्षा दिनांक ०२.०५.२०२६ रोजी आयोजित करण्यात आली होती. समादेशक, राज्य राखीव पोलीस बल, गट क्र. ५, दौंड यांनी घेतलेल्या लेखी परीक्षेमधील प्रश्नपत्रिकेत १०० पैकी ८५ प्रश्न हे महाराष्ट्र पब्लीकेशन पोलीस भरती प्रश्नपत्रिका सराव प्रश्नसंच १० यामधील असल्याबाबतच्या तक्रारी माध्यमांद्वारे प्राप्त झालेल्या आहेत.
त्याअनुषंगाने पोलीस उपमहानिरीक्षक, राज्य राखीव पोलीस बल, म.रा., पुणे यांच्यामार्फत दिनांक ०४/०५/२०२६ पासून याप्रकरणी सखोल चौकशी सुरु करण्यात आली आहे. समादेशक, राज्य राखीव पोलीस बल गट क्र. ५, दौंड यांची भरती प्रक्रिया पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्यात आली आहे. सदर चौकशी अहवाल प्राप्त होताच. पुढील योग्य कार्यवाही करण्यांत येईल. (SRPF recruitment)


त्यामुळे आता सर्वांचे लक्ष चौकशी अहवालाकडे लागले आहे. ही परीक्षा पूर्णपणे रद्द होऊन पुन्हा घेतली जाणार की केवळ संशयास्पद बाबींची दुरुस्ती केली जाणार, याबाबत उमेदवारांमध्ये संभ्रम कायम आहे. पुढील आदेश येईपर्यंत ही स्थगिती कायम राहणार आहे.

Comments
Add Comment

Maharashtra Heavy Rain : राज्यात पावसाचा कहर! १७ NDRF आणि 6 SDRF पथके तैनात; लोणावळ्यात तब्बल ६७० मिमी पावसाची नोंद

मुंबई : राज्यात मुसळधार पावसाचा जोर कायम असून काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीची परिस्थिती निर्माण झाली आहे.

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या विशेष फेरीस ८ जुलैपर्यंत मुदतवाढ

मुंबई : राज्यातील काही भागांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना सुटी जाहीर करण्यात

इंद्रायणीच्या पुरामुळे आळंदीत वारकऱ्यांची गैरसोय; मुंबई डबेवाले करणार भोजन व निवासाची व्यवस्था

Mumbai  : खेड, मावळ, पिंपरी-चिंचवड आणि लोणावळा परिसरात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे

Heavy Rain in Mumbai Pune : पावसाचा कहर! मुंबई-ठाण्यासाठी ऑरेंज अलर्ट तर पुण्यात १२ जुलैपर्यंत शाळांना सुट्टी जाहीर

मुंबई : राज्यात मुसळधार पावसाचा जोर कायम असून भारतीय हवामान विभागाने (IMD) मुंबई आणि ठाणे जिल्ह्यांसाठी उद्या

Flood in Indrayani : इंद्रायणीला पूर; वारकऱ्यांसाठी सरकारचे महत्त्वाचे आवाहन! आळंदीत न जाण्याचे प्रशासनाचे आवाहन

पुणे : संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यानिमित्त आळंदीकडे निघालेल्या वारकरी आणि भाविकांसाठी राज्य

TET Exam Paper Leak : टीईटी पेपरफुटी प्रकरणात मोठी घडामोड! चारही आरोपींना १८ जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी

भिवंडी : राज्यभरात गाजत असलेल्या शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणात मोठी घडामोड झाली