SRPF Exam : 'ते' ८५ प्रश्न, विद्यार्थ्यांचा संताप आणि आता SRPF भरतीला ब्रेक; प्रकरण काय ?

SRPF recruitment : राज्य राखीव पोलीस बल (SRPF) गट क्रमांक ५ च्या सशस्त्र पोलीस शिपाई भरती प्रक्रियेला अखेर स्थगिती देण्यात आली आहे. सदर भरती प्रक्रियेत खाजगी प्रकाशकाच्या प्रकाशन संस्थेतील सराव प्रश्नसंचातील तब्बल ८५ प्रश्न घेण्यात आल्याची बाब समोर आली होती. त्यानंतर अनेक विद्यार्थ्यांकडून संताप व्यक्त करण्यात येत होता. अखेर लेखी परीक्षेतील प्रश्नांबाबत गंभीर अनियमितता समोर आल्यानंतर प्रशासनाने हा मोठा निर्णय घेतला आहे.



प्रकरण नेमकं काय ?


२ मे २०२६ रोजी झालेल्या लेखी परीक्षेत १०० प्रश्नांपैकी तब्बल ८५ प्रश्न एका खासगी प्रकाशनाच्या सराव संचातून जसेच्या तसे विचारले गेले होते. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला होता. केवळ एकाच पुस्तकातील इतक्या मोठ्या प्रमाणात प्रश्न येणे हा निव्वळ योगायोग नसून, यात मोठा गैरप्रकार असल्याचा संशय विद्यार्थ्यांनी व्यक्त केला. अनेक दिवसांपासून प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी या परीक्षेवर तीव्र आक्षेप घेत ती रद्द करण्याची मागणी लावून धरली होती. (SRPF recruitment)


अखेर अप्पर पोलीस महासंचालकांनी विद्यार्थ्यांच्या तक्रारीची दखल घेत या प्रकरणाच्या सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यामुळे या प्रकरणाचा तपास पूर्ण होईपर्यंत संपूर्ण भरती प्रक्रिया थांबवण्यात आली आहे. "या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असून, अहवाल प्राप्त होताच पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल," असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.



एसआरपीएफनं काय म्हटलं ?


समादेशक, राज्य राखीव पोलीस बल, गट क्र. ५, दौंड यांचे अधिपत्याखालील सन २०२४-२५ सशस्त्र पोलीस शिपाई भरतीसाठी लेखी परीक्षा दिनांक ०२.०५.२०२६ रोजी आयोजित करण्यात आली होती. समादेशक, राज्य राखीव पोलीस बल, गट क्र. ५, दौंड यांनी घेतलेल्या लेखी परीक्षेमधील प्रश्नपत्रिकेत १०० पैकी ८५ प्रश्न हे महाराष्ट्र पब्लीकेशन पोलीस भरती प्रश्नपत्रिका सराव प्रश्नसंच १० यामधील असल्याबाबतच्या तक्रारी माध्यमांद्वारे प्राप्त झालेल्या आहेत.
त्याअनुषंगाने पोलीस उपमहानिरीक्षक, राज्य राखीव पोलीस बल, म.रा., पुणे यांच्यामार्फत दिनांक ०४/०५/२०२६ पासून याप्रकरणी सखोल चौकशी सुरु करण्यात आली आहे. समादेशक, राज्य राखीव पोलीस बल गट क्र. ५, दौंड यांची भरती प्रक्रिया पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्यात आली आहे. सदर चौकशी अहवाल प्राप्त होताच. पुढील योग्य कार्यवाही करण्यांत येईल. (SRPF recruitment)


त्यामुळे आता सर्वांचे लक्ष चौकशी अहवालाकडे लागले आहे. ही परीक्षा पूर्णपणे रद्द होऊन पुन्हा घेतली जाणार की केवळ संशयास्पद बाबींची दुरुस्ती केली जाणार, याबाबत उमेदवारांमध्ये संभ्रम कायम आहे. पुढील आदेश येईपर्यंत ही स्थगिती कायम राहणार आहे.

Comments
Add Comment

Ahilyanagar : नीट परीक्षेत कमी गुण मिळाले अन् विद्यार्थिनीने टोकाचे पाऊल उचलले ; सुसाईड नोटमध्ये लिहिलं आत्महत्येचं कारण

Ahilyanagar : नीट परीक्षेत अपेक्षित गुण न मिळाल्याच्या नैराश्यातून १९ वर्षीय विद्यार्थिनीने टोकाचे पाऊल उचलल्याची

BENDUR FESTIVAL : सर्जा-राजाप्रती कृतज्ञतेचा उत्सव; महाराष्ट्रातील पारंपरिक 'बेंदूर' सणाची परंपरा आणि महत्त्व

भारतीय संस्कृती ही कृषीसंस्कृतीवर आधारलेली असून, या मातीतील प्रत्येक सण-उत्सव हा थेट प्रकृती आणि

Shahapur Rain : शहापूरात पावसाचा कहर! हनुमान धबधब्यावर भीषण दुर्घटना; ५ पर्यटक वाहून गेले

शहापूर : ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात (Shahapur Rain) झालेल्या ढगफुटीसदृश मुसळधार पावसामुळे हनुमान धबधब्यावर मोठी

Maharashtra Monsoon Weather : पावसाचा पुन्हा जोर! पुढील २४ तास अतिमहत्त्वाचे; महाराष्ट्रातील २२ जिल्ह्यांना हवामान खात्याचा इशारा

मुंबई : जुलैच्या अखेरच्या आठवड्यात महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाने जोरदार पुनरागमन केले आहे. उत्तर-पश्चिम

Dam Water Level : राज्यात ५६ टक्के उपयुक्त पाणीसाठा, मराठवाड्यात मात्र चिंता कायम

पुणे : जुलै महिन्यात झालेल्या समाधानकारक पावसामुळे राज्यातील धरणांमधील उपयुक्त पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली

Dog Attack : रेबीजमुळे चिमुकल्या समर्थ स्वामीचा दुर्दैवी मृत्यू; भटक्या कुत्र्यांवर कारवाईची मागणी

सोलापूर : भवानी पेठ परिसरातील घोंगडे वस्ती येथे कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या समर्थ स्वामी या