SRPF Exam : 'ते' ८५ प्रश्न, विद्यार्थ्यांचा संताप आणि आता SRPF भरतीला ब्रेक; प्रकरण काय ?

SRPF recruitment : राज्य राखीव पोलीस बल (SRPF) गट क्रमांक ५ च्या सशस्त्र पोलीस शिपाई भरती प्रक्रियेला अखेर स्थगिती देण्यात आली आहे. सदर भरती प्रक्रियेत खाजगी प्रकाशकाच्या प्रकाशन संस्थेतील सराव प्रश्नसंचातील तब्बल ८५ प्रश्न घेण्यात आल्याची बाब समोर आली होती. त्यानंतर अनेक विद्यार्थ्यांकडून संताप व्यक्त करण्यात येत होता. अखेर लेखी परीक्षेतील प्रश्नांबाबत गंभीर अनियमितता समोर आल्यानंतर प्रशासनाने हा मोठा निर्णय घेतला आहे.



प्रकरण नेमकं काय ?


२ मे २०२६ रोजी झालेल्या लेखी परीक्षेत १०० प्रश्नांपैकी तब्बल ८५ प्रश्न एका खासगी प्रकाशनाच्या सराव संचातून जसेच्या तसे विचारले गेले होते. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला होता. केवळ एकाच पुस्तकातील इतक्या मोठ्या प्रमाणात प्रश्न येणे हा निव्वळ योगायोग नसून, यात मोठा गैरप्रकार असल्याचा संशय विद्यार्थ्यांनी व्यक्त केला. अनेक दिवसांपासून प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी या परीक्षेवर तीव्र आक्षेप घेत ती रद्द करण्याची मागणी लावून धरली होती. (SRPF recruitment)


अखेर अप्पर पोलीस महासंचालकांनी विद्यार्थ्यांच्या तक्रारीची दखल घेत या प्रकरणाच्या सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यामुळे या प्रकरणाचा तपास पूर्ण होईपर्यंत संपूर्ण भरती प्रक्रिया थांबवण्यात आली आहे. "या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असून, अहवाल प्राप्त होताच पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल," असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.



एसआरपीएफनं काय म्हटलं ?


समादेशक, राज्य राखीव पोलीस बल, गट क्र. ५, दौंड यांचे अधिपत्याखालील सन २०२४-२५ सशस्त्र पोलीस शिपाई भरतीसाठी लेखी परीक्षा दिनांक ०२.०५.२०२६ रोजी आयोजित करण्यात आली होती. समादेशक, राज्य राखीव पोलीस बल, गट क्र. ५, दौंड यांनी घेतलेल्या लेखी परीक्षेमधील प्रश्नपत्रिकेत १०० पैकी ८५ प्रश्न हे महाराष्ट्र पब्लीकेशन पोलीस भरती प्रश्नपत्रिका सराव प्रश्नसंच १० यामधील असल्याबाबतच्या तक्रारी माध्यमांद्वारे प्राप्त झालेल्या आहेत.
त्याअनुषंगाने पोलीस उपमहानिरीक्षक, राज्य राखीव पोलीस बल, म.रा., पुणे यांच्यामार्फत दिनांक ०४/०५/२०२६ पासून याप्रकरणी सखोल चौकशी सुरु करण्यात आली आहे. समादेशक, राज्य राखीव पोलीस बल गट क्र. ५, दौंड यांची भरती प्रक्रिया पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्यात आली आहे. सदर चौकशी अहवाल प्राप्त होताच. पुढील योग्य कार्यवाही करण्यांत येईल. (SRPF recruitment)


त्यामुळे आता सर्वांचे लक्ष चौकशी अहवालाकडे लागले आहे. ही परीक्षा पूर्णपणे रद्द होऊन पुन्हा घेतली जाणार की केवळ संशयास्पद बाबींची दुरुस्ती केली जाणार, याबाबत उमेदवारांमध्ये संभ्रम कायम आहे. पुढील आदेश येईपर्यंत ही स्थगिती कायम राहणार आहे.

Comments
Add Comment

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या 143 व्या जयंतीनिमित्त 31 मे रोजी ‘त्रिवेणी’ या भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

मुंबई : शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला

DCM Eknath Shinde : मोदी खरे धुरंदर, त्यांच्यावर टीका करणारे दलिंदर, हर्षवर्धन सकपाळ यांच्या मोदीवरील टीकेला उपमुख्यमंत्री शिंदेंचे प्रत्युत्तर

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या बारा वर्षांत देशाचे यशस्वीपणे नेतृत्व करत भारताला विकास,

Petrol-diesel hoarders : पेट्रोल-डिझेल साठेबाजांविरोधात मुख्यमंत्री ॲक्शन मोडवर, पुरवठा आणि गृहविभागाकडून संयुक्त कारवाई होणार

मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या मागणीत सरासरीपेक्षा लक्षणीयरित्या मोठी वाढ झाली आहे.

Mantri Nitesh Rane : हर्षवर्धन सपकाळ यांनी लायकीनुसार बोलावे ! मंत्री नितेश राणे

मंत्री नितेश राणे यांचा हल्लाबोल; पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरील टीकेला

Cabinet meeting : मंत्रिमंडळ बैठकीत घेतले 'हे' महत्त्वपूर्ण निर्णय

राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली

गुगलवर अहिराणी बोलीला अधिकृत मान्यता; खान्देश वासियांमध्ये आनंद

खान्देशची ओळख असलेल्या अहिराणी बोलीला आता जागतिक स्तरावर नवी ओळख मिळाली असून, गुगलने अहिराणी भाषेला अधिकृत