Mumbai Fire Brigade : मुंबईत वाढत्या उन्हामुळे आग लागण्याच्या घटनांमध्ये वाढ, अग्निशमन दलाने केले दक्षतेचे आवाहन

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये वाढत्या तापमानामुळे घरांमध्ये, कार्यालयांमध्ये तसेच व्यापारी आस्थापनांमध्ये विद्युत यंत्रणांवर ताण येऊन शॉर्ट सर्किट, ओव्हरलोडिंग यांसारख्या कारणांमुळे आग लागण्याच्या घटनांमध्ये वाढ होण्याची शक्यता असते. त्यामुळे मुंबईकरांनी नियमांचे पालन करून खबरदारी घ्यावी, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मुंबई अग्निशमन दलाकडून करण्यात येत आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे, अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांनी मुंबई अग्निशमन दलास अग्निप्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी सतर्क आणि सुसज्ज राहण्याचे निर्देश दिले आहेत.


मुंबई महानगरात तापमान वाढत आहे. उन्हाळा प्रखरतेने जाणवत आहे. घरांमध्ये, कार्यालयांमध्ये तसेच व्यापारी संकुलांमध्ये पंखे, एअर कुलर, एअर कंडिशनर, फ्रिज व इतर विद्युत उपकरणांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे. त्यामुळे आग लागण्याच्या घटनांमध्ये वाढ होण्याची शक्यता असते. याशिवाय उष्ण व कोरडे वातावरण, ज्वलनशील पदार्थाची अयोग्य साठवणूक, कचरा जाळणे तसेच गॅस गळती यांसारख्या कारणांमुळेही आग लागण्याचा धोका वाढू शकतो. ही बाब लक्षात घेऊन मुंबई अग्निशमन दलाने नागरिकांना सतर्क राहून आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. नागरिकांनी घरातील व इमारतीतील विद्युत वायरिंग, स्विच बोर्ड आणि प्लग पॉइंट्स यांची नियमित तपासणी करुन त्यांच्या जोडणीबाबत खात्री करावी. तसेच एका प्लग पॉइंटमध्ये अनेक उपकरणे जोडून ओव्हरलोडिंगसारखे प्रकार टाळणे गरजेचे आहे.


एअर कंडिशनर, कुलर इत्यादी उपकरणे वापरताना सुरक्षित व दर्जेदार विद्युत जोडणीचा वापर करावा. घरात किंवा परिसरात कचरा, झाडांची, वेलींची कोरडी पाने किंवा इतर ज्वलनशील वस्तू जाळू नये. एलपीजी गॅस सिलिंडर व गॅस पाईपची संबंधित तज्ज्ञांकडून नियमित तपासणी करावी. प्रत्येक इमारतीतील, घरातील व निवासी / अनिवासी दालनातील अग्निशमन यंत्रणा सुस्थितीत आहेत का, याची खबरदारी घ्यावी, असे आवाहन मुंबई अग्निशमन दलाकडून करण्यात आले आहे.


इमारतींचे, व्यापारी संकुलांचे जिने तसेच आपत्कालीन बाहेर पडण्याचे मार्ग मोकळे ठेवावेत. जेणेकरून एखादी घटना घडल्यास नागरिकांना सुखरुपपणे बाहेर पडता येईल. यासोबतच आपली वाहने निश्चित केलेल्या जागेत उभी करावीत. दुर्दैवाने कुठे आग लागण्याची घटना घडल्यास अग्निशमन दलाच्या वाहनांच्या मुक्त व सुरळीत हालचालीसाठी आवश्यक तेवढी पुरेशी जागा मोकळी ठेवावी. कोणत्याही प्रकारची आग लागल्यास घाबरून न जाता तात्काळ मुंबई अग्निशमन दलाच्या १०१ किंवा ०२२-२३००१३९०, ०२२-२३००१३९३ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन प्रमुख अग्निमशन अधिकारी रवींद्र आंबुलगेकर यांनी केले आहे.

Comments
Add Comment

Goregaon-Mulund Link Road : गोरेगाव - मुलुंड जोड मार्ग प्रकल्प विहीत मुदतीत पूर्ण करावा

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : गोरेगाव - मुलुंड जोड मार्ग ( जी एम एल आर) प्रकल्प टप्पा ३ - ब अंतर्गत दादासाहेब फाळके

Bhandup : आशियातील सर्वात मोठा जलशुद्धीकरण प्रकल्प साकारतोय भांडुप संकुलात

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : भांडुप संकुलातील ७.४ हेक्‍टर जागेवरील नवीन जलशुद्धीकरण प्रकल्प आशियातील सर्वात मोठ्या

Bhandup Sewage Treatment Plant : भांडुपचा मल जल शुध्दीकरण प्रकल्प ऑक्टोबर २०२६मध्ये होणार कार्यान्वित

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : भांडुप येथील मल जल शुध्दीकरण प्रकल्पाचे काम आता पूर्ण होवून येत्या ऑक्टोबर २०२६ पर्यंत

Kanjurmarg Dumping Ground : कांजूरमार्ग डम्पिंग ग्राऊंडवर साडेतीन हजार झाडांची लागवड

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : घनकचरा व्यवस्थापन पायाभूत सुविधांचे हरित आणि शाश्वत परिसंस्थेमध्ये रूपांतर

Dr. Ashwini Joshi : डॉ. अश्विनी जोशींच्या बदलीला स्थगिती, नवा आदेश जारी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या (BMC) अतिरिक्त आयुक्त डॉ. अश्विनी जोशी (Dr. Ashwini Joshi) यांच्या बदलीच्या

BEST : कर्मचाऱ्यांच्या संपापूर्वीच मेस्मा लागू, रजा मंजुरीवरही निर्बंध

मुंबई : बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट (बेस्ट) उपक्रमातील १२ कामगार संघटनांच्या संयुक्त कृती