Thorium : थोरियम आधारित अणुऊर्जा तंत्रज्ञान महाराष्ट्रासाठी ठरणार गेम चेंजर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; नाणार प्रकल्पामुळे महाराष्ट्र १० वर्षे पुढे गेला असता


मुंबई : महाराष्ट्राच्या विकासाला गती देणारा नाणार प्रकल्प राजकारणाचा बळी ठरल्याची खंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी व्यक्त केली. आज जर हा प्रकल्प पूर्ण झाला असता, तर राज्याची अर्थव्यवस्था पूर्णतः बदलली असती आणि महाराष्ट्र इतर राज्यांच्या तुलनेत १० वर्षे पुढे गेला असता, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्याच वेळी, ऊर्जा सुरक्षेच्या क्षेत्रात भारतासह महाराष्ट्राला जागतिक पातळीवर अग्रेसर करण्यासाठी 'थोरियम'वर आधारित स्वदेशी 'एसएमआर' तंत्रज्ञान गेम चेंजर ठरणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.


एका खासगी वृत्तपत्राच्या विशेष कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी नाणार प्रकल्पाचे महत्त्व, अणुऊर्जा प्रकल्पातील एसएमआर तंत्रज्ञान आणि थोरियमच्या विपुल साठ्यांचा देशासह महाराष्ट्राला होणारा फायदा यावर सविस्तर भाष्य केले. मुख्यमंत्री म्हणाले की, आजच्या जागतिक 'जिओ-पॉलिटिकल' परिस्थितीत नाणार प्रकल्प देशासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरला असता. गुजरातमध्ये रिलायन्सच्या एका रिफायनरीने जसा संपूर्ण राज्याचा कायापालट केला, तशीच क्षमता नाणार प्रकल्पात होती. या प्रकल्पामुळे कृषी किंवा मासेमारीवर कोणताही विपरीत परिणाम झाला नसता; उलटपक्षी यामुळे देशाची ऊर्जा सुरक्षा अधिक बळकट झाली असती, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.


जैतापूर प्रकल्पाविषयी बोलताना मुख्यमंत्र्यांनी तंत्रज्ञानातील बदलांचा उल्लेख केला. आताच्या अद्ययावत एसएमआर तंत्रज्ञानाचा वापर करून प्रकल्पांचे काम सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. यातील एका प्रकल्पाचा करार केंद्र सरकारच्या प्राधिकरणासोबत, तर दुसऱ्या प्रकल्पाचा करार रशियाच्या रोसाटॉम कंपनीसोबत करण्यात आला आहे, अशी माहिती त्यांनी दिली.


जगात थोरियमचे सर्वात मोठे साठे भारताकडे : सर्वात मोठा आशेचा किरण म्हणजे भारत आता स्वतःचे स्वदेशी एसएमआर विकसित करत असून, ते थोरियमवर आधारित असणार आहे. याविषयी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, जगात थोरियमचे सर्वात मोठे साठे भारताकडे आहेत. त्यामुळे हे तंत्रज्ञान पूर्णपणे विकसित झाल्यास ऊर्जा सुरक्षेच्या क्षेत्रात भारताशी जगातली कोणतीही महासत्ता स्पर्धा करू शकणार नाही. तामिळनाडूमध्ये यावर आधीच काम सुरू झाले असून, हा उपक्रम जागतिक ऊर्जा क्षेत्रात एक गेम चेंजर ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
Comments
Add Comment

BMC : धारावी, काळा किल्ला बेस्ट बस आगाराची जागा धारावी विकास प्रकल्पासाठीसाठी हस्तांतरीत

महापालिका सभागृहात बहुमताने प्रस्ताव मंजूर मुंबई : धारावी (Dharavi) बस डेपोची जागा पीपीपी तत्त्वावर धारावी विकास

BMC News : तातडीच्या कामकाजाच्या प्रस्तावावरून सलग दुसऱ्यांदा महापौरांकडून चूक

सत्ताधारी पक्ष दुसऱ्यांदा आला अडचणीत घाटकोपरमधील रस्ता रेषेसंदर्भातील प्रस्ताव मंजूर करण्याची महापौरांना

Chembur Tree Collapse : चेंबूरच्या झाड दुर्घटनेच्या अहवाल सत्ताधाऱ्यांनाच अमान्य

अहवालाची फेर चौकशी करून अहवाल सादर करण्याचे महापौरांचे निर्देश सभागृहनेत्यांनी अहवालाची प्रतच सभागृहात फाडत

FDA : मुंबईच्या प्रसिद्ध पारशी डेअरी फार्मवर अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; परवाना निलंबित

मुंबई : राज्यभर सुरू असलेल्या 'सेफ फूड, सेफ महाराष्ट्र' (Safe Food, Safe Maharashtra) या विशेष मोहिमेअंतर्गत अन्न व औषध प्रशासनाने (FDA)

NEET-UG 2026 Result : नीट-यूजी परीक्षेचा निकाल जाहीर; परीक्षेत मुलींनी मारली बाजी

मुंबई : नॅशनल टेस्टिंग एजन्सी (National Testing Agency - NTA) ने नीट-यूजी (NEET-UG) २०२६ परीक्षेचा निकाल (Result) जाहीर केला आहे. उत्तरतालिका (Answer

MahaCare : महाकेअरच्या माध्यमातून राज्यात जागतिक दर्जाच्या कर्करोग उपचार सुविधा; नागपुरात हाय एनर्जी मेडिकल सायक्लोट्रॉन प्रकल्पाला मंजुरी

मुंबई : राज्यातील कर्करोग रुग्णांना जागतिक दर्जाचे उपचार आणि संशोधन सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र