Thorium : थोरियम आधारित अणुऊर्जा तंत्रज्ञान महाराष्ट्रासाठी ठरणार गेम चेंजर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; नाणार प्रकल्पामुळे महाराष्ट्र १० वर्षे पुढे गेला असता


मुंबई : महाराष्ट्राच्या विकासाला गती देणारा नाणार प्रकल्प राजकारणाचा बळी ठरल्याची खंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी व्यक्त केली. आज जर हा प्रकल्प पूर्ण झाला असता, तर राज्याची अर्थव्यवस्था पूर्णतः बदलली असती आणि महाराष्ट्र इतर राज्यांच्या तुलनेत १० वर्षे पुढे गेला असता, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्याच वेळी, ऊर्जा सुरक्षेच्या क्षेत्रात भारतासह महाराष्ट्राला जागतिक पातळीवर अग्रेसर करण्यासाठी 'थोरियम'वर आधारित स्वदेशी 'एसएमआर' तंत्रज्ञान गेम चेंजर ठरणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.


एका खासगी वृत्तपत्राच्या विशेष कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी नाणार प्रकल्पाचे महत्त्व, अणुऊर्जा प्रकल्पातील एसएमआर तंत्रज्ञान आणि थोरियमच्या विपुल साठ्यांचा देशासह महाराष्ट्राला होणारा फायदा यावर सविस्तर भाष्य केले. मुख्यमंत्री म्हणाले की, आजच्या जागतिक 'जिओ-पॉलिटिकल' परिस्थितीत नाणार प्रकल्प देशासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरला असता. गुजरातमध्ये रिलायन्सच्या एका रिफायनरीने जसा संपूर्ण राज्याचा कायापालट केला, तशीच क्षमता नाणार प्रकल्पात होती. या प्रकल्पामुळे कृषी किंवा मासेमारीवर कोणताही विपरीत परिणाम झाला नसता; उलटपक्षी यामुळे देशाची ऊर्जा सुरक्षा अधिक बळकट झाली असती, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.


जैतापूर प्रकल्पाविषयी बोलताना मुख्यमंत्र्यांनी तंत्रज्ञानातील बदलांचा उल्लेख केला. आताच्या अद्ययावत एसएमआर तंत्रज्ञानाचा वापर करून प्रकल्पांचे काम सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. यातील एका प्रकल्पाचा करार केंद्र सरकारच्या प्राधिकरणासोबत, तर दुसऱ्या प्रकल्पाचा करार रशियाच्या रोसाटॉम कंपनीसोबत करण्यात आला आहे, अशी माहिती त्यांनी दिली.


जगात थोरियमचे सर्वात मोठे साठे भारताकडे : सर्वात मोठा आशेचा किरण म्हणजे भारत आता स्वतःचे स्वदेशी एसएमआर विकसित करत असून, ते थोरियमवर आधारित असणार आहे. याविषयी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, जगात थोरियमचे सर्वात मोठे साठे भारताकडे आहेत. त्यामुळे हे तंत्रज्ञान पूर्णपणे विकसित झाल्यास ऊर्जा सुरक्षेच्या क्षेत्रात भारताशी जगातली कोणतीही महासत्ता स्पर्धा करू शकणार नाही. तामिळनाडूमध्ये यावर आधीच काम सुरू झाले असून, हा उपक्रम जागतिक ऊर्जा क्षेत्रात एक गेम चेंजर ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
Comments
Add Comment

Gold medal-winning athlete : सुवर्णपदक विजेता खेळाडू राज ठाकरेंवर भडकला; अडीच तास ताटकळत ठेवूनही भेट न झाल्याने नाराजी

मुंबई : क्रीडा क्षेत्रात देशाचे आणि राज्याचे नाव उज्ज्वल करणाऱ्या खेळाडूंना अनेकदा प्रशासकीय आणि राजकीय

Shrinivas Vinayak Kulkarni : मराठी साहित्यातील तेजस्वी पर्व संपले; मौज नियतकालिकाचे संपादक आणि 'डोह'कार श्री. वि. कुलकर्णी यांना मुख्यमंत्र्यांनी वाहिली श्रद्धांजली

मुंबई : ज्येष्ठ साहित्यिक, 'डोह'कार म्हणून ओळखले जाणारे श्रीनिवास विनायक कुलकर्णी म्हणजेच श्री. वि. कुलकर्णी (Shrinivas

Mangal Prabhat Lodha : म्हाडासाठी राखीव घरे न देणाऱ्या विकासकांवर कडक कारवाई करा; गरज पडल्यास कारागृहात पाठवा - मंत्री मंगल प्रभात लोढा

नागरिक आणि म्हाडा मधील संवाद अधिक प्रभावी करण्यासाठी सल्लागार समिती स्थापन करण्याच्या मंत्री लोढा यांच्या

Samagra Shiksha Abhiyan : २२ वर्षांचा संघर्ष अखेर संपला! समग्र शिक्षा अभियानातील ३,२७६ कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवाशाश्वती; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय

मुंबई : तब्बल २२ वर्षांपासून समग्र शिक्षा अभियानांतर्गत (Samagra Shiksha Abhiyan) कंत्राटी तत्त्वावर कार्यरत असलेल्या ३,२७६

Footpath Encroachment : पदपथ अतिक्रमण मुक्तीच्या निर्देशानंतर, याच्या अंमलबजावणीसाठी आयुक्त थेट उतरल्या रस्त्यावर

मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबईतील (Mumbai) पदपथांवरील अनधिकृत फेरीवाले व अतिक्रमणे तत्काळ हटवून पदपथ अडथळामुक्त

Oshiwara Maternity Hospital : ओशिवरा प्रसूतीगृहाचे महापौरांच्या हस्ते लोकार्पण

जोगेश्वरी परिसरातील गर्भवती माता व नवजात बालकांना दर्जेदार आरोग्य सेवांची मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई