Thorium : थोरियम आधारित अणुऊर्जा तंत्रज्ञान महाराष्ट्रासाठी ठरणार गेम चेंजर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; नाणार प्रकल्पामुळे महाराष्ट्र १० वर्षे पुढे गेला असता


मुंबई : महाराष्ट्राच्या विकासाला गती देणारा नाणार प्रकल्प राजकारणाचा बळी ठरल्याची खंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी व्यक्त केली. आज जर हा प्रकल्प पूर्ण झाला असता, तर राज्याची अर्थव्यवस्था पूर्णतः बदलली असती आणि महाराष्ट्र इतर राज्यांच्या तुलनेत १० वर्षे पुढे गेला असता, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्याच वेळी, ऊर्जा सुरक्षेच्या क्षेत्रात भारतासह महाराष्ट्राला जागतिक पातळीवर अग्रेसर करण्यासाठी 'थोरियम'वर आधारित स्वदेशी 'एसएमआर' तंत्रज्ञान गेम चेंजर ठरणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.


एका खासगी वृत्तपत्राच्या विशेष कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी नाणार प्रकल्पाचे महत्त्व, अणुऊर्जा प्रकल्पातील एसएमआर तंत्रज्ञान आणि थोरियमच्या विपुल साठ्यांचा देशासह महाराष्ट्राला होणारा फायदा यावर सविस्तर भाष्य केले. मुख्यमंत्री म्हणाले की, आजच्या जागतिक 'जिओ-पॉलिटिकल' परिस्थितीत नाणार प्रकल्प देशासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरला असता. गुजरातमध्ये रिलायन्सच्या एका रिफायनरीने जसा संपूर्ण राज्याचा कायापालट केला, तशीच क्षमता नाणार प्रकल्पात होती. या प्रकल्पामुळे कृषी किंवा मासेमारीवर कोणताही विपरीत परिणाम झाला नसता; उलटपक्षी यामुळे देशाची ऊर्जा सुरक्षा अधिक बळकट झाली असती, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.


जैतापूर प्रकल्पाविषयी बोलताना मुख्यमंत्र्यांनी तंत्रज्ञानातील बदलांचा उल्लेख केला. आताच्या अद्ययावत एसएमआर तंत्रज्ञानाचा वापर करून प्रकल्पांचे काम सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. यातील एका प्रकल्पाचा करार केंद्र सरकारच्या प्राधिकरणासोबत, तर दुसऱ्या प्रकल्पाचा करार रशियाच्या रोसाटॉम कंपनीसोबत करण्यात आला आहे, अशी माहिती त्यांनी दिली.


जगात थोरियमचे सर्वात मोठे साठे भारताकडे : सर्वात मोठा आशेचा किरण म्हणजे भारत आता स्वतःचे स्वदेशी एसएमआर विकसित करत असून, ते थोरियमवर आधारित असणार आहे. याविषयी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, जगात थोरियमचे सर्वात मोठे साठे भारताकडे आहेत. त्यामुळे हे तंत्रज्ञान पूर्णपणे विकसित झाल्यास ऊर्जा सुरक्षेच्या क्षेत्रात भारताशी जगातली कोणतीही महासत्ता स्पर्धा करू शकणार नाही. तामिळनाडूमध्ये यावर आधीच काम सुरू झाले असून, हा उपक्रम जागतिक ऊर्जा क्षेत्रात एक गेम चेंजर ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
Comments
Add Comment

IIT Mumbai : आयआयटी मुंबईच्या परिसरात इमारत बाधकामांमध्ये बाधित २३७ झाडे कापली, तर ४०० झाडे केली पुनर्रोपित

- ड्रोन सेंटर सर्व्हिस ब्लॉकच्या बांधकामांमध्ये आणखी ५४ झाडे बाधित मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईतील पवई येथील

BMC News : महापालिकेच्या रुग्णालयांमधील स्वच्छता खासगी कंपनीमार्फत!

- स्थायी समितीच्या मंजुरीपूर्वीच कामाला केली सुरुवात मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महापालिकेच्या केईएम, शीव,

Mumbai Birth Certificate Scam : मुंबईतील बोगस जन्म मृत्यू प्रमाणपत्र प्रकरणी SIT तपास करणार

मुंबई : मुंबईतील बोगस जन्म मृत्यू प्रमाणपत्र प्रकरणी एसआयटी तपास करणार आहे. यासाठी मुंबई पोलिसांच्या गुन्हे

New Syllabus : शैक्षणिक वर्ष २०२६ - २७ पासून दुसरी, तिसरी, चौथी आणि सहावीसाठी नवा अभ्यासक्रम

मुंबई : इयत्ता दुसरी, तिसरी आणि चौथीच्या नवीन अभ्यासक्रम आराखड्याला मंजुरी दिल्यानंतर राज्य शिक्षण मंडळाच्या

Central Railway : मध्य रेल्वे कर्मचाऱ्यांच्या जलद कारवाईमुळे कल्याण स्टेशनवर जीव वाचला

 मुंबई :  मध्य रेल्वेच्या सतर्क स्टेशन कर्मचाऱ्यांनी आज कल्याण स्टेशनवर एका संभाव्य दुर्घटनेला यशस्वीरित्या

Divya Dakshin Yatra : IRCTC सोबत भारताच्या आध्यात्मिक वारशाचा अनुभव; भारत गौरव पर्यटन ट्रेन 26 मे 2026 रोजी नागपूरहून प्रस्थान करणार

मुंबई : Indian Railway Catering and Tourism Corporation (IRCTC) तर्फे 11 रात्री / 12 दिवसांची विशेष “दिव्य दक्षिण यात्रा” भारत गौरव पर्यटन ट्रेनद्वारे