PM Narendra Modi : युएईच्या तेलक्षेत्रावरील इराणच्या हल्ल्याचा पंतप्रधान मोदींकडून तीव्र शब्दांत निषेध

इराणकडून संयुक्त अरब अमिराती (यूएई)च्या फुजैराह तेल औद्योगिक क्षेत्रावर झालेल्या हल्ल्यात तीन भारतीय नागरिक जखमी झाले आहेत. या हल्ल्यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि परराष्ट्र मंत्रालय (एमईए) यांनी तीव्र निषेध केला आहे. त्यांनी या हल्ल्यांना अस्वीकार्य ठरवले आहे. हा हल्ला अशा वेळी झाला आहे, जेव्हा अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव आधीपासूनच वाढलेला आहे.



काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी?


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्सवर पोस्ट करत म्हटले की, “संयुक्त अरब अमिरातीवर झालेल्या हल्ल्यांचा आम्ही तीव्र निषेध करतो, ज्यामध्ये तीन भारतीय नागरिक जखमी झाले आहेत. नागरिक आणि पायाभूत सुविधांना लक्ष्य करणे अस्वीकार्य आहे. भारत संयुक्त अरब अमिरातीसोबत पूर्णपणे एकजुटीने उभा आहे आणि संवाद व कूटनीतीच्या माध्यमातून सर्व प्रश्नांचे शांततापूर्ण समाधान करण्यासाठी आपला पाठिंबा पुन्हा व्यक्त करतो.”


amp/"> amp/" class="section-post-content-internal-post-title">Iran - America War : इराणचा होर्मुझमध्ये अमेरिकेच्या युद्धनौकेवर हल्ला केल्याचा दावा

होर्मुज सामुद्रधुनीत अमेरिका आणि इराण यांच्यातील लष्करी तणाव पुन्हा एकदा तीव्र झाला आहे. इराणने दावा केला आहे की, सोमवारी त्यांनी एका अमेरिकन ...


पंतप्रधानांनी पुढे सांगितले की, होर्मुज सामुद्रधुनीतून सुरक्षित आणि अखंड वाहतूक सुनिश्चित करणे हे प्रादेशिक शांतता, स्थैर्य आणि जागतिक ऊर्जा सुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.





परराष्ट्र मंत्रालयानेही या घटनेचा निषेध करत म्हटले आहे की, अशा प्रकारचे हल्ले आणि नागरिकांना होणारी हानी अस्वीकार्य आहे. मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सांगितले की, “अशा प्रकारचे हल्ले त्वरित थांबवले पाहिजेत.” भारत पश्चिम आशियात शांतता आणि स्थैर्य प्रस्थापित होण्यासाठी संवाद आणि कूटनीतीला पाठिंबा देत आहे.भारताने आंतरराष्ट्रीय कायद्याच्या चौकटीत होर्मुज सामुद्रधुनीतून व्यापार आणि वाहतूक कोणत्याही अडथळ्याशिवाय सुरू राहावी, अशीही अपील केली आहे. तसेच सर्व पक्षांनी शांतता राखावी आणि तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करावेत, असेही भारताने म्हटले आहे.


amp/">
amp/" class="section-post-content-internal-post-title">Iran - America War : इराणचा होर्मुझमध्ये अमेरिकेच्या युद्धनौकेवर हल्ला केल्याचा दावा

होर्मुज सामुद्रधुनीत अमेरिका आणि इराण यांच्यातील लष्करी तणाव पुन्हा एकदा तीव्र झाला आहे. इराणने दावा केला आहे की, सोमवारी त्यांनी एका अमेरिकन ...


दरम्यान, यूएईच्या संरक्षण मंत्रालयाने सांगितले की, त्यांच्या हवाई संरक्षण प्रणालीने अनेक क्षेपणास्त्रे आणि ड्रोन रोखले. मात्र फुजैराह येथे झालेल्या एका ड्रोन हल्ल्यामुळे तेल सुविधेत आग लागली. या घटनेत तेथे काम करणारे तीन भारतीय जखमी झाले.दरम्यान, ब्रिटिश सैन्याने समुद्रात दोन जहाजांना आग लागल्याची माहिती दिली आहे. इराणने या हल्ल्याची थेट जबाबदारी स्वीकारलेली नाही. मात्र, त्यांचे परराष्ट्र मंत्री सैयद अब्बास अराघची यांनी अमेरिका आणि यूएईने परिस्थिती अधिक बिघडू नये, याची काळजी घ्यावी असे म्हटले आहे.


Strait of Hormuz : होर्मुज सामुद्रधुनीत सलग हल्ले; जागतिक सुरक्षेवर मोठा प्रश्नचिन्ह, तेलपुरवठ्यावर होणार परिणाम ?

पश्चिम आशियातील अत्यंत संवेदनशील मानल्या जाणाऱ्या होर्मुज सामुद्रधुनीत (Strait of Hormuz) पुन्हा एकदा सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. काही ...


इराणच्या एका लष्करी अधिकाऱ्यानेही सांगितले की, यूएई किंवा कोणत्याही तेल सुविधेवर हल्ला करण्याची त्यांची कोणतीही योजना नव्हती. त्यांनी आरोप केला की, अमेरिकेच्या लष्करी धोरणांमुळेच हा तणाव वाढत आहे.

Tags
Narendra ModiiranUAEIran's attack on UAE oil fieldsstrongly condemns

Comments
Add Comment

Bharat Electronics Limited : संरक्षण मंत्रालयाचा भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड सोबत 1476 कोटींचा करार

नवी दिल्ली : संरक्षण मंत्रालयाने भारतीय लष्करासाठी किमान पाच ग्राउंड-बेस्ड मोबाईल इलेक्ट्रॉनिक सिस्टीमच्या

Narendra Modi : युएईच्या तेलक्षेत्रावरील इराणच्या हल्ल्याचा पंतप्रधान मोदींकडून तीव्र शब्दांत निषेध

नवी दिल्ली : इराणकडून संयुक्त अरब अमिराती (यूएई)च्या फुजैराह तेल औद्योगिक क्षेत्रावर झालेल्या हल्ल्यात तीन

'आयुष्मान भारत' ८ वर्षानंतर राष्ट्रीय होणार, लवकरच 'या' राज्यांमध्ये 'आयुष्मान भारत' लागू होणार

पश्चिम बंगालमधील ऐतिहासिक विजयानंतर, भारतीय जनता पक्ष केवळ राज्यात नेतृत्व निवडीच्या प्रक्रियेतच गुंतलेला

मोठी बातमी ! कोलकाता DCP विरोधात ED ची 'लुकआउट' नोटीस

West Bengal : कोलकाता पोलीस दलाचे उपायुक्त (DCP) शांतनु सिन्हा बिस्वास सध्या मनी लाँड्रिंग प्रकरणातील अंमलबजावणी

Viral : मोठ्या भावाची ती मिठी; आणि वाचले धाकट्याचे प्राण

केरळम : कधी सक्खे भाऊ पक्के वैरी असतात तर कधी एकमेकांचा जीव वाचवायला कोणत्याही स्तराला जाऊ शकतात, कोणताही धोका

Ratna Debnath : आर. जी. कार रुग्णालयातील पीडितेच्या आईचा निवडणुकीत विजय

कोलकाता : पश्चिम बंगाल हादरवून टाकणारी घटना काही महिन्यांपूर्वी कोलकाता येथील प्रसिद्ध आर. जी. कार रुग्णालयात