नाशिक रिंगरोड प्रकरण : शेतकऱ्यांना झालेल्या मारहाण प्रकरणाची दखल, चौकशी होणार; गिरीश महाजनांनी दिले आश्वासन

नाशिक : नाशिकमधील रिंगरोड प्रकरण गेल्या काही दिवसांपासून तापले आहे. नाशिक कुंभमेळा पार्श्वभूमीवर रिंग रोडसाठी गेल्या अनेक दिवसापासून भूसंपादन प्रक्रिया सुरु आहे. भूसंपादन अखेरच्या टप्प्यात आले असताना शनिवार (दि.२) मातोरी व मुंगसरा येथे जमीनीची मोजणी करण्यासाठी गेलेल्या भूसंपादन अधिकारी व पोलिसांनी शेतकऱ्यांना मारहाण केल्याचा गंभीर आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. याप्रकरणी आता मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.


शेतकऱ्यांवर दडपशाही करू नये असे शासनाचे स्पष्ट निर्देश आहेत. त्यामुळे नाशिक रिंगरोडच्या मोजणीवेळी काही अनुचित प्रकार घडला असेल तर त्याची चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई केली जाईल. शेतकऱ्यांनी केलेल्या तक्रारीची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिली जाईल, असे आश्वासन कुंभमेळामंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी दिले.


नाशिक रिंगरोडच्या मोजणीवेळी प्रशासकीय अधिकारी आणि पोलिसांनी शेतकऱ्यांना घरात शिरून मारहाण केली, एका प्रशासकीय अधिकाऱ्याने महिलांशी गैरकृत्य केल्याचे आरोप होत आहेत. संबंधित अधिकाऱ्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करून कारवाई करावी, या मागणीसाठी दरी, मातोरी, मुंगसरे, गोवर्धन परिसरातील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. मातोरी, मुंगसरे गावातील गावठाण भागातून मार्ग गेल्यास शेतकऱ्यांचे नुकसान कमी होईल. त्या अनुषंगाने बदलाबाबत विचार करावा, अशी मागणी केली जात आहे. सक्तीच्या भूसंपादनाविरोधात शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला. कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांनी आंदोलक, बाधित शेतकऱ्यांशी जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात चर्चा केली.


रिंगरोडमुळे बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांना शासन निर्णयाप्रमाणे नुकसान भरपाई देण्यात येईल. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद हे लवकरच दरी, मातोरी, मुंगसरे, गोवर्धन या गावांना भेट देतील. यावेळी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे अधिकारी उपस्थित राहतील. ते शेतकऱ्यांशी संवाद साधून मार्ग काढतील. या गावांमध्ये मोजणीवेळी अनुचित प्रकार घडला असेल, तर त्याची चौकशी करून कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन मंत्री महाजन यांनी दिले.


महिला शेतकऱ्यांच्या तक्रारी असतील, तर त्यांनी अपर जिल्हाधिकारी हेमांगी पाटील यांच्याकडे नोंदवाव्यात, असे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले. उच्च न्यायालयात प्रकरण असले तरी कार्यवाहीस स्थगिती नसल्याने दोन्ही गावातील मोजणी करण्यात आली. १९ क्रमांकाची नोटीस बजावल्यानंतर शेतकरी हरकती घेऊ शकतात, असे त्यांनी नमूद केले.

Comments
Add Comment

Mirabai Chanu : मीराबाई चानूची सोनेरी हॅटट्रिक!

ग्लासगो : भारताची स्टार वेटलिफ्टर आणि ऑलिम्पिक पदकविजेती मीराबाई चानू हिने ग्लासगो २०२६ राष्ट्रकुल क्रीडा

Ind vs Zim : श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात भारताने जिंकली पहिली टी-२० मालिका; झिम्बाब्वेचा ३-० ने व्हाईटवॉश !

भारताचा ३५ धावांनी दणदणीत विजय ! हरारे : भारत आणि झिम्बाब्वे यांच्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतील तिसऱ्या

Byculla Police Station Fire: भायखळा पोलीस ठाण्याच्या पहिल्या मजल्यावर आग; अग्निशमन दलाकडून तातडीने नियंत्रण

मुंबई: मुंबईतील भायखळा पोलीस ठाण्यात रविवारी रात्री आग (Fire) लागल्याची घटना घडली. ही आग पोलीस ठाण्याच्या पहिल्या

Question Paper Leak : प्रश्नपत्रिका फुटीविरोधी नवीन विधेयक लोकसभेत सादर होणार

नवी दिल्ली: प्रश्नपत्रिका फुटीप्रकरणावरून संसदेत निर्माण झालेला गतिरोध आता संपण्याची चिन्हे असून, आंदोलक

Dam Water Level : राज्यात ५६ टक्के उपयुक्त पाणीसाठा, मराठवाड्यात मात्र चिंता कायम

पुणे : जुलै महिन्यात झालेल्या समाधानकारक पावसामुळे राज्यातील धरणांमधील उपयुक्त पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली

Narendra Modi : परीक्षा पद्धतीत सुधारणेसाठी आणि पेपरफुटीला आळा घालण्यासाठी नंदन निलेकणींच्या नेतृत्वात उच्चाधिकार समितीची स्थापना, PM मोदींचा निर्णय

नवी दिल्ली : परीक्षा पद्धतीत सुधारणा करण्यासाठी आणि पेपरफुटीला आळा घालण्यासाठी नंदन निलेकणींच्या नेतृत्वात