Eknath Shinde : आरोपीला फासावर लटकवलं पाहिजे”; न्यायालयात फाशीची मागणी करणार

SIT नेमणूक; दोन आठवड्यांत आरोपपत्र दाखल करण्याचे निर्देश, तपासावर उच्चस्तरीय देखरेख, पॅरोलवर सुटकेला सरकारचा विरोध


नसरापूर प्रकरणात पीडितेच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देण्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आश्वासन


मुंबई : पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे ३–४ वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिचा निर्घृणपणे खून करणाऱ्या नराधमाला न्यायालयाने मानवतावादी दृष्टिकोनातून फाशीची शिक्षा सुनावेल, असा ठाम विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. ते पत्रकारांशी संवाद साधताना बोलत होते.



पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे ३–४ वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केल्याच्या घटनेने संपूर्ण राज्य हादरले आहे. या प्रकरणी आरोपी भीमराव कांबळे याला पोलिसांनी अटक केली असून, तो सराईत गुन्हेगार असल्याचे समोर आले आहे. यापूर्वीही त्याच्यावर लैंगिक अत्याचाराचे गुन्हे दाखल असूनही तो मोकाट फिरत होता, यामुळे कायदा-सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
या घटनेची गंभीर दखल घेत राज्य सरकारने तात्काळ एसआयटीची नेमणूक केली आहे. या प्रकरणाचा तपास उच्च पातळीवरून सुरू असून, स्वतः एसपी आणि डीजी स्तरावरील अधिकारी केस मॉनिटर करत आहेत. मुख्यमंत्रीही या प्रकरणावर सातत्याने लक्ष ठेवून असल्याची माहिती शिंदे यांनी दिली.


या प्रकरणात कोणतीही दिरंगाई होऊ दिली जाणार नसून प्रत्येक पुरावा गोळा करून फुलप्रूफ केस उभी केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. दोन आठवड्यांच्या आत आरोपपत्र दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले असून आरोपीला कोणत्याही परिस्थितीत फाशीची शिक्षा मिळावी, यासाठी सरकार पूर्ण ताकदीने प्रयत्न करत आहे. न्यायालयालाही या प्रकरणात गांभीर्याने विचार करून कठोरात कठोर शिक्षा देण्याची विनंती केली जाणार असल्याचे त्यांनी नमूद केले.



दरम्यान, वारंवार बलात्कार आणि अत्याचार करणाऱ्या आरोपींना पॅरोलवर सोडण्याबाबतही सरकारने कठोर भूमिका घेतली आहे. अशा गुन्हेगारांना पॅरोलवर सुटका मिळू नये, यासाठी उच्च न्यायालयात विनंती करण्यात येणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले. कारण अशा आरोपींना सवलत मिळाल्यानंतर ते पुन्हा अशाच प्रकारचे गंभीर गुन्हे करत असल्याचे अनेक घटनांमधून स्पष्ट झाले आहे.
या घटनेनंतर राज्यभर संतापाची लाट उसळली असून नागरिकांकडून आरोपीला तात्काळ फाशीची शिक्षा देण्याची जोरदार मागणी होत आहे.


Comments
Add Comment

Shahapur Rain : शहापूरात पावसाचा कहर! हनुमान धबधब्यावर भीषण दुर्घटना; ५ पर्यटक वाहून गेले

शहापूर : ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात (Shahapur Rain) झालेल्या ढगफुटीसदृश मुसळधार पावसामुळे हनुमान धबधब्यावर मोठी

Maharashtra Monsoon Weather : पावसाचा पुन्हा जोर! पुढील २४ तास अतिमहत्त्वाचे; महाराष्ट्रातील २२ जिल्ह्यांना हवामान खात्याचा इशारा

मुंबई : जुलैच्या अखेरच्या आठवड्यात महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाने जोरदार पुनरागमन केले आहे. उत्तर-पश्चिम

Dam Water Level : राज्यात ५६ टक्के उपयुक्त पाणीसाठा, मराठवाड्यात मात्र चिंता कायम

पुणे : जुलै महिन्यात झालेल्या समाधानकारक पावसामुळे राज्यातील धरणांमधील उपयुक्त पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली

Dog Attack : रेबीजमुळे चिमुकल्या समर्थ स्वामीचा दुर्दैवी मृत्यू; भटक्या कुत्र्यांवर कारवाईची मागणी

सोलापूर : भवानी पेठ परिसरातील घोंगडे वस्ती येथे कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या समर्थ स्वामी या

Amravati News : धक्कादायक! आश्रमशाळेतील ४० विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा; जेवणानंतर उलट्या, पोटदुखीने उडाली खळबळ

अमरावती : अमरावतीच्या मेळघाट परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. धारणी तालुक्यातील टीटंबा येथील शासकीय

Mumbai-Pune Water Update : मुंबई-पुणेकरांची पाण्याची चिंता मिटली! धरणांत मुबलक जलसाठा; पाहा कोणत्या तलावात किती टक्के पाणी ?

मुंबई : यंदाच्या मान्सूनने सुरुवातीला हुलकावणी दिली असली, तरी जुलै महिन्यात मुंबई (Mumbai) आणि पुण्याच्या पाणलोट