मोठी बातमी ! कोलकाता DCP विरोधात ED ची 'लुकआउट' नोटीस

West Bengal : कोलकाता पोलीस दलाचे उपायुक्त (DCP) शांतनु सिन्हा बिस्वास सध्या मनी लाँड्रिंग प्रकरणातील अंमलबजावणी संचालनालयाच्या (ED) कारवाईमुळे चर्चेत आहेत. ईडीने शांतनु सिन्हा यांच्याविरोधात 'लुकआउट' नोटीस जारी केली आहे. ते देश सोडून पळून जाण्याची शक्यता असल्याने ही खबरदारी घेण्यात आली आहे. दक्षिण कोलकात्याच्या (West Bengal) बालीगंज भागातील गाजलेल्या 'सोना पप्पू सिंडिकेट' (Sona Pappu Case) प्रकरणातील मनी लाँड्रिंगच्या तपासासाठी ही कारवाई करण्यात आली आहे.


यामुळे पश्चिम बंगालमधील सत्ता परिवर्तनाच्या धामधुमीत आता प्रशासकीय वर्तुळातही मोठी खळबळ उडाली आहे. अंमलबजावणी संचालनालयाने कोलकाता पोलीस दलाचे उपायुक्त शांतनु सिन्हा बिस्वास यांच्याविरोधात 'लुकआउट' नोटीस जारी केली आहे. शांतनु सिन्हा बिस्वास हे यापूर्वी कालीघाट पोलीस ठाण्याचे प्रभारी म्हणून कार्यरत होते. हा परिसर भवानीपूर विधानसभा मतदारसंघात येतो, जिथून ममता बॅनर्जी प्रतिनिधित्व करत होत्या.(ED's 'lookout' notice against Kolkata DCP)


विशेष म्हणजे, ४ मे रोजी लागलेल्या निकालात भाजपच्या सुवेंदू अधिकारी यांनी ममता बॅनर्जी यांचा याच भवानीपूर मतदारसंघातून पराभव केला आहे. सत्तेच्या बदलासोबतच आता या हाय-प्रोफाईल पोलीस अधिकाऱ्यांभोवती तपास यंत्रणांचा फास आवळला गेल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.वारंवार चौकशीला उपस्थित न राहिल्याने किंवा देश सोडून जाण्याची शक्यता लक्षात घेऊन त्यांच्याविरोधात आता 'लूकआउट' नोटीस जारी करण्यात आली आहे. यामुळे त्यांना आता देशाबाहेर प्रवास करता येणार नाही आणि विमानतळावर दिसताच त्यांना ताब्यात घेतले जाऊ शकते. (ED's 'lookout' notice against Kolkata DCP)


'सोना पप्पू सिंडिकेट' प्रकरण काय आहे?


दक्षिण कोलकातामधील बालीगंज येथील रहिवासी असलेल्या सोना पप्पू यांच्यावर जमीन बळकावणे आणि खंडणीसह अनेक आरोप आहेत. त्यांच्यावर शस्त्र कायद्यांतर्गत गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. अशा अनेक आरोपांनंतर ईडीने तपास सुरू केला. तपास यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनी त्या प्रकरणात व्यावसायिक जॉय कामदार यांना आधीच अटक केली आहे.या प्रकरणातून मिळालेल्या माहितीच्या आधारे, ईडीने या महिन्यात फर्न रोडवरील शंतनू बिस्वास यांच्या घरावर छापा टाकला. शोधमोहीम सुरू झाल्यापासून ते सार्वजनिक ठिकाणी दिसलेले नाहीत. शोधमोहिमेच्या दुसऱ्या दिवशी, ईडीने सोना पप्पू प्रकरणाच्या संदर्भात शंतनू बिस्वास आणि त्यांचे दोन मुलगे, सायंतन आणि मनीष यांना सीजीओ कॉम्प्लेक्समध्ये बोलावले. मात्र, त्या दिवशी त्या दोघांपैकी कोणीही ईडी कार्यालयात गेले नाही.

Comments
Add Comment

PM Narendra Modi : 'युवकांना स्वावलंबी बनवणे हे सरकारचे ध्येय'

नवी दिल्ली: 'विकसित वायब्रंट व्हिलेज कार्यक्रम २०२६' च्या सहभागींसोबत रविवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे

Amit Shah : युवा पिढी आणि विद्यार्थी आमच्यासाठी महत्वाचे : अमित शाह

धर्मेंद्र प्रधान यांनी केलेल्या कामाचंही कौतुक नवी दिल्ली : भाजप कार्यकर्त्यांसाठी पदापेक्षा देश खूप जास्त

Karnataka Politics : '२०२८ ची कर्नाटक विधानसभा निवडणूक लढवणार नाही': माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या

बंगळुरु : कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी निवडणूक राजकारणातून निवृत्तीची घोषणा केली आहे.

Assam Factory Blast : आसाममधील रॉड मॅन्युफॅक्चरिंग कारखान्यात भीषण स्फोट; ४ कामगारांचा मृत्यू

दिसपुर : आसाममधील कछार जिल्ह्यात रविवारी सकाळी रॉड उत्पादन करणाऱ्या एका कारखान्यात भीषण स्फोट होऊन किमान चार

Viral Love Story : NEET आंदोलनात गेले अन् जुळली रेशीमगाठ; जंतर-मंतरवर घडली अनोखी प्रेमकहाणी

Viral Love Story : दिल्लीतील जंतर-मंतरवर झालेले नीट परीक्षा गैरप्रकाराविरोधातील आंदोलन देशभर चर्चेत

Kargil Vijay Diwas : कारगिलपासून ऑपरेशन सिंदूरपर्यंत! भारतीय लष्कराच्या 'या' १० मोहिमांनी जगाला दाखवली ताकद

ऑपरेशन विजय (1999) (Operation Vijay) कारगिल युद्धात पाकिस्तानी घुसखोरांना हुसकावून लावत भारताने २६ जुलै १९९९ रोजी विजय