Tourists on Raigad's Beaches : रायगडच्या समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांची विक्रमी गर्दी; समुद्रकिनारे पर्यटकांनी बहरले

रायगड : महाराष्ट्र दिनाची सुट्टी, त्याला जोडून आलेला शनिवार-रविवार आणि शाळांच्या परीक्षा संपल्यानंतर लागलेल्या सुट्ट्यांचा दुहेरी योग साधत रायगड जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांची अभूतपूर्व गर्दी उसळली आहे. गेल्या तीन दिवसांत जिल्ह्यात दोन लाखांहून अधिक पर्यटक दाखल झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.


अलिबाग, किहीम, आवास, सासवणे, वरसोली, नागाव, चौल, रेवदंडा, काशिद, मुरुड, श्रीवर्धन, दिवेआगर आणि हरिहरेश्वर या समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे तसेच राज्यातील विविध भागांतून हजारो पर्यटक रायगडकडे वळल्याने सर्वत्र पर्यटनाचा उत्साह पाहायला मिळत आहे.



उन्हाचा कडाका वाढला असला तरी समुद्राच्या थंडगार पाण्यात डुंबत पर्यटकांनी उकाड्यावर मात करण्याचा आनंद घेतला. लहान मुलांपासून तरुणांपर्यंत सर्वांनी समुद्रस्नानाचा मनमुराद आनंद लुटला. याशिवाय एटीव्ही राईड्स, बोटिंग, सागरी सफर, घोडेस्वारी आणि उंट सफारी यांसारख्या विविध पर्यटन उपक्रमांनाही मोठी मागणी असल्याचे दिसून आले.


पर्यटकांच्या संख्येबाबत बोलायचे झाल्यास, अलिबाग तालुक्यात सुमारे ५० हजार, मुरुडमध्ये १५ ते २० हजार, तर श्रीवर्धन तालुक्यात ३० ते ३५ हजार पर्यटक दाखल झाल्याचा अंदाज आहे. थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या माथेरानमध्येही १५ ते २० हजार पर्यटकांनी गर्दी केली. ऐतिहासिक रायगड किल्ल्यावरही पर्यटकांची संख्या लक्षणीय वाढल्याचे दिसून आले.मुंबईहून जलमार्गाने अलिबागकडे येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येतही मोठी वाढ झाली आहे. गेटवे ऑफ इंडिया ते मांडवा दरम्यान दर शनिवार-रविवारी सुमारे १० हजार प्रवाशांची ये-जा होत असते. मात्र गेल्या दोन दिवसांत ही संख्या जवळपास दुपटीने वाढल्याची माहिती मेरीटाईम बोर्डाच्या सूत्रांनी दिली.


पर्यटकांच्या वाढत्या गर्दीमुळे जिल्ह्यातील हॉटेल्स, रिसॉर्ट्स आणि लॉजेस पूर्ण क्षमतेने भरल्याचे चित्र दिसून आले. स्थानिक पर्यटन व्यावसायिकांसाठी ही गर्दी आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरत असून पर्यटन व्यवसायाला मोठी चालना मिळाली आहे.


https://prahaar.in/2026/05/04/serious-defect-in-millions-of-thermos-bottles-and-jars-if-someone-loses-their-eyesight-who-else-why/

मात्र दुसरीकडे वाढत्या पर्यटकांमुळे पायाभूत सुविधांवर ताण निर्माण झाला आहे. मुंबई-गोवा महामार्ग, अलिबाग-वडखळ मार्ग, दिघी-माणगाव महामार्ग तसेच अलिबाग-मुरुड मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. अनेक पर्यटकांना तासन्तास वाहनांच्या रांगेत अडकून पडावे लागल्याचे चित्र पाहायला मिळाले.एकूणच, सलग सुट्ट्यांचा लाभ घेत कुटुंबासह पर्यटनासाठी बाहेर पडण्याची प्रवृत्ती वाढत असून, रायगडचे समुद्रकिनारे पुन्हा एकदा पर्यटकांच्या उत्साहाने गजबजून गेले आहेत.

Comments
Add Comment

Nashik : येवल्यात भरधाव कंटेनरची दुचाकीला जोरदार धडक; ७७ वर्षीय वृद्धाचा जागीच मृत्यू

Nashik : येवला शहरातील विंचूर चौफुली परिसरात आसरा हॉटेलजवळ गुरुवारी झालेल्या भीषण रस्ता अपघातात पिंपळगाव जलाल येथील

Mhada: म्हाडातर्फे १३ जुलै रोजी १९ वा लोकशाही दिन साजरा होणार

मुंबई(Mumbai) : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणातर्फे (Mhada) एकोणीसावा लोकशाही दिन सोमवार १३ जुलै २०२६

Lote MIDC : लोटे एमआयडीसीतील रसायन गळतीने खळबळ, एमपीसीबीकडून सहा कारखान्यांना उत्पादन बंदीची दिली नोटीस

खेड : तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीतील प्रदूषणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, औद्योगिक वसाहतीतील एका

Kiara Advani : 'टॉक्सिक'साठी कियारा अडवाणीने घेतले तब्बल 'इतक्या' कोटींचे मानधन; कारकिर्दीतील सर्वाधिक फी

Kiara Advani : बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री कियारा अडवाणी (Kiara Advani) अनेकांच्या मनावर राज्य करते. कबीर सिंग चित्रपटानंतर (kabir

Pavitra Rishta : 63 व्या वर्षीही अविवाहित, 'पवित्र रिश्ता' फेम 'ही' अभिनेत्री; सांगितलं लग्न न करण्यामागचं खरं कारण

Pavitra Rishta : पवित्र रिश्ता मालिका आजही अनेकांच्या मनात घर करून आहे. मालिकेची कथा, पटकथा , अभिनय त्यासोबतच गाणे सर्व काही

Gauri Sprat : 131 कारागीर, 256 तास... गौरी स्प्रॅटसाठी आमिर खानची खास अंगठी; मादागास्करच्या दुर्मिळ माणिकाने वेधले लक्ष

Gauri Sprat : अभिनेता आमिर खान (Aamir Khan) आणि गौरी स्प्रॅट (Gauri Sprat) यांच्या विवाहसोहळ्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. साध्या आणि