सोलापूर-अक्कलकोट महामार्गावर भीषण अपघात, एसटी बस आणि डंपरची जोरदार धडक; दोन प्रवाशांचा मृत्यू

सोलापूर : सोलापूरमध्ये भीषण अपघाताची घडली आहे. सोलापूर-अक्कलकोट महामार्गावरील रूद्देवाडी बसस्थानकाजवळ अपघात घडला आहे. एसटी बस व मुरूमाने भरलेल्या डंपरचा भीषण अपघात झाला असून हा अपघात आज सोमवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास घडला आहे. हृदयद्रावक म्हणजे अपघातानंतर डंपरने पेट घेतल्याने दोन प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. (Serious accident on Solapur-Akkalkot highway)


मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, अक्कलकोट होऊन गाणगापूर कडे जाणाऱ्या बसला रुद्देवाडी बसस्थानकाजवळ मुरूमाने भरलेल्या डंपरने समोरून धडक दिली. या धडकेत एसटी बसचे प्रचंड नुकसान झाले आहे. अपघातानंतर पुढे जाऊन डंपर उलटला आणि डंपरने पेट घेतला. बसमधील अनेक प्रवासी किरकोळ तर काही प्रवास गंभीर जखमी झाले आहेत. (Serious accident on Solapur-Akkalkot highway)


या अपघातात दोन प्रवाशांचा मृत्यू झाला असून मृत्यूचा आकडा वाढण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. अपघातानंतर मदतीसाठी ग्रामस्थ धावले. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. जखमींना उपचारासाठी जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात येत आहे.

Comments
Add Comment

TET exam : टीईटी परीक्षेत सीसीटीव्हीमध्ये चेहरा दिसणे बंधनकारक

टीईटी परीक्षेत सीसीटीव्हीमध्ये चेहरा दिसणे बंधनकारक बुरखा, दुपट्टा किंवा ओढणीला बंदी नाही- राज्य परीक्षा

Vilas Ghule : विलास घुले हत्या प्रकरणावरून धनंजय मुंडेंचा सवाल; निष्पक्ष तपासाची मागणी

बीड : बीड (Beed) जिल्ह्यातील केज तालुक्यातील विलास घुले (Vilas Ghule) हत्या प्रकरणावरून (Murder) माजी मंत्री आणि आमदार धनंजय मुंडे

Monsoon Update : जून महिन्यात पाऊस पडणार नाही ; या तारखेपासून कोसळणार मुसळधार पाऊस

महाराष्ट्र : महाराष्ट्रामध्ये काही भागात पावसाने जोरदार हजेरी लावली. २३ आणि २५ जूनला मुंबईसह इतर शहरात मुसळधार

Ketan Agarwal Murder Case: "म्हणून मी त्याला लोहगडावरून खाली ढकललं..." सियाने पोलिसांसमोर सर्वचं सांगितलं

केतनच्या हत्येमागचं सर्वात भयंकर कारण आलं समोर Ketan Agarwal Murder Case : पुणे : पुण्यातील उद्योगपती केतन अग्रवाल (Ketan Agarwal Murder)

आषाढी वारीसाठी रेल्वेची खास भेट; पंढरपूरसाठी धावणार विशेष गाड्या, जाणून घ्या वेळापत्रक

आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी मध्य रेल्वेने विशेष गाड्यांची घोषणा केली

Maharashtra Infrastructure : मुंबई आणि नागपूरसाठी मोठा निर्णय; दोन महत्त्वाच्या वाहतूक प्रकल्पांना राज्य सरकारची मंजुरी

राज्यातील वाहतूक व्यवस्था अधिक वेगवान आणि सुलभ करण्यासाठी राज्य सरकारने दोन महत्त्वाच्या पायाभूत सुविधा