Mumbai : मुंबईच्या झोपडपट्ट्यांमध्ये इमिटेशन ज्वेलरीच्या कारखान्यांचे फुटले पेव

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईत नक्कल दागिने अर्थात इमिटेशन ज्वेलरीच्या कारखान्यांमध्ये सया मोठ्या प्रमाणत वाढ होत असून या ज्वेलरीसाठी विहिर किंवा बोअरवेलचे पाणी चालत नाही. त्यामुळे महापालिकेच्या अनधिकृत जलजोडण्या घेवून पाण्याची चोरी केली जात आहे. एका बाजुला नागरिकांना पिण्यास पाणी मिळत नाही आणि दुसरीकडे अनधिकृत ज्वेलरीच्या कारखान्यांना पाणी दिले जात असल्याने महापालिका सभागृहात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे झोपडपट्टयांमध्ये अशाप्रकारच्या कारखान्यांमध्ये परवानगी दिली जात नसून याप्रकरणांवर विभागाच्या इमारत कारखाने, परवाना विभाग आणि अग्निशमन दलाच्यावतीने संयुक्तपणे कार्यवाही करून कारवाई करण्यात येईल असे आश्वासन प्रशासनाच्यावतीने महापालिका सभागृहात देण्यात आले.


मुंबई महापालिका सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेसचे (शप) नगरसेवक अजित रावराणे यांनी ६६ ब अन्वये मुंबई शहरात सुर असलेल्या नक्कल दागिने बसवण्याच्या कारखान्याचे लेखापरिक्षण करून नियमावली बनवणे तसेच पाण्याचा औद्योगिक वापर, बालमजूर अशा अन्य बाबींवर सभागृहात चर्चा उपस्थित केली. यावर बोलतांना अजित रावराणे यांनी या कारखान्यांमध्ये नायट्रीक अॅसिड या ज्वलनशील वापर करण्यात येत असून हे घातक रसायन आहे. हे कारखाने केवळ महापालिकेच्या पाण्यावर चालतात आणि बोअरींगच्या पाण्याचा वापर केल्यास त्याला चकाकी मिळत नाही. परंतु, दिडोंशी विभागातील नागरिकांना पिण्यास मागील चार दिवसांपासून पाणी मिळत नाही. पण या दिंडोशी परिसरात या कारखान्यांना पाणी मिळत आहे. ते पाणी जमा करून वापरत आहेत. यासाठी एक ते दोन इंचाच्या जलवाहिनी अनधिकृत घेतल्या जात आहे आणि बुस्टर पंप लावून हे पाणी खेचले जाते.


केवळ पाण्याचीच समस्या नाही तर या कारखान्यांमध्ये जे कामगार आहे, त्यांच्यासाेबत आसपासच्या वस्तीमधील १६ ते १७ वर्षांच्या मुली पळून जात आहेत. मागील काही दिवसांमध्ये पोलिस ठाण्यात अशाप्रकारच्या तक्रारीही दाखल झाल्याचे रावराणे यांनी सांगितले. त्यामुळे अशाप्रकारच्या कारखान्यांवर महापालिका काय कारवाई करणार, त्यांच्या अनधिकृत जलजोडणी कधी तोडणार असा सवाल त्यांनी उपस्थित केला. यावर अतिरिक्त आयुक्त डॉ अश्विनी जोशी यांनी झोपडपट्टी परिसरात अशाप्रकारच्या कारखान्यांना कुठल्याही प्रकारची परवानगी दिली जात नाही. तसेच ज्या कारखान्यांना परवानगी दिली जाते, त्यांची संयुक्त पाहणी ही संबंधित विभागाचे इमारत कारखाने विभाग, परवाना विभाग, अग्निशमन दलाचे अधिकारी यांची यांच्या मार्फत करून परवानगी दिली जाते. परंतु पी पूर्व विभागातील झोपडपट्टी परिसरात हे कारखाने असल्याची तक्रार असल्यामुळे याबाबत तपासणी करून कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात येईल असे सांगितले.

Comments
Add Comment

Breaking News : मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा; सलग दुसऱ्या दिवशी शाळा-महाविद्यालयांना सुटी जाहीर

मुंबई : मुंबई महापालिकेने सलग दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्या मंगळवार ७ जुलै २०२६ रोजी सर्व शासकीय, खासगी,

Dadar Tree Collapse : दादरमध्ये भलंमोठं झाड कोसळलं! प्लाझाजवळ पार्क केलेल्या कारचा चक्काचूर; अग्निशमन दलाकडून मदतकार्य सुरू

मुंबई : मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे झाडे कोसळण्याच्या घटनांमध्ये गेल्या

BMC Park : मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! महापालिकेची सर्व उद्याने उद्या बंद राहणार; जोरदार वारे आणि पावसाच्या पार्श्वभूमीवर निर्णय

मुंबई : मुंबईत गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे शहरातील अनेक

Mumbai Rain : मुंबईत मुसळधार पावसाचा तडाखा! २९१ ठिकाणी झाडे कोसळली, २२ ठिकाणी भिंती-घरांचे नुकसान; पुढील २४ तास अतिवृष्टीचा इशारा

मुंबईत सोमवारी (६ जुलै) दिवसभर मुसळधार पावसाने हजेरी लावली असून शहरातील जनजीवनावर त्याचा मोठा परिणाम झाला आहे.

Girish Mahajan : अतिवृष्टीमुळे घडलेल्या सर्व घटनांची चौकशी होणार, नागरिकांनी सतर्क राहावे : मंत्री गिरीष महाजन

मुंबई : राज्यात सुरू असलेल्या मुसळधार आणि अतिवृष्टीमुळे विविध ठिकाणी दरडी कोसळणे, झाडे पडणे आणि इमारतींचे

Mumbai heavy rain : मुंबईत अवघ्या सहा दिवसांत १० जणांचा मृत्यू; पाऊस, झाडे कोसळणे आणि घर दुर्घटनांनी वाढवली चिंता

मुंबई : यंदाच्या मान्सूनमध्ये मुंबईत पावसामुळे घडणाऱ्या दुर्घटनांचे प्रमाण वाढत असून, ३० जून ते ५ जुलै या अवघ्या