Mumbai : मुंबईच्या झोपडपट्ट्यांमध्ये इमिटेशन ज्वेलरीच्या कारखान्यांचे फुटले पेव

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईत नक्कल दागिने अर्थात इमिटेशन ज्वेलरीच्या कारखान्यांमध्ये सया मोठ्या प्रमाणत वाढ होत असून या ज्वेलरीसाठी विहिर किंवा बोअरवेलचे पाणी चालत नाही. त्यामुळे महापालिकेच्या अनधिकृत जलजोडण्या घेवून पाण्याची चोरी केली जात आहे. एका बाजुला नागरिकांना पिण्यास पाणी मिळत नाही आणि दुसरीकडे अनधिकृत ज्वेलरीच्या कारखान्यांना पाणी दिले जात असल्याने महापालिका सभागृहात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे झोपडपट्टयांमध्ये अशाप्रकारच्या कारखान्यांमध्ये परवानगी दिली जात नसून याप्रकरणांवर विभागाच्या इमारत कारखाने, परवाना विभाग आणि अग्निशमन दलाच्यावतीने संयुक्तपणे कार्यवाही करून कारवाई करण्यात येईल असे आश्वासन प्रशासनाच्यावतीने महापालिका सभागृहात देण्यात आले.


मुंबई महापालिका सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेसचे (शप) नगरसेवक अजित रावराणे यांनी ६६ ब अन्वये मुंबई शहरात सुर असलेल्या नक्कल दागिने बसवण्याच्या कारखान्याचे लेखापरिक्षण करून नियमावली बनवणे तसेच पाण्याचा औद्योगिक वापर, बालमजूर अशा अन्य बाबींवर सभागृहात चर्चा उपस्थित केली. यावर बोलतांना अजित रावराणे यांनी या कारखान्यांमध्ये नायट्रीक अॅसिड या ज्वलनशील वापर करण्यात येत असून हे घातक रसायन आहे. हे कारखाने केवळ महापालिकेच्या पाण्यावर चालतात आणि बोअरींगच्या पाण्याचा वापर केल्यास त्याला चकाकी मिळत नाही. परंतु, दिडोंशी विभागातील नागरिकांना पिण्यास मागील चार दिवसांपासून पाणी मिळत नाही. पण या दिंडोशी परिसरात या कारखान्यांना पाणी मिळत आहे. ते पाणी जमा करून वापरत आहेत. यासाठी एक ते दोन इंचाच्या जलवाहिनी अनधिकृत घेतल्या जात आहे आणि बुस्टर पंप लावून हे पाणी खेचले जाते.


केवळ पाण्याचीच समस्या नाही तर या कारखान्यांमध्ये जे कामगार आहे, त्यांच्यासाेबत आसपासच्या वस्तीमधील १६ ते १७ वर्षांच्या मुली पळून जात आहेत. मागील काही दिवसांमध्ये पोलिस ठाण्यात अशाप्रकारच्या तक्रारीही दाखल झाल्याचे रावराणे यांनी सांगितले. त्यामुळे अशाप्रकारच्या कारखान्यांवर महापालिका काय कारवाई करणार, त्यांच्या अनधिकृत जलजोडणी कधी तोडणार असा सवाल त्यांनी उपस्थित केला. यावर अतिरिक्त आयुक्त डॉ अश्विनी जोशी यांनी झोपडपट्टी परिसरात अशाप्रकारच्या कारखान्यांना कुठल्याही प्रकारची परवानगी दिली जात नाही. तसेच ज्या कारखान्यांना परवानगी दिली जाते, त्यांची संयुक्त पाहणी ही संबंधित विभागाचे इमारत कारखाने विभाग, परवाना विभाग, अग्निशमन दलाचे अधिकारी यांची यांच्या मार्फत करून परवानगी दिली जाते. परंतु पी पूर्व विभागातील झोपडपट्टी परिसरात हे कारखाने असल्याची तक्रार असल्यामुळे याबाबत तपासणी करून कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात येईल असे सांगितले.

Comments
Add Comment

Mumbai News: सरकारी अधिकारी असल्याची बतावणी करत व्यापाऱ्यांना ब्लॅकमेल; रिलस्टार रणदीप गुजराल अटकेत

मुंबई : मुलुंड (Mulund) परिसरातील एका व्यावसायिकाला धमकावून खंडणी उकळणाऱ्या रणदीप हरबिंदरसिंग गुजराल (वय 40) या

Bhiwandi News: भिवंडीत हृदयद्रावक घटना! सेप्टिक टँकचे झाकण तुटल्याने 5 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू

भिवंडी : भिवंडी (Bhiwandi) शहरातील फरीद बाग परिसरातून एक अत्यंत दुर्दैवी आणि संतापजनक घटना समोर आली आहे. इमारतीच्या

Mumbai Mayor Accident : मुंबईच्या महापौर रितु तावडे यांच्या ताफ्याला सायन पुलावर अपघात; सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही

मुंबई : मुंबईच्या (Mumbai) महापौर रितु तावडे (Mayor Ritu Tawde) यांच्या ताफ्याला सायन पुलावर अपघात (Sion Bridge Accident) झाल्याची घटना सोमवारी

Byculla BMC School : शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी मुंबई महानगरपालिकेचे प्रयत्न कौतुकास्पद; राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांचे गौरवोद्गार

- भायखळा येथील महानगरपालिका शाळेत पार पडला प्रवेशोत्सव सोहळा मुंबई (विशेष प्रतिनिधी) शाळा ही केवळ शिक्षण

DCM Eknath Shinde : मुंबईतील पावसाळापूर्व तयारीचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आढावा

मुंबईत शुन्य जीवितहानी उद्दीत ठेवा मुंबई महापालिकेसह सर्व यंत्रणांनी समन्वय राखून काम करण्याचे दिले

Goregaon Motilal Nagar Redevelopment Project : गोरेगाव मोतीलाल नगरच्या पुनर्विकास प्रकल्पात २२० झाडे बाधित

- पालघरमधील चहाडे गावात लावणार ४००६ झाडे लावणार मुंबई (विशेष प्रतिनिधी) गोरेगाव (पश्चिम) येथील मोतीलाल नगरमधील