बारावी निकालात नाशिक विभाग कितव्या स्थानावर ?, मुलींचे वर्चस्व कायम

नाशिक (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केलेल्या इयत्ता १२ वीच्या निकालात नाशिक विभागाने ९०.७२ टक्के निकालासह राज्यात चौथा क्रमांक मिळवला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही मुलींनी उत्कृष्ट कामगिरी करत आपले वर्चस्व कायम राखले आहे. मागील वर्षाच्या तुलनेत विभागाच्या निकालात ०.५९ टक्क्यांची घट नोंदवण्यात आली आहे.


नाशिक विभाग चौथ्या क्रमांकावर


शनिवार (दि. २) रोजी सकाळी ११ वाजता निकाल जाहीर करण्यात आला. नाशिक विभागातून एकूण १,६२,९१४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १,६१,८१२ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. यामधून १,४६,७९९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये मुलींचे प्रमाण ९३.४२ टक्के तर मुलांचे ८८.४० टक्के इतके आहे.


एकूण २४,१७५ विद्यार्थ्यांनी प्राविण्यासह प्रथम श्रेणी (७५ टक्क्यांपेक्षा अधिक) गुण मिळवले आहेत. तर ५३,६१३ विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी (६० टक्क्यांपेक्षा अधिक) आणि १२,१९० विद्यार्थ्यांनी उत्तीर्ण श्रेणी (३५ टक्क्यांपेक्षा अधिक) प्राप्त केली आहे.


नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून १८,४४२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी १७,२२६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून शहराचा एकूण निकाल ९३.४० टक्के आहे. येथेही मुलींनी (९५.३१ टक्के) मुलांपेक्षा (९१.५७ टक्के) सरस कामगिरी केली आहे.

Comments
Add Comment

Chiplun Crime : सकाळी लवकर उठ म्हणताच सुनेचा संताप! सासूला बेदम मारहाण

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातून एक अतिशय धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. शेतात

Chembur News: चेंबूर वृक्ष दुर्घटनेनंतर महापालिकेचा मोठा निर्णय; कंत्राटदारांना दंड, झाडांच्या सुरक्षेसाठी नवी SOP लागू होणार

चेंबूर (पश्चिम) येथील डायमंड गार्डनजवळ 30 जून 2026 रोजी शाळेच्या बसवर पिंपळाचे झाड कोसळून झालेल्या दुर्घटनेप्रकरणी

Delhi Riots : आयबी अधिकारी अंकित शर्मा यांच्या हत्येप्रकरणी माजी नगरसेवक ताहिर हुसेन दोषी

नवी दिल्ली: २०२० च्या ईशान्य दिल्ली दंगलीदरम्यान गुप्तचर विभागातील (IB) अधिकारी अंकित शर्मा यांच्या हत्येप्रकरणी

Jalgaon Accident : संसाराची नवी स्वप्न धुळीस! लग्नानंतर अवघ्या काही दिवसांतच नवविवाहितेचा भीषण अपघातात मृत्यू

माहेरी जाताना २१ वर्षीय नवविवाहितेचा भीषण अपघातात मृत्यू जळगाव : जळगाव (Jalgaon) शहरात सोमवारी घडलेल्या भीषण अपघातात

IND(w) vs ENG(w) : ऐतिहासिक लॉर्ड्सच्या मैदानात भारताच्या 'रन'रागिणींचा महा-पराक्रम; इंग्लंडवर २७० धावांनी दणदणीत विजय

लंडन: क्रिकेटची पंढरी मानल्या जाणाऱ्या लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर भारतीय महिला क्रिकेट संघाने नवा इतिहास

Accident : व्हिएतनाम बोट दुर्घटना; १५ भारतीय पर्यटकांचे पार्थिव आज रात्री मुंबईत दाखल होणार

मुंबई: व्हिएतनाममधील फूक्वॉक बेटाजवळ झालेल्या भीषण स्पीडबोट अपघातात जीव गमावलेल्या १५ भारतीय पर्यटकांचे