Night Block : कल्याण-बदलापूर मार्गावर रात्रकालीन ब्लॉक

कल्याण : मध्य रेल्वेच्या मुंबई मंडळाने कल्याण-बदलापूर दरम्यान १ ते ३ मेदरम्यान दोन रात्री विशेष पॉवर ब्लॉक जाहीर केला आहे. ओव्हरहेड उपकरणावरील अतिक्रमण हटवण्यासाठी हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. शनिवारी २ मे रोजी पहाटे १.४० ते ३.४० या वेळेत कल्याण-अंबरनाथ दरम्यान, तर ३ मे रोजी १.३० ते ३.३० या वेळेत अंबरनाथ-बदलापूर दरम्यान ब्लॉक राहील. या कालावधीत कल्याण-बदलापूर दरम्यान उपनगरीय लोकल सेवा पूर्णपणे बंद राहणार आहे. तसेच काही मेल-एक्सप्रेस गाड्या कर्जत-पनवेल मार्गे वळवण्यात येणार असून काही गाड्यांना ठाणे व पनवेल येथे तात्पुरते थांबे देण्यात येणार आहेत. प्रवाशांनीर्यायी व्यवस्था करण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.


२ मे च्या रात्री, ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल बीएल ६१ सीएसएमटी -बदलापूर धावेल, तर ब्लॉक नंतरची पहिली लोकल एस४ कर्जत-सीएसएमटी धावेल. त्याचप्रमाणे २ आणि ३ मे च्या रात्री शेवटची लोकल एस ४१ सीएसएमटी-कर्जत असेल आणि त्यानंतर एस४ कर्जत- सीएसएमटी ही पहिली लोकल सुरू होईल. या ब्लॉकमुळे लांब पल्ल्याच्या गाड्यांवरही परिणाम होणार आहे.


एक्सप्रेस गाड्या वळविणार : रेल्वे प्रशासनानुसार २ मे रोजी धावणारी भुवनेश्वर-सीएसएमटी कोणार्क एक्सप्रेस, विशाखापट्टणम-एलटीटी एक्सप्रेस आणि हैदराबाद-सीएसएमटी सेंसागर एक्सप्रेस या गाड्या कर्जत–पनवेल मार्गे वळविण्यात येणार आहेत. कल्याण येथे थांबा असलेल्या गाड्यांना प्रवाशांच्या सोयीसाठी पनवेल व ठाणे स्थानकांवर तात्पुरते थांबे देण्यात येणार आहेत. तसेच उशिराने धावणाऱ्या मेल, एक्सप्रेस व हॉलिडे स्पेशल गाड्यांमध्ये गरजेनुसार बदल किंवा वळवणूक केली जाऊ शकते, असेही रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Comments
Add Comment

DJ company : डिजे वाजवणाऱ्या कंपनीला रस्त्यावरील रेलिंगचे कंत्राट

कुणाच्या दबावाखाली महापालिकेने दिले शिवसेना गटनेते अमेय घोले यांनी उबाठाची केली बोलतीच बंद मुंबई (विशेष

NEET UG परीक्षेसाठी मेगाब्लॉकच्या नियोजनात बदल, जाणून घ्या कुठे आणि कधी असेल मेगाब्लॉक ?

मुंबई : नीट युजी परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये म्हणून रेल्वे प्रशासनाने मेगाब्लॉकच्या

Megablock : पश्चिम रेल्वेवर १० तासांचा मेजर ब्लॉक

मुंबई : मुंबईतील मेट्रो ६ च्या स्टील गर्डर लाँचिंगच्या कामासाठी पश्चिम रेल्वेने २ आणि ३ मे च्या मध्यरात्री १०

Census In Mumbai : मुंबईत जनगणना-२०२७ला सुरुवात, राज्यपाल जिष्णु देव वर्मा, मुखमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्व-गणनेद्वारे केला मोहिमेचा शुभारंभ

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्याचे माननीय राज्यपाल जिष्णु देव वर्मा आणि मुखमंत्री देवेंद्र फडणवीस

Ganesh Khankar : पुढची २५ वर्षे आम्ही काय आता हटत नाही, खणकरांनी विरोधकांना सुनावले

सभागृहनेत्यांच्या गिनतीत विरोध पक्षनेत्या नाहीच, आझमींचाच घेतला समाचार मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई

HSC Result : राज्याचा बारावीचा निकाल शनिवार २ मे रोजी जाहीर होणार

मुंबई : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी व मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या उच्च