चिकन खाताय ? सावध व्हा ! महाराष्ट्रात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव, 'या' ठिकाणच्या तब्बल दीड लाख कोंबड्या मारणार

नंदूरबार : चिकन म्हणजे अनेकांचा जीव की प्राण. आणि तुम्ही देखील याच अनेकांमध्ये असाल तर वेळीच सावध व्हा कारण महाराष्ट्रात नव्या संकटानं शिरकाव केला आहे. आधीच राज्यातील नागरिक कडक उन्हामुळे होरपळून निघाले आहेत. राज्यात आतापर्यंत उष्माघाताने 9 जणांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जात आहे. हे संकट असतानाच आता राज्यात दुसरं संकट धडकलं आहे. राज्यात बर्ड फ्ल्यूने शिरकाव केला आहे. ( Nawapur News )


नवापूरमध्ये बर्ड फ्ल्यूचा कहर


नंदूरबार जिल्ह्याच्या नवापूरमध्ये बर्ड फ्ल्यूने(Bird flu ) कहर केला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर कोंबड्या मारल्या जाणार आहेत. बर्ड फ्ल्यू राज्यात इतर ठिकाणी फोफावला तर अनेकांचे चिकन खाण्याचेही वांदे होणार आहेत. नंदूरबार जिल्ह्यातील नवापूर येथील पोल्ट्री फार्ममध्ये बर्ड फ्ल्यूचा शिरकाव झाल्याने 1 लाख 40 हजार कोंबड्यांचे किलिंग केले जाणार आहे. तीन पोल्ट्री फार्मचे सॅम्पल इंदूरच्या प्रयोगशाळात पाठवले होते. ते सॅम्पल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. (Bird flu wreaks havoc in Navapur)


परिसरातील सर्व पोल्ट्री फार्मचे सॅम्पल घेणार


जिल्ह्यात बर्ड फ्ल्यूचा शिरकाव झाल्याने प्रशासनही खडबडून जागं झालं आहे. बर्ड फ्ल्यूचा शिरकाव रोखण्यासाठी प्रशासनाने तातडीने पावलं उचलली आहेत. एक तालुकास्तरीय समिती तयार करण्यात आली असून, नवापूरच्या परिसरातील सर्व पोल्ट्री फार्मचे आता सॅम्पल घेतले जाणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी मिताली सेठी यांनी दिली आहे. (Bird flu wreaks havoc in Navapur)


1 लाख 40 हजार कोंबड्या मारणार


पॉझिटिव्ह आलेल्या पोल्ट्री फार्मच्या एक किलोमीटर परिसरातील सर्व कोंबड्या मारणार असल्याची माहिती समोर आली आहे . इतर कोंबड्यांना आजाराची लागन होऊ नये आणि नागरिकांचं आरोग्य धोक्यात येऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. एक किलोमीटरच्या परिसरात असलेल्या सहा पोल्ट्री फॉर्ममध्ये 1 लाख 40 हजार कोंबड्या आहेत. या सर्व कोंबड्या ठार मारल्या जाणार आहेत, अशी माहितीही मिताली सेठी यांनी दिली. त्यासोबतच ज्या पोल्ट्री फार्मचं नुकसान होणार आहे, त्यांची माहिती शासनाकडे पाठवून शासनाच्या नियमानुसार त्यांना मदत दिली जाणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.

Comments
Add Comment

Pune Traffic Update : पुणे पालखी सोहळ्यादरम्यान वाहतुकीत बदल, जिल्हाधिकाऱ्यांकडून पर्यायी मार्गांची घोषणा

पुणे : श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे ८ जुलै २०२६ रोजी श्रीक्षेत्र आळंदी येथून प्रस्थान होणार आहे. या

Thailand Job Scam : राज्यातील २५ तरुण थायलंड-म्यानमार सीमेवर अडकले

- सुटकेसाठी राज्य सरकार सक्रिय; मुख्यमंत्र्यांकडून गिरीश महाजन यांच्याकडे जबाबदारी मुंबई : फेसबुकवरील आकर्षक

National Health Mission : NHMच्या १५,०१० कंत्राटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; 10 वर्षांहून अधिक सेवेनंतर समायोजनाचा मार्ग मोकळा

१० वर्षे सेवा पूर्ण केलेल्या NHM कर्मचाऱ्यांना समकक्ष पदांवर नियुक्ती मुंबई : राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) अंतर्गत

Nashik Pune High Speed Rail : नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वेसाठी १ जुलैला मुख्यमंत्र्यांची बैठक; केंद्राकडे पाठपुराव्याचा निर्णय

नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वेला गती देण्यासाठी मुख्यमंत्र्यांची उद्या बैठक मुंबई : नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वे

Navnath ban : "राष्ट्र प्रथम" विचारसरणीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; काँग्रेससोबत जाणारे राऊतच खरे 'महाराष्ट्रद्रोही': भाजप मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांचा घणाघात

मुंबई : भारतीय जनता पक्षाचे (BJP) प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन (Navnath ban) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या

Harit Maharashtra : राज्यात ११ कोटी वृक्ष लागवडीसाठी नियोजनावर भर; मुख्यमंत्री फडणवीसांचे आदेश

मुंबई : राज्यात यंदा ११ कोटी वृक्ष लागवडीचे (Tree Plantation) उद्दिष्ट निश्चित करण्यात आले असून हे लक्ष्य वेळेत पूर्ण