25 वर्षांच्या संसारात मिठाचा खडा , 7 लेकरांची आईने चारित्र्याच्या संशयाने जीव गमावला ; काय घडलं ?

Bihar Crime : बिहारमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. २५ वर्षाच्या संसारात मिठाचा खडा पडला. 25 वर्षांपूर्वी ज्या पत्नीचा हात धरून आयुष्यभर साथ देण्याचे वचन दिले, त्याच पतीने आपल्या पत्नीचा क्रूर पद्धतीने जीव घेतला. कारण ठरलं चारित्र्याचा संशय.


नवादा जिल्ह्यातील कौआकोल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दरमा गावात राहणाऱ्या रवी मांझी याने आपली पत्नी बबीता कुमारी हिची चाकूने वार करून क्रूर पद्धतीने हत्या केलीय. रवी आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत होता आणि याच कारणावरून त्यांच्यात अनेकदा वादाच्या ठिणग्या पडत होत्या, ज्याचा शेवट अशा दुर्दैवी हत्येत झाला.


रवी मांझी आणि बबीता कुमारी रूपौ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील फरेदा गावातील रहिवासी होते लग्नानंतर त्यांचा संसार फुलला आणि त्यांना सात मुले झाली, मात्र एवढा मोठा परिवार असूनही पती-पत्नीच्या नात्यात विश्वासाची जागा संशयाने घेतली. प्राथमिक माहितीनुसार, रवि अनेकदा बबीतावर विनाकारण संशय घेत असे आणि घरात यावरून दररोज भांडणे होत असत. हा वाद एक दिवस इतका भयानक वळण घेईल आणि हत्येपर्यंत पोहोचेल, अशी कल्पना कुटुंबातील कोणीही केली नव्हती. ( Bihar Crime News )


घटनेच्या दिवशी काय घडलं ?


घटनेच्या दिवशी पती-पत्नीमध्ये पुन्हा एकदा जोरदार वादावादी झाली आणि रागाच्या भरात रवीने आपला ताबा गमावला. त्याने घरातील चाकू उचलून पत्नी बबीतावर सपासप वार केले, धक्कादायक म्हणजे ही सर्व घटना त्याच्या मुलांच्या डोळ्यादेखत घडली. मृत महिलेच्या 16 वर्षांच्या मुलाने सांगितले की, त्याचे वडील वारंवार आईवर संशय घेत असत आणि वादादरम्यान वडिलांनी आईच्या छातीत चाकू खुपसला. आईचा आक्रोश ऐकून कुटुंबातील लोक आणि शेजारी मदतीला धावले, मात्र तोपर्यंत बराच उशीर झाला होता. गंभीर जखमी झालेल्या बबीताला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. ( Bihar Crime News )


आरोपी पती फरार


या अमानवीय घटनेनंतर आरोपी रवी मांझी फरार झाला आहे . घटनेची माहिती मिळताच कौआकोल पोलीस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी पाठवून दिला आहे. आरोपीच्या अटकेसाठी पोलिसांनी विविध ठिकाणी छापेमारी सुरू केली असून लवकरच त्याला बेड्या ठोकल्या जातील. या घटनेमुळे दरमा गावात शोककळा पसरली असून सात निष्पाप मुलांच्या डोक्यावरचे मायेचे छत्र कायमचे हरपले आहे.

Comments
Add Comment

Konkan Hapus' Fills Delhi : दिल्लीत 'कोकण हापूस'चा सुगंध! निवासी आयुक्त आर. विमला यांच्या हस्ते आंबा महोत्सवाचे दिमाखात उद्घाटन

नवी दिल्ली : दिल्लीच्या बाजारपेठेत अनेक प्रकारचे आंबे उपलब्ध असतात, मात्र तो आंबा अस्सल देवगड किंवा

Srilanka Cricket News : क्रिकेटविश्व हादरलं! 2 खेळाडूंनी हॉटेलच्या बाथरूममध्ये लपून काढले महिला डॉक्टरचे अश्लील व्हिडीओ

क्रीडा विश्वाला हादरवून सोडणारी आणि अत्यंत संतापजनक अशी एक घटना नुकतीच उघडकीस आली आहे. दोन क्रिकेटपटूंनी एका

Jabalpur Cruise: जबलपूर क्रूझ दुर्घटनेत 9 जणांचा करुण अंत, माय-लेकाचा 'तो' क्षण काळीज पिळवटून टाकणारा; नेमकं काय घडलं ?

मध्य प्रदेश : मध्य प्रदेशातील जबलपूर इथलं लोकप्रिय पर्यटन स्थळ असलेल्या बर्गी धरणावर गुरुवारी रात्री एका

LPG Gas Price Hike : महागाईचा भडका! तब्बल ९९३ रुपयांनी महागला गॅस सिलेंडर; जाणून घ्या एका सिलेंडरसाठी किती रुपये मोजावे लागणार?

मुंबई : मे महिन्याच्या सुरुवातीलाच तेल कंपन्यांनी सर्वसामान्यांना मोठा धक्का दिला आहे. १९ किलोच्या व्यावसायिक

Madhya Pradesh Narmada cruise accident : बरगी धरणात क्रूझ बुडाले, ४ जणांचा मृत्यू,१०-१५ बेपत्ता

मध्यप्रदेशच्या जबलपूर येथील बरगी धरण परिसरात अचानक आलेल्या जोरदार वादळी वाऱ्यांमुळे एक मोठा अपघात घडला.

Loud DJ music kills 140 chickens : उत्तर प्रदेशमध्ये डीजेच्या भयानक आवाजाने १४० कोंबड्यांचा मृत्यू; DJ चालकावर FIR दाखल

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) सुलतानपूर (Sultanpur) जिल्ह्यातून एक अतिशय विचित्र आणि तितकीच धक्कादायक घटना