मुंबई : भारतीय इंजिनिअरींगचा अदभूत चमत्कार असलेला आणि मुंबई पुणे अंतर कमी करणारा सर्वात महत्वाच्या पुलाची आता 'गिनीज वर्ल्ड बुक' मध्ये नोंद झाली आहे. यातून भारतीय इंजिनिअरिंगच्या कामाची, कलेची ताकद दिसून येत आहे. डोंगराळ भागात साकारलेल 'मिसिंग लिंक' आता जगाच्या नकाशावर चमकणार आहे. कारण या पुलाची' गिनीज वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड यामध्ये नोंद झाली आहे.
अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांचे स्पष्ट निर्देश मुंबई : मुंबई स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी संपूर्ण मुंबईत अत्यंत गांभीर्याने आणि ...
जागतील सर्वात रुंद बोगदा
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने दिलेल्या माहितीनुसार या बोगद्याची रुंदी विक्रमी असून १० लेन ची वाहतूक एकाच वेळी या लेनमधून कारण शक्य होणार आहे.. जमिनीपासून १३२ मीटर उंचीवर असलेला केबल-स्टेड ब्रिज या प्रकल्पाचे मुख्य आकर्षण आहे.
प्रवाशांचा वेळ वाचणार
पुण्याचा प्रवास म्हणजे घाटांचा प्रवास लोणावळा, खंडाळा घाट पार करत पुण्यात प्रवेश होतो . धोकादायक वळणांवर होणारे अपघात आणि वाहतूक कोंडी आणि यात फुकट जाणारा वेळ यामुळे नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो. हाच पुण्याच्या प्रवास आता साधारण २० ते २५ मिनिटे कमी होणार असून, १०० किमी प्रति तास या वेगाने गाड्या या मरगावरून धावू शकणार आहेत.
मुंबई : दक्षिण मुंबईतील गजबजलेल्या पायधुनी परिसरातील घाटी गल्लीत एका घटनेने सर्वांचीच झोप उडवली आहे. येथील 'मुघल बिल्डिंग'मध्ये राहणाऱ्या डोकाडिया ...
तूर्तास अवजड वाहनांना असणार प्रवेश बंदी
१ मे महाराष्ट्र दिनापासून या पुलाचे उदघाटन होणार असून हलक्या गाड्या म्हणजे कर, बस यासारख्या वाहनांना प्रवेश दिला जाणार आहे. सुरक्षेचा कारणास्तव अवजड वाहनांना तूर्तास बंदी असणार आहे.
या मिसिंग पुलाच्या आजूबाजूला असणारी गर्द हिरवाई या पुलाची शोभा आणखीनच वाढवत आहेत. शिवाय खंडाळा आणि लोणावळा येथील वाहतूक कोंडी या पुलामुळे फुटणार आहे. या १० पदरी पुलामुळे मुंबई - पुण्याचा प्रवास आता सुसाट होणार आहे.