भीषण ! एक्स्प्रेसवेवर धावत्या कारला आग , अल्पवयीन मुलीसह 5 जणांचा करून अंत

दिल्ली : दिल्ली-मुंबई द्रुतगती महामार्गावर भीषण दुर्घटना झाली आहे. मुलाची नोकरी मिळवण्याची इच्छा पूर्ण झाल्यानंतर देवदर्शनानांवरून परतताना दिल्ली-मुंबई द्रुतगती महामार्गावर अलवरच्या मौजपूर येथे एका धावत्या कारला आग लागली. या अपघातात पाच जण जिवंत जळाले असून त्यांचा करून अंत झाला आहे. (Accident on Delhi Mumbai Expressway)


दिल्ली-मुंबई द्रुतगती महामार्गावरअलवरच्या मौजपूर येथे एका धावत्या कारला आग लागून मोठी दुर्घटना घडली. अपघात एवढा भीषण होता की पाच जण जिवंत जळाले असून त्यांचा करून अंत झाला आहे. आग विझवल्यानंतर, बचाव पथकांना इर्टिगा कारमध्ये फक्त हाडे सापडली. आग लागताच चालकाने गाडीतून उडी मारली होती. त्यामुळे तो थोडक्यात बचावला असला तरी तो गंभीर जखमी आहे. गंभीर अवस्थेत त्याला जयपूरला हलवण्यात आले आहे. (Accident on Delhi Mumbai Expressway)


कारमधील हे कुटुंब मध्य प्रदेशातील श्योपूरच्या चैनपुरा येथील होते. त्यांच्या मुलाची नोकरी मिळवण्याची इच्छा पूर्ण झाल्यानंतर ते वैष्णो देवीच्या तीर्थयात्रेवरून परत येत होते. या दरम्यान हा अपघात घडला. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा पोलिसांना संशय आहे. ही संपूर्ण घटना काल (30 एप्रिल) रात्री 11 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. (Accident on Delhi Mumbai Expressway)


सीएनजीमुळे आग लागल्याचा संशय
अलवरच्या एएसपी प्रियंका रघुवंशी यांनी सांगितले की, लक्ष्मणगड पोलिसांना कारला आग लागल्याची माहिती मिळाली. अग्निशमन दल रात्री 11:30 वाजण्याच्या सुमारास घटनास्थळी पोहोचले. आग विझवण्यासाठी अंदाजे 15 मिनिटे लागली. सीएनजी (CNG) इंधनामुळे आग वेगाने पसरली आणि त्यामुळे गाडीतील लोकांना बाहेर पडता आले नाही, असा संशय आहे.


मृतांमध्ये एका अल्पवयीन मुलीचा समावेश
पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, मृतांमध्ये तीन महिला, एक अल्पवयीन मुलगी आणि एका पुरुषाचा समावेश आहे. धक्कादायक म्हणजे वेगवेगळ्या गठ्ठ्यांमध्ये ठेवलेली फक्त हाडे सापडली आहेत. मृतदेहांची ओळख पटवण्यासाठी डीएनए नमुने घेतले जातील.


Comments
Add Comment

Dam Water Level : राज्यात ५६ टक्के उपयुक्त पाणीसाठा, मराठवाड्यात मात्र चिंता कायम

पुणे : जुलै महिन्यात झालेल्या समाधानकारक पावसामुळे राज्यातील धरणांमधील उपयुक्त पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली

Dog Attack : रेबीजमुळे चिमुकल्या समर्थ स्वामीचा दुर्दैवी मृत्यू; भटक्या कुत्र्यांवर कारवाईची मागणी

सोलापूर : भवानी पेठ परिसरातील घोंगडे वस्ती येथे कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या समर्थ स्वामी या

Amravati News : धक्कादायक! आश्रमशाळेतील ४० विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा; जेवणानंतर उलट्या, पोटदुखीने उडाली खळबळ

अमरावती : अमरावतीच्या मेळघाट परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. धारणी तालुक्यातील टीटंबा येथील शासकीय

Mumbai-Pune Water Update : मुंबई-पुणेकरांची पाण्याची चिंता मिटली! धरणांत मुबलक जलसाठा; पाहा कोणत्या तलावात किती टक्के पाणी ?

मुंबई : यंदाच्या मान्सूनने सुरुवातीला हुलकावणी दिली असली, तरी जुलै महिन्यात मुंबई (Mumbai) आणि पुण्याच्या पाणलोट

Ashadhi Ekadashi 2026 : विठ्ठलाच्या मूर्तीवरील प्रत्येक खूण सांगते एक कथा! जाणून घ्या दडलेले आध्यात्मिक अर्थ

विठ्ठलाच्या (Vitthal) मूर्तीवरील प्रत्येक खूण का आहे खास? https://prahaar.in/2026/07/25/pune-metro-news-hinjawadi-shivajinagar-pune-metro-li

Pune Metro : IT कर्मचाऱ्यांची ट्रॅफिकमधून सुटका! हिंजवडी मेट्रोला अखेर 'ग्रीन सिग्नल'; माण ते बालेवाडी प्रवासी सेवेचा मार्ग मोकळा

पुणे : पुण्यातील वाहतूक कोंडीची डोकेदुखी ठरलेल्या हिंजवडी IT पार्कच्या प्रवाशांसाठी अत्यंत दिलासादायक आणि मोठी